शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदेच्या बॅक वॉटरने केला घात

By admin | Updated: August 5, 2015 23:29 IST

मध्यप्रदेशातील दुहेरी रेल्वे अपघात मुसळधार पावसामुळे झाल्याचे मानले जात असले तरी नर्मदेवरील धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने ही भीषण घटना घडली

राजेंद्र पाराशर, भोपाळमध्यप्रदेशातील दुहेरी रेल्वे अपघात मुसळधार पावसामुळे झाल्याचे मानले जात असले तरी नर्मदेवरील धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने ही भीषण घटना घडली असण्याची शक्यता अधिक आहे. नर्मदा नदीवरील धरणातून सतत पाणी सोडण्यात येत असल्याने तिच्या उपनद्यांमधील पाण्याची पातळी वाढते आणि हे पाणी उपनद्या आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी धोकादायक ठरते. मंगळवारी रात्री झालेल्या अपघातामागेही नदीत अचानक वाढलेली पाण्याची पातळी हेच मूळ कारण असावे. या पाण्यामुळे रेल्वेरुळावरील माती खचली आणि अपघात झाला. नर्मदेवर बांधण्यात आलेल्या धरणांमधून (जबलपुरातील बरगी, होशंगाबाद जिल्ह्यातील तवा) सतत सोडण्यात येणारे पाणी आणि इंदिरा सागर व ओंकारेश्वर धरणात होणारा जलसाठासुद्धा अपघातास कारणीभूत ठरला आहे. अपघाताच्या वेळी बरगी धरणातून पावणेसात मीटर, तर तवामधून दोन मीटर पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नर्मदेच्या उपनद्यांमधील बॅक वॉटर वाढले आहे. हेच बॅक वॉटर रेल्वेमार्गाची जमीन ठिसूळ करीत आहे. हरदाजवळ ही घटना घडली ते स्थळसुद्धा काली माचक नदीच्या जवळ आहे. पावसाळ्यात या नदीतील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असते. सरकार हे संपूर्ण बुडीत क्षेत्र मानत नसले तरी हरदा जिल्ह्यातील अनेक गावे आजही बुडीत क्षेत्रात येतात; परंतु सरकारला अद्याप याचे गांभीर्य उमजलेले नाही. गावकऱ्यांनी यासाठी अनेकदा धरणे आंदोलन केले आहे.कसा झाला अपघात?मंगळवारी रात्री ११.३० वाजता सर्वप्रथम मुंबईहून वाराणसीला जाणारी कामयानी एक्स्प्रेस पुलावरून गेली. जमीन खचल्याने रेल्वेमार्ग तुटला आणि ११ डबे रुळावरून खाली घसरले. ६ डब्यांचे अधिक नुकसान झाले. त्यानंतर २० मिनिटांनी म्हणजे ११.५० वाजता पुलावरीलच दुसऱ्या रेल्वे रुळावरून आलेल्या पाटणा-मुंबई जनता एक्स्प्रेसचेही ९ डबे आणि इंजिन अपघातग्रस्त झाले. या गाडीचे चार डबे उद्ध्वस्त झाले.