शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गावी आल्यानंतर केला विकासाचा संकल्प; 30 वर्षांची तरुणी झाली सरपंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 12:27 IST

एका तरुणीने गावाचा कायापालट करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. गावाचा विकास करण्याच्या ध्यासाने तिने ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ती सरपंच झाली. 

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी आपल्या गावी जाण्याचा मार्ग स्वीकारला. अनेकांनी नोकरी गमावली. तर काहींनी शहरापेक्षा आपलं गाव बरं असं म्हटलं. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील एका तरुणीने गावाचा कायापालट करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. गावाचा विकास करण्याच्या ध्यासाने तिने ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ती सरपंच झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात ही घटना आहे. जिल्ह्यातील ठूटी गावात आकांक्षा कौरव ही 30 वर्षांची तरुणी सरपंच म्हणून निवडून आली आहे. तीन जण या निवडणुकीच्या मैदानात होते. त्यांचा पराभव करत आकांक्षाने कारवाई केली आहे. तिच्या विरोधात असलेल्या एका उमेदवाराला 28, दुसऱ्याला 47 तर तिसऱ्याला 188 मतं मिळाली. आकांक्षाला एकूण 557 मतं मिळाली. म्हणजेच, एकूण 377 अशा मताधिक्याने लोकांनी तिची सरपंच म्हणून निवड केली आहे.

आकांक्षाने दिलेल्या माहितीनुसार, तिने आयटी इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर तिने दोन वर्षं सॉफ्टवेअर कंपनीत काम केलं. त्यानंतर तिने यूपीएससी (UPSC) परीक्षेसाठी तयारी सुरू केली. शहरात तिची यूपीएससीची तयारी सुरू असतानाच कोरोना महामारीची लाट आली. कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे आकांक्षा पुन्हा आपल्या गावी परतली. शहरातून गावात आल्यानंतर आकांक्षाला जाणवलं की, गावात कित्येक सुविधांचा अभाव आहे. आकांक्षाने गावातच थांबून गावाचा विकास करण्याचा निर्णय घेतला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश