शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

नरेंद्र मोदी सरकारचा केवळ दिखाऊपणा

By admin | Updated: August 30, 2015 22:17 IST

मोदी सरकारने ‘शोबाजी’शिवाय काहीही केले नाही. याउलट मनरेगासारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा योजनेच्या निधीत मोठी कपात केली. केवळ आश्वासने देणाऱ्या

पाटणा : मोदी सरकारने ‘शोबाजी’शिवाय काहीही केले नाही. याउलट मनरेगासारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा योजनेच्या निधीत मोठी कपात केली. केवळ आश्वासने देणाऱ्या सरकारवरील जनतेचा विश्वास उडाला आहे, असे सांगत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाटण्यातील स्वाभिमान रॅलीत प्रमुख विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ऐतिहासिक गांधी मैदानावर आयोजित सभेत सोनिया गांधी यांच्यासोबत मुख्यमंत्री नितीशकुमार, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी एकाच व्यासपीठावर येत संयुक्त प्रचाराचा नारळ फोडला.मोदी सरकारने आपल्या कार्यकाळाचा एकचतुर्थांश भाग पूर्ण केला आहे. या सरकारने आजपर्यंत शोबाजीशिवाय काहीही केले नाही. हे तुम्ही माझ्यापेक्षा चांगले जाणता. केंद्र सरकारने एक कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन पाळलेले नाही. दुसरीकडे सरकारी नोकऱ्यांमधील संधी सीमित केल्या आहेत. बिहारचा इतिहास गौरवशाली आहे. चंद्रगुप्त, चाणक्य, गुरू गोविंदसिंग, बाबू वीर कुंवरसिंग याच भूमीवर वाढले. मी येथील स्वाभिमानी लोकांना प्रणाम करते. मोदींनी मात्र डीएनएबद्दल शेरेबाजी करीत बिहारच्या जनतेचा अपमान केला आहे. येथील जनतेला चुकीच्या रूपात दाखविले. काही लोकांना बिहारची टर उडविण्यात आनंद मिळतो. त्यांनी संधी मिळेल तेव्हा बिहारचा अपमान केला आहे. या राज्यातील लोकांच्या डीएनएमध्ये बिघाड असल्याचे सांगत या राज्याला अपमानित केले आहे. कधी बिहारला बिमारू राज्य म्हटले आहे. काँग्रेसने नेहमी या राज्यातील जनतेचा सन्मान आणि प्रतिभेचा आदर केला आहे, असेही त्या म्हणाल्या. मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ ते २० लाख रुपये जमा करण्याचे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना त्यातील ५ ते १० टक्के रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. युवकांना नोकऱ्यांचे वचन दिले. आता लोकांची फसगत झाल्याची भावना झाली आहे, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले. १४ महिन्यांनंतर बिहारची आठवण आली आणि त्यांनी १.२५ लाख कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा केली. त्यातील ८७ टक्के रक्कम जुन्याच योजनांसाठीची आहे. रिपॅकेजिंगला विशेष पॅकेज संबोधण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. माझे वडील स्वातंत्र्यसेनानी होते. माझ्या डीएनएला आव्हान देणाऱ्यांच्या पूर्वजांचे स्वातंत्र्यलढ्यात कोणतेही योगदान नव्हते, असा उल्लेखही त्यांनी केला.मोदींनी भूसंपादन वटहुकूम जारी न करण्याची घोषणा केल्याबद्दल नितीशकुमार यांनी आजचा दिवस आनंदाचा आहे, अशी प्रतिक्रिया दिली.गांधी मैदानावर स्वाभिमान रॅलीच्या स्थळी रविवारी डीएन नमुने गोळा करण्यासाठी ८० काऊंटर उघडण्यात आले होते. ‘शब्दवापसी’ या मोहिमेंतर्गत जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी लोकांना डीएनए गोळा करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्लास्टिकच्या पाऊचमध्ये अनेकांनी केस आणि नखांचे नमुने देत सहभाग नोंदविला. मोदी यांचे निवासस्थान असलेल्या ७ रेसकोर्स रोडवरील निवासस्थानाचा पत्ता पाकिटावर नोंदविण्यात आला आहे.(वृत्तसंस्था)