शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

वाचाळवीरांवर मोदींची वक्रदृष्टी

By admin | Updated: March 7, 2016 23:16 IST

वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांवर मोदींना आता थेट कारवाईच हवी आहे. अशा वाचाळवीरांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. भाजपशासित राज्ये आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला त्यांनी तसे सूचितच केले आहे

हरीश गुप्ता,  नवी दिल्लीवादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांवर मोदींना आता थेट कारवाईच हवी आहे. अशा वाचाळवीरांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. भाजपशासित राज्ये आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला त्यांनी तसे सूचितच केले आहे की, कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. तथापि, असा प्रयत्न कोणी केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत. राष्ट्रवाद विरुद्ध स्वातंत्र्याची ही चर्चा देशात उग्र रूप धारण करू शकते. कायदेविषयक संस्थांनी अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे पंतप्रधान मोदींनी कडक संकेत दिलेले असतानाच त्याचा पोलीस कृतीतील प्रत्यय दिल्ली आणि छत्तीसगढमधील रायपूरमध्ये आला. दिल्ली पोलिसांनी पूर्वांचल सेनेचा प्रमुख आदर्श कुमार याला सोमवारी अटक केली. जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयावर याच आदर्श कुमारने दोन दिवसांपूर्वी ११ लाखांचे इनाम ठेवले होते. दरम्यान, छत्तीसगढमध्ये स्थानिक चर्चमध्ये नासधूस करणाऱ्या हिंदू कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा घटनांत पोलीस कारवाईच होत नाही, असे म्हणणाऱ्यांच्या भुवया मात्र यानिमित्ताने उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे पूर्वांचल सेनेच्या ज्या आदर्श कुमारला दिल्ली पोलिसांनी रोहिणी भागातून अटक केली तोसुद्धा बिहारमधील बेगुसराईचा असल्याचे उघड झाले. कन्हैया कुमारही बेगुसराईचाच आहे. पोलीस त्याच्या पूर्वेतिहासाची अजून खातरजमा करीत आहेत; परंतु आदर्श हा कन्हैया कुमारला माहीत नाही.हिंदुत्ववादी विचारांच्या नेत्यांनी असल्या प्रवृत्तींशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही याचे संकेत आधीच दिले आहेत. भाजपचे सरकार असलेल्या छत्तीसगढच्या रायपूरमध्ये स्थानिक चर्चची नासधूस करणाऱ्या नऊ जणांना (त्यात सहा जण अल्पवयीन आहेत) अटक करण्यात आली आहे. या नऊ जणांचा उजव्या विचारांच्या शक्तीशी काहीही संबंध नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तरीही या सगळ्यांनी आमचा उजव्या विचारसरणीशी जवळचा संबंध असल्याचा दावा केला आहे. हल्ला झाला त्याचा व्हिडिओ सगळीकडे पसरल्यावर (व्हायरल) पोलीस हल्लेखोरांना ओळखू शकले. सत्ताधारी पक्षाच्या व्यवस्थापकांना जेएनयूमधील घटना हे मोठा फायदा देणारे घबाडच असल्याचे वाटते. एवढेच काय कन्हैयाचे पाठीराखेही महत्त्वाच्या प्रश्नांवर बचावात्मक पवित्र्यात गेले आहेत.