शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

भूदल, हवाई दलानंतर आता नौदलाची बारी; युद्धनौकांची पाकिस्तानवर नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 23:56 IST

पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. अख्खा देश हळहळला. जैश-ए-मोहम्मदचा आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत होती.

मुंबई : पुलवामा हल्ल्याचा बदला आज मध्यरात्री हवाईदलाने पूर्ण केला असून पाकमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या तळावर जोरदार हल्ले चढविले आहेत. यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला असून त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. या पार्श्वभुमीवर भारतामध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला असून नौदलानेही कंबर कसली आहे. 

पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. अख्खा देश हळहळला. जैश-ए-मोहम्मदचा आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत होती. लष्कराच्या मनातही असंतोष खदखदत होताच. पण, घाईघाईत कुठलंही चुकीचं पाऊल न उचलता, अत्यंत थंड डोक्याने दिवस-रात्र एक करून तिन्ही दलांनी एकत्रितपणे आखणी केली आणि आज भारताला मोठं यश मिळालं. मिराज 2000 या विमानांमधून १००० किलोचे बॉम्ब जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर टाकण्यात आले आणि मसूद अझरचा भाऊ, मेव्हण्यासह ३०० दहशतवादी मातीत गाडले गेले. पाकिस्तानने वारंवार आश्वासन देऊनही जैशचा बंदोबस्त न केल्यानं आणि त्यांच्याकडून आणखी दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्यानंच हा हल्ला केल्याचं परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केलं.  

भारताच्या हवाई हल्ल्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची वेळ आणि ठिकाण ठरवून हल्ला करण्याची धमकी दिली आहे. शिवाय पाकिस्तानचे दहशतवाद्यांचे स्लीपर सेलही घातपात घडविण्याची शक्यता आहे. यामुळे सावधगिरी म्हणून सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

भारतीय नौदलानेही पश्चिमेकडील समुद्रातील ट्रोपेक्स हा युद्धनौकांचा सराव थांबविला असून या भागातील युद्ध नौकांना पाकिस्तानी नौदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. पाकिस्तानपासून गुजरातमधील बंदरे जवळ असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईही टप्प्यात आहे. यामुळे भारताच्या युद्धनौका या भागात गस्त घालणार असून गरज पडल्यास कारवाईही करण्याच्या तयारीमध्ये ठेवण्यात आली आहेत. तसेच पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडूनही भारतीय हद्दीत हल्ला होण्याच्या शक्यतेने भूदलालाही अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलindian navyभारतीय नौदलPakistanपाकिस्तान