शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

वाचाळवीरांवर मोदींची वक्रदृष्टी

By admin | Updated: March 7, 2016 23:16 IST

वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांवर मोदींना आता थेट कारवाईच हवी आहे. अशा वाचाळवीरांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. भाजपशासित राज्ये आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला त्यांनी तसे सूचितच केले आहे

हरीश गुप्ता,  नवी दिल्लीवादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांवर मोदींना आता थेट कारवाईच हवी आहे. अशा वाचाळवीरांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. भाजपशासित राज्ये आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला त्यांनी तसे सूचितच केले आहे की, कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. तथापि, असा प्रयत्न कोणी केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत. राष्ट्रवाद विरुद्ध स्वातंत्र्याची ही चर्चा देशात उग्र रूप धारण करू शकते. कायदेविषयक संस्थांनी अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे पंतप्रधान मोदींनी कडक संकेत दिलेले असतानाच त्याचा पोलीस कृतीतील प्रत्यय दिल्ली आणि छत्तीसगढमधील रायपूरमध्ये आला. दिल्ली पोलिसांनी पूर्वांचल सेनेचा प्रमुख आदर्श कुमार याला सोमवारी अटक केली. जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयावर याच आदर्श कुमारने दोन दिवसांपूर्वी ११ लाखांचे इनाम ठेवले होते. दरम्यान, छत्तीसगढमध्ये स्थानिक चर्चमध्ये नासधूस करणाऱ्या हिंदू कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा घटनांत पोलीस कारवाईच होत नाही, असे म्हणणाऱ्यांच्या भुवया मात्र यानिमित्ताने उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे पूर्वांचल सेनेच्या ज्या आदर्श कुमारला दिल्ली पोलिसांनी रोहिणी भागातून अटक केली तोसुद्धा बिहारमधील बेगुसराईचा असल्याचे उघड झाले. कन्हैया कुमारही बेगुसराईचाच आहे. पोलीस त्याच्या पूर्वेतिहासाची अजून खातरजमा करीत आहेत; परंतु आदर्श हा कन्हैया कुमारला माहीत नाही.हिंदुत्ववादी विचारांच्या नेत्यांनी असल्या प्रवृत्तींशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही याचे संकेत आधीच दिले आहेत. भाजपचे सरकार असलेल्या छत्तीसगढच्या रायपूरमध्ये स्थानिक चर्चची नासधूस करणाऱ्या नऊ जणांना (त्यात सहा जण अल्पवयीन आहेत) अटक करण्यात आली आहे. या नऊ जणांचा उजव्या विचारांच्या शक्तीशी काहीही संबंध नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तरीही या सगळ्यांनी आमचा उजव्या विचारसरणीशी जवळचा संबंध असल्याचा दावा केला आहे. हल्ला झाला त्याचा व्हिडिओ सगळीकडे पसरल्यावर (व्हायरल) पोलीस हल्लेखोरांना ओळखू शकले. सत्ताधारी पक्षाच्या व्यवस्थापकांना जेएनयूमधील घटना हे मोठा फायदा देणारे घबाडच असल्याचे वाटते. एवढेच काय कन्हैयाचे पाठीराखेही महत्त्वाच्या प्रश्नांवर बचावात्मक पवित्र्यात गेले आहेत.