शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
5
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
6
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
7
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
8
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
9
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
10
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
11
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
13
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
14
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
15
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
16
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
17
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
18
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
19
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
20
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'

पाणी मिळूनही नशिराबादकर कोरडेच!

By admin | Updated: May 7, 2016 18:37 IST

नशिराबाद- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येेथे एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने गावाला सध्या पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे. टंचाईचा तिढा मिटला असला तरी एमआयडीसीचे पाणी दूषित व पिवळसर, फेसयुक्त येत असल्याने शुद्ध पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांचे माठ कोरडेच आहे. पर्यायाने मिनरल, जारच्या पाण्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

नशिराबाद- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येेथे एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने गावाला सध्या पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे. टंचाईचा तिढा मिटला असला तरी एमआयडीसीचे पाणी दूषित व पिवळसर, फेसयुक्त येत असल्याने शुद्ध पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांचे माठ कोरडेच आहे. पर्यायाने मिनरल, जारच्या पाण्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
गावाला कायमस्वरुपी पाणी योजनाच नाही, त्यामुळे अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. एमआयडीसीचा पिवळसर पाण्याबाबत ओरड होत असली तरी पर्यायाने त्याच पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. यंदा डिसेंबर अखेरपासून पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींची पातळी खोलवर गेल्याने टंचाईची झळ ग्रामस्थाना बसत आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वाघूरच्या धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. एमआयडीसीचे पाणी मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीने मंत्रालयापर्यंत धाव घेतली अखेर पाणी मिळाले, पाणी टंचाईची तिव्रता कमी झाली खरी मात्र पिवळसर फेसयुक्त पाण्यामुळे ग्रामस्थांना शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या मुर्दापूर, वाघूर, एमआयडीसी असा एकत्रीत पाणी पुरवठा गावास होत आहे. शुद्ध पाण्यासाठी मिनरल वॉटर, जारचे पाणी सुमारे १० ते ३० रुपयापर्यंत उपलब्ध होत असल्याने अनेकांनी तेच पाणी पिण्यासाठी घेताना दिसत आहे. त्यामुळे माठ कोरडेच असून जारमधले पाणी वापरले जात आहे.
दरम्यान, दरवर्षीच एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून न राहता असलेल्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण, नियोजनासाठी आतापासून ठोस पावले उचलण्यात यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.