शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

वाचाळवीरांवर मोदींची वक्रदृष्टी

By admin | Updated: March 7, 2016 23:16 IST

वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांवर मोदींना आता थेट कारवाईच हवी आहे. अशा वाचाळवीरांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. भाजपशासित राज्ये आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला त्यांनी तसे सूचितच केले आहे

हरीश गुप्ता,  नवी दिल्लीवादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांवर मोदींना आता थेट कारवाईच हवी आहे. अशा वाचाळवीरांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. भाजपशासित राज्ये आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला त्यांनी तसे सूचितच केले आहे की, कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. तथापि, असा प्रयत्न कोणी केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत. राष्ट्रवाद विरुद्ध स्वातंत्र्याची ही चर्चा देशात उग्र रूप धारण करू शकते. कायदेविषयक संस्थांनी अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे पंतप्रधान मोदींनी कडक संकेत दिलेले असतानाच त्याचा पोलीस कृतीतील प्रत्यय दिल्ली आणि छत्तीसगढमधील रायपूरमध्ये आला. दिल्ली पोलिसांनी पूर्वांचल सेनेचा प्रमुख आदर्श कुमार याला सोमवारी अटक केली. जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयावर याच आदर्श कुमारने दोन दिवसांपूर्वी ११ लाखांचे इनाम ठेवले होते. दरम्यान, छत्तीसगढमध्ये स्थानिक चर्चमध्ये नासधूस करणाऱ्या हिंदू कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा घटनांत पोलीस कारवाईच होत नाही, असे म्हणणाऱ्यांच्या भुवया मात्र यानिमित्ताने उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे पूर्वांचल सेनेच्या ज्या आदर्श कुमारला दिल्ली पोलिसांनी रोहिणी भागातून अटक केली तोसुद्धा बिहारमधील बेगुसराईचा असल्याचे उघड झाले. कन्हैया कुमारही बेगुसराईचाच आहे. पोलीस त्याच्या पूर्वेतिहासाची अजून खातरजमा करीत आहेत; परंतु आदर्श हा कन्हैया कुमारला माहीत नाही.हिंदुत्ववादी विचारांच्या नेत्यांनी असल्या प्रवृत्तींशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही याचे संकेत आधीच दिले आहेत. भाजपचे सरकार असलेल्या छत्तीसगढच्या रायपूरमध्ये स्थानिक चर्चची नासधूस करणाऱ्या नऊ जणांना (त्यात सहा जण अल्पवयीन आहेत) अटक करण्यात आली आहे. या नऊ जणांचा उजव्या विचारांच्या शक्तीशी काहीही संबंध नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तरीही या सगळ्यांनी आमचा उजव्या विचारसरणीशी जवळचा संबंध असल्याचा दावा केला आहे. हल्ला झाला त्याचा व्हिडिओ सगळीकडे पसरल्यावर (व्हायरल) पोलीस हल्लेखोरांना ओळखू शकले. सत्ताधारी पक्षाच्या व्यवस्थापकांना जेएनयूमधील घटना हे मोठा फायदा देणारे घबाडच असल्याचे वाटते. एवढेच काय कन्हैयाचे पाठीराखेही महत्त्वाच्या प्रश्नांवर बचावात्मक पवित्र्यात गेले आहेत.