शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

पाणी मिळूनही नशिराबादकर कोरडेच!

By admin | Updated: May 7, 2016 18:37 IST

नशिराबाद- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येेथे एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने गावाला सध्या पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे. टंचाईचा तिढा मिटला असला तरी एमआयडीसीचे पाणी दूषित व पिवळसर, फेसयुक्त येत असल्याने शुद्ध पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांचे माठ कोरडेच आहे. पर्यायाने मिनरल, जारच्या पाण्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

नशिराबाद- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येेथे एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने गावाला सध्या पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे. टंचाईचा तिढा मिटला असला तरी एमआयडीसीचे पाणी दूषित व पिवळसर, फेसयुक्त येत असल्याने शुद्ध पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांचे माठ कोरडेच आहे. पर्यायाने मिनरल, जारच्या पाण्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
गावाला कायमस्वरुपी पाणी योजनाच नाही, त्यामुळे अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. एमआयडीसीचा पिवळसर पाण्याबाबत ओरड होत असली तरी पर्यायाने त्याच पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. यंदा डिसेंबर अखेरपासून पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींची पातळी खोलवर गेल्याने टंचाईची झळ ग्रामस्थाना बसत आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वाघूरच्या धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. एमआयडीसीचे पाणी मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीने मंत्रालयापर्यंत धाव घेतली अखेर पाणी मिळाले, पाणी टंचाईची तिव्रता कमी झाली खरी मात्र पिवळसर फेसयुक्त पाण्यामुळे ग्रामस्थांना शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या मुर्दापूर, वाघूर, एमआयडीसी असा एकत्रीत पाणी पुरवठा गावास होत आहे. शुद्ध पाण्यासाठी मिनरल वॉटर, जारचे पाणी सुमारे १० ते ३० रुपयापर्यंत उपलब्ध होत असल्याने अनेकांनी तेच पाणी पिण्यासाठी घेताना दिसत आहे. त्यामुळे माठ कोरडेच असून जारमधले पाणी वापरले जात आहे.
दरम्यान, दरवर्षीच एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून न राहता असलेल्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण, नियोजनासाठी आतापासून ठोस पावले उचलण्यात यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.