शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

“काश्मीर हा भारताचाच भाग होता, आताही आहे अन् पुढेही कायम राहील”: फारूक अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 09:51 IST

Farooq Abdullah News: राष्ट्राला बळकट करण्यासाठी त्यातील विविधता जपली पाहिजे, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

Farooq Abdullah News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीमधील धूसपूस आता निवळताना दिसत आहे. सपा आणि आम आदमी पक्षासोबत जागावाटपाच्या चर्चा यशस्वी झाल्याचे चित्र आहेत.  नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमधील लोकसभेच्या पाचही जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आता जम्मू-काश्मीरमध्येही इंडिया आघाडीला दिलासा मिळतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. यातच काश्मीर हा भारताचाच भाग होता आणि पुढेही कायम राहील, असे विधान फारूक अब्दुल्ला यांनी केले आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना फारूक अब्दुल्ला म्हणाले की, काश्मीर हा भारताचा भाग होता. काश्मीर भारताचा भाग आजही आहे आणि नेहमीच काश्मीर हा भारताचा भाग राहील, असे फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले. फारुख अब्दुल्ला यांनी ईव्हीएम मशीनवर प्रश्न उपस्थित केला. निवडणूक आयोग निष्पक्षपातीपणे निवडणुका घेईल, अशी आशा आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्राला बळकट करण्यासाठी त्यातील विविधता जपली पाहिजे, असे मत फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केले.

दरम्यान, फारूक अब्दुल्ला सातत्याने भाजपासोबत युती करून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते. सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर फारूक अब्दुल्ला हे भाजपासोबत सरकार स्थापन करण्यास उत्सुक होते. त्या प्रक्रियेचा मीदेखील एक भाग होतो. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पुन्हा एकदा फारूक अब्दुल्ला यांनी तसा प्रयत्न केला होता, असा दावा भाजपा नेते देवेंद्र सिंह राणा यांनी केला होता. 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर