शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याकडे 65 पुरस्कार विजेत्यांनी फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 21:17 IST

65वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात यंदा मोठा वाद उफाळून आलाय. केवळ 11 पुरस्कार विजेत्यांनाच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

नवी दिल्लीः 65वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात यंदा मोठा वाद उफाळून आलाय. केवळ 11 पुरस्कार विजेत्यांनाच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. मात्र, या निर्णयाला इतर विजेत्या कलाकारांनी तीव्र विरोध केला. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण न झाल्यानं 65 पुरस्कार विजेत्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.यावेळी 131 पैकी 65 विजेत्यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्याकडे पाठ फिरवली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे कार्यक्रमाच्या ठिकाणी साडेपाच वाजता उपस्थित राहणार होते. परंतु माहिती प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांनी राज्यमंत्री हर्षवर्धन राठोड आणि सचिव नरेंद्र कुमार सिन्हा यांच्या उपस्थितीत साडेतीन ते साडेपाचच्यादरम्यान अनेक विजेत्यांना पुरस्कार दिले. या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत 65 पुरस्कार विजेत्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.मागील 64 वर्षांपासून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे राष्ट्रपतींच्या हस्ते देण्याची प्रथा आहे. परंतु ही प्रथा भाजपा सरकारनं मोडीत काढली. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार नसल्यामुळे अनेक पुरस्कार विजेत्यांनी निषेध करत पुरस्कार सोहळ्याकडेच पाठ फिरवली.