शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

जे युद्धात जिंकू शकत नाहीत, ते आमच्या एकतेमध्ये फूट टाकतायत, मोदींचा पाकवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 11:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 144व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडियामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.

अहमदाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 144व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडियामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं आहे. जे युद्ध जिंकू शकत नाहीत, ते आमच्या एकतेत फूट टाकतायत, असं म्हणत मोदींनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे. मी आज राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्तानं प्रत्येक देशवासीयाला देशासमोर असलेल्या आव्हानांची आठवण करून देऊ इच्छितो. जे आपल्याशी युद्धात जिंकू शकत नाहीत, ते आपल्या एकतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.पण ते एक गोष्ट विसरतात, एवढ्या वर्षांपासून प्रयत्न करून ते आम्हाला नेस्तनाबूत करू शकलेले नाहीत. आमच्या एकतेला हरवू शकलेले नाहीत. आमच्याकडे विविधतेतच एकता असते. सरदार साहेबांच्या आशीर्वादानं अशा शक्तींना पराभूत करण्याचा मोठा निर्णय देशानं काही आठवड्यांपूर्वीच घेतला. कलम 370नं जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटिरतावाद पसरविण्याशिवाय काहीही केलेलं नाही. पूर्ण देशात फक्त जम्मू-काश्मीरमध्येच कलम 370 लागू होतं.जम्मू-काश्मीरमध्ये तीन दशकांत जवळपास 40 हजार लोकांना जीव गमवावा लागला आहे. दशकांपासून भारतीयांसाठी कलम 370ही एक भिंत बनलेली होती. या भिंतीमुळेच जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद आणि दहशतवाद वाढत होता. आता ती भिंतच पाडण्यात आली आहे. पटेलांकडे काश्मीर प्रश्न असता तर तो सोडवण्यास एवढा वेळ लागला नसता. कलम 370 हटवण्याचा निर्णय मी जयंतीनिमित्त पटेलांना समर्पित करतो, असंही मोदी म्हणाले आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी