शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मणिपूरमधील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचीच चौकशी व्हावी, खा. राणांची संसदेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 12:13 IST

एका महिलेला १४ दिवस तुरुंगात टाकलं जातं, तेव्हा कुठे होते विरोधक असे म्हणत राणा यांनी आक्रमपणे आपली भूमिका मांडली.

नवी दिल्ली - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदेत अविश्वास प्रस्तावातील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी, मणिपूर हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचारावर भाष्य करताना त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. विरोधी पक्षाकडून केवळ राजकारणासाठी मणिपूरच्या घटनेचा वापर केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी, हनुमान चालिसा पठणवरुन त्यांना झालेल्या अटकेचा उल्लेख करत त्यांनी विरोधकांना सवाल केला. हनुमान चालिसा म्हणतेय म्हणून एका महिलेला १४ दिवस तुरुंगात टाकलं जातं, तेव्हा कुठे होते विरोधक असे म्हणत राणा यांनी आक्रमपणे आपली भूमिका मांडली. तसेच,  मणिपूर व्हायरल व्हिडिओवरुनही चौकशीची मागणी केली आहे. 

मणिपूर हिंसा, मणिपूर महिलांवरील अत्याचार हा विरोधकांचा विषय नाही. तर, मोदींचं नाव आलं की विरोध करायचा, हाच त्यांचा अजेंडा आहे, असे म्हणत खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांच्या टीकेनंतर अविश्वास प्रस्तावावर भाष्य केलं. यावेळी, मणिपूर हिसांचारानंतर महिलेची नग्न धिंड काढणारा व्हिडिओ ज्यांनी हेतुपूर्वकपणे व्हायरल केला त्याची चौकशी व्हावी आणि संबंधितांना शिक्षा करावी, अशी मागणीही राणा यांनी केली. 

महिलांचा वापर हा राजकीय पोळ्या भाजण्यासाठी करता कामा नये. मणिपूरमधील घटनेचा सर्वांनीच निषेध केला. संसदेतील सर्वच सदस्यांनीही याचा निषेध केला. पण, ४ तारखेला घडलेल्या घटनेचा व्हिडिओ जुलै महिन्यात संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर जाणीवपूर्वक व्हायरल केला जातो. हेतुपूर्ण रितीने हा व्हिडिओ व्हायरल केला जातो. त्यानंतर पत्रकार आम्हाला प्रश्न विचारतात. व्हिडिओवर मत मांडायला लावतात. म्हणूनच, ज्यांनी हा व्हिडिओ हेतुपूर्वक व्हायरल केला आहे, त्यांची चौकशी व्हावी अशी मागणीच नवनीत राणा यांनी संसदेत केली आहे. महिलांची बदनामी करणाऱ्यांना, महिलांवरील अत्याचार सोशल मीडियातून समाजात आणणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी, असेही राणा यांनी संसदेत बोलताना म्हटले. 

खासदार राणा यांनी यावेळी राजस्थानमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा उल्लेख केला. राजस्थानमधील घटनेवर विरोधक का शांत बसले आहेत, त्यांनी राजस्थानमधील बलात्कार आणि हत्याप्रश्न सभागृहात प्रश्न का उपस्थित केले नाहीत. मणिपूरमधील घटनेनंतर ४ मे रोजीच तुमचं डेलिगेशन तिथं का गेलं नाही, ३ महिन्यानंतर, संसदेच्या अधिवेशनावेळीच हे डेलिगेशन का गेलं नाही. केवळ फोटो काढण्यासाठी, दिखावा करण्यासाठी आणि सरकारला विरोध करण्यासाठीच तुम्ही तिथं गेल्याचं खासदार राणा यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSocial Viralसोशल व्हायरलnavneet kaur ranaनवनीत कौर राणाShiv Senaशिवसेना