शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

मणिपूरमधील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचीच चौकशी व्हावी, खा. राणांची संसदेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 12:13 IST

एका महिलेला १४ दिवस तुरुंगात टाकलं जातं, तेव्हा कुठे होते विरोधक असे म्हणत राणा यांनी आक्रमपणे आपली भूमिका मांडली.

नवी दिल्ली - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदेत अविश्वास प्रस्तावातील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी, मणिपूर हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचारावर भाष्य करताना त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. विरोधी पक्षाकडून केवळ राजकारणासाठी मणिपूरच्या घटनेचा वापर केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी, हनुमान चालिसा पठणवरुन त्यांना झालेल्या अटकेचा उल्लेख करत त्यांनी विरोधकांना सवाल केला. हनुमान चालिसा म्हणतेय म्हणून एका महिलेला १४ दिवस तुरुंगात टाकलं जातं, तेव्हा कुठे होते विरोधक असे म्हणत राणा यांनी आक्रमपणे आपली भूमिका मांडली. तसेच,  मणिपूर व्हायरल व्हिडिओवरुनही चौकशीची मागणी केली आहे. 

मणिपूर हिंसा, मणिपूर महिलांवरील अत्याचार हा विरोधकांचा विषय नाही. तर, मोदींचं नाव आलं की विरोध करायचा, हाच त्यांचा अजेंडा आहे, असे म्हणत खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांच्या टीकेनंतर अविश्वास प्रस्तावावर भाष्य केलं. यावेळी, मणिपूर हिसांचारानंतर महिलेची नग्न धिंड काढणारा व्हिडिओ ज्यांनी हेतुपूर्वकपणे व्हायरल केला त्याची चौकशी व्हावी आणि संबंधितांना शिक्षा करावी, अशी मागणीही राणा यांनी केली. 

महिलांचा वापर हा राजकीय पोळ्या भाजण्यासाठी करता कामा नये. मणिपूरमधील घटनेचा सर्वांनीच निषेध केला. संसदेतील सर्वच सदस्यांनीही याचा निषेध केला. पण, ४ तारखेला घडलेल्या घटनेचा व्हिडिओ जुलै महिन्यात संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर जाणीवपूर्वक व्हायरल केला जातो. हेतुपूर्ण रितीने हा व्हिडिओ व्हायरल केला जातो. त्यानंतर पत्रकार आम्हाला प्रश्न विचारतात. व्हिडिओवर मत मांडायला लावतात. म्हणूनच, ज्यांनी हा व्हिडिओ हेतुपूर्वक व्हायरल केला आहे, त्यांची चौकशी व्हावी अशी मागणीच नवनीत राणा यांनी संसदेत केली आहे. महिलांची बदनामी करणाऱ्यांना, महिलांवरील अत्याचार सोशल मीडियातून समाजात आणणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी, असेही राणा यांनी संसदेत बोलताना म्हटले. 

खासदार राणा यांनी यावेळी राजस्थानमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा उल्लेख केला. राजस्थानमधील घटनेवर विरोधक का शांत बसले आहेत, त्यांनी राजस्थानमधील बलात्कार आणि हत्याप्रश्न सभागृहात प्रश्न का उपस्थित केले नाहीत. मणिपूरमधील घटनेनंतर ४ मे रोजीच तुमचं डेलिगेशन तिथं का गेलं नाही, ३ महिन्यानंतर, संसदेच्या अधिवेशनावेळीच हे डेलिगेशन का गेलं नाही. केवळ फोटो काढण्यासाठी, दिखावा करण्यासाठी आणि सरकारला विरोध करण्यासाठीच तुम्ही तिथं गेल्याचं खासदार राणा यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSocial Viralसोशल व्हायरलnavneet kaur ranaनवनीत कौर राणाShiv Senaशिवसेना