शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पंजाब-हरयाणात वाढतायत शेतातील कडपे जाळण्याचे प्रकार, नासाकडून फोटो प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 09:53 IST

दिल्ली आणि एनसीआरमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चाललं आहे.

नवी दिल्लीः दिल्ली आणि एनसीआरमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चाललं आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर प्रदूषणाच्या गुणवत्तेची चाचणी करणाऱ्या संस्थांच्या मते दिल्लीतल्या आजूबाजूला असलेले राज्य पंजाब आणि हरयाणात कापलेल्या भातातील कडपे जाळण्याचे प्रकार वाढले आहेत, त्याचा परिणाम म्हणून दिल्लीतलं प्रदूषण वाढत असल्याचाही निष्कर्ष त्यांनी नोंदवला आहे.नासानं घेतलेल्या फोटोमधून हे सिद्ध होतंय की, भात कापून झाल्यानंतर शेतात उरलेले कडपे शेतकरी जाळतात, त्यामुळेच प्रदूषणात वाढ होते, असा दावाही या यंत्रणांनी केला आहे.  नासानं दिल्लीला लागून असलेल्या काही राज्यांचे सेटलाइटच्या माध्यमातून फोटो घेतले आहेत. या फोटोमध्ये 'रेड स्पॉट' शेतात भात कापून झालेल्या कडप्यांना लावलेली आग दर्शवत आहेत. पंजाब आणि हरयाणात शेतातले कडपे जाळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे दिल्ली आणि आजूबाजूच्या राज्यात प्रदूषण वाढतच आहे.अशाच दिल्ली सरकारनं प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनीही एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणतात, पंजाब आणि हरयाणच्या सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की, दिल्लीला गॅस चेंबर बनवण्यापासून रोखण्यासाठी काही ठोस पावलं उचला. आम्ही आमच्या पातळीवर लागोपाठ प्रयत्न करत आहोत. प्रदूषण नियंत्रित करण्याचे प्रयत्न पुढेसुद्धा सुरूच ठेवू. नासानं दिलेल्या फोटोतून स्पष्ट दिसत आहे की, शेतातील कडपे जाळण्याचे प्रकार कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. तसेच दिवाळीमध्ये फोडण्यात आलेल्या फटाक्यांनीही दिल्ली-एनसीआरच्या प्रदूषणात वाढ केलेली आहे. सेंटर फॉर सायन्स इन्व्हायरन्मेंट(सीएसई)च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. 

टॅग्स :NASAनासा