शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

फक्त लोकसभा निवडणुकांचा खर्च 400 पटीने वाढला; 'एक देश एक निवडणूक' असतं तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 12:50 IST

एक देश एक निवडणूक लागू करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेचा वेळ वाढविला जाईल. मतदानाचे टप्पे वाढवले जातील. लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाल्यावर सुरक्षेसाठी लागणारा खर्च कमी होईल.

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा एक देश, एक निवडणूक या मुद्द्यावर चर्चा सुरु झाली आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना नरेंद्र मोदींनी एक देश एक निवडणूक यावरुन मतदार यादी बनविण्याबाबत सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक देश एक निवडणूक हा तर्क कितपत योग्य आहे हे समजून घेणं गरजेचे आहे. 

जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात प्रत्येक वेळी कुठे ना कुठे निवडणुका होत असतात. निवडणुका आल्या म्हणजे आचारसंहिता आली. आचारसंहिता लागू झाल्यावर विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होतो. निवडणुकीवेळी प्रचंड सुरक्षा बंदोबस्त ठेवावा लागतो. सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामाला लागतात. ज्यामुळे प्रशासनाच्या कामात वेळ जातो. निवडणुकीसाठी मनुष्यबळासोबत पैसेही खर्च होतात आणि हा पैसा जनतेच्या खिशातून जातो. 

प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो आणि निवडणूक आयोग यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार देशात लोकसभा निवडणुकीचा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. 1952 मध्ये एका मतदाराला 60 पैसे खर्च आला होता. जो 2009 मध्ये 20 टक्क्यांनी वाढून 12 रुपये झाला. तर 2014 मध्ये एका मतदाराला 42 रुपये खर्च आला आणि अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी 6500 कोटी रुपये खर्च झाले आहे. म्हणजे एका मतदारासाठी 72 रुपये खर्च आला. 

एक देश एक निवडणूक यासाठी मोठ्या संख्येने ईव्हीएम मशीनची गरज भासेल. एका लोकसभेच्या निवडणुकीसाठी 12 ते 13 लाख ईव्हीएमचा वापर केला जातो. प्रत्येक वर्षी 4 ते 5 राज्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी 2 ते 3 लाख ईव्हीएम मशीनची आवश्यकता भासते. जर देशात एक देश एक निवडणूक घेतली गेली तर आपल्याला एकाच वेळी 30-32 लाख ईव्हीएम मशीनची व्यवस्था करावी लागेल. यासाठी 5 हजार कोटींची अधिक खर्च होईल. 

एक देश एक निवडणूक लागू करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेचा वेळ वाढविला जाईल. मतदानाचे टप्पे वाढवले जातील. लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाल्यावर सुरक्षेसाठी लागणारा खर्च कमी होईल. प्रत्येक निवडणुकीवेळी एका मतदान केंद्रावर कमीत कमी 5 सुरक्षा जवान तैनात असतात. 

सेंटर फॉर मिडीया स्टडीज(CMS) च्या रिपोर्टनुसार यावेळच्या निवडणुकीत राजकीय पक्षाकडून जवळपास 60 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष 10-10 हजार कोटी खर्च करतात. 2017 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा आणि 2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 10 हजार कोटींपेक्षा अधिक खर्च झाला. याप्रकारे दोन्ही निवडणुकासाठी राजकीय पक्षाकडून 1.20 लाखापासून 1.40 लाख कोटी खर्च होतात. जर दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्या तर हा सर्व खर्च कमी होईल. 

गेल्या 5 वर्षात 37 मोठ्या निवडणुका एप्रिल 2014 पासून देशात झालेल्या निवडणुकांचा विचार केला तर 2 लोकसभा निवडणुका, 35 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका झाल्या. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीसोबत 8 राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्या. 2015 मध्ये दिल्ली, बिहार, 2016 मध्ये 5 राज्य, 2017 मध्ये 7 राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. तर 2018 मध्ये सर्वाधिक 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. तर 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीसोबत 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यात. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक