शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गावी आल्यानंतर केला विकासाचा संकल्प; 30 वर्षांची तरुणी झाली सरपंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 12:27 IST

एका तरुणीने गावाचा कायापालट करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. गावाचा विकास करण्याच्या ध्यासाने तिने ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ती सरपंच झाली. 

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी आपल्या गावी जाण्याचा मार्ग स्वीकारला. अनेकांनी नोकरी गमावली. तर काहींनी शहरापेक्षा आपलं गाव बरं असं म्हटलं. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील एका तरुणीने गावाचा कायापालट करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. गावाचा विकास करण्याच्या ध्यासाने तिने ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ती सरपंच झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात ही घटना आहे. जिल्ह्यातील ठूटी गावात आकांक्षा कौरव ही 30 वर्षांची तरुणी सरपंच म्हणून निवडून आली आहे. तीन जण या निवडणुकीच्या मैदानात होते. त्यांचा पराभव करत आकांक्षाने कारवाई केली आहे. तिच्या विरोधात असलेल्या एका उमेदवाराला 28, दुसऱ्याला 47 तर तिसऱ्याला 188 मतं मिळाली. आकांक्षाला एकूण 557 मतं मिळाली. म्हणजेच, एकूण 377 अशा मताधिक्याने लोकांनी तिची सरपंच म्हणून निवड केली आहे.

आकांक्षाने दिलेल्या माहितीनुसार, तिने आयटी इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर तिने दोन वर्षं सॉफ्टवेअर कंपनीत काम केलं. त्यानंतर तिने यूपीएससी (UPSC) परीक्षेसाठी तयारी सुरू केली. शहरात तिची यूपीएससीची तयारी सुरू असतानाच कोरोना महामारीची लाट आली. कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे आकांक्षा पुन्हा आपल्या गावी परतली. शहरातून गावात आल्यानंतर आकांक्षाला जाणवलं की, गावात कित्येक सुविधांचा अभाव आहे. आकांक्षाने गावातच थांबून गावाचा विकास करण्याचा निर्णय घेतला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश