शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

भूदल, हवाई दलानंतर आता नौदलाची बारी; युद्धनौकांची पाकिस्तानवर नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 23:56 IST

पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. अख्खा देश हळहळला. जैश-ए-मोहम्मदचा आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत होती.

मुंबई : पुलवामा हल्ल्याचा बदला आज मध्यरात्री हवाईदलाने पूर्ण केला असून पाकमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या तळावर जोरदार हल्ले चढविले आहेत. यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला असून त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. या पार्श्वभुमीवर भारतामध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला असून नौदलानेही कंबर कसली आहे. 

पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. अख्खा देश हळहळला. जैश-ए-मोहम्मदचा आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत होती. लष्कराच्या मनातही असंतोष खदखदत होताच. पण, घाईघाईत कुठलंही चुकीचं पाऊल न उचलता, अत्यंत थंड डोक्याने दिवस-रात्र एक करून तिन्ही दलांनी एकत्रितपणे आखणी केली आणि आज भारताला मोठं यश मिळालं. मिराज 2000 या विमानांमधून १००० किलोचे बॉम्ब जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर टाकण्यात आले आणि मसूद अझरचा भाऊ, मेव्हण्यासह ३०० दहशतवादी मातीत गाडले गेले. पाकिस्तानने वारंवार आश्वासन देऊनही जैशचा बंदोबस्त न केल्यानं आणि त्यांच्याकडून आणखी दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्यानंच हा हल्ला केल्याचं परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केलं.  

भारताच्या हवाई हल्ल्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची वेळ आणि ठिकाण ठरवून हल्ला करण्याची धमकी दिली आहे. शिवाय पाकिस्तानचे दहशतवाद्यांचे स्लीपर सेलही घातपात घडविण्याची शक्यता आहे. यामुळे सावधगिरी म्हणून सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

भारतीय नौदलानेही पश्चिमेकडील समुद्रातील ट्रोपेक्स हा युद्धनौकांचा सराव थांबविला असून या भागातील युद्ध नौकांना पाकिस्तानी नौदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. पाकिस्तानपासून गुजरातमधील बंदरे जवळ असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईही टप्प्यात आहे. यामुळे भारताच्या युद्धनौका या भागात गस्त घालणार असून गरज पडल्यास कारवाईही करण्याच्या तयारीमध्ये ठेवण्यात आली आहेत. तसेच पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडूनही भारतीय हद्दीत हल्ला होण्याच्या शक्यतेने भूदलालाही अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलindian navyभारतीय नौदलPakistanपाकिस्तान