शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना नाही तर परदेशांना भेटी देतात -राहुल गांधी

By admin | Updated: May 18, 2015 23:48 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी संपूर्ण जग फिरत आहेत.

अमेठी : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी संपूर्ण जग फिरत आहेत. वेगवेगळ्या देशांचे दौरे करीत आहेत. पण शेतकऱ्यांना भेटायला, त्यांच्या घरी यायला त्यांना वेळ नाही, असे राहुल म्हणाले. मोदी सरकार ‘बदल्याचे राजकारण’ करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.राहुल गांधी सोमवारी अमेठी या आपल्या मतदारसंघाच्या तीनदिवसीय दौऱ्यावर पोहोचले. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जगदीशपूर येथे अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना ते भेटले. यानंतर सुमारे दोन किमीची वाट पायी तुडवत, फूड पार्क उभा राहणार होता, त्याठिकाणी पोहोचले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. प्रस्तावित मेगा फूड पार्क प्रकल्प रद्द करणे हे सूडाचे राजकारण असून अमेठीतील शेतकऱ्यांवरील अन्याय आहे. हा फूड पार्क रद्द झाल्याने अमेठी व सुमारे १० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मोदी सरकारला माझ्यावर सूड उगवायचा आहे. पण यात निष्पाप शेतकरी व मजूर नाहक भरडले जात आहेत, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.पंतप्रधान चीन, जपान, मंगोलियासह संपूर्ण जगात फिरत आहेत. पण संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या घरी यायला त्यांना वेळ नाही. पंजाब, तेलंगण, महाराष्ट्र, हरियाणा अशा प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांचा आवाज, त्यांच्या मागण्या दडपल्या जात आहे. पण काँग्रेस हा आवाज कदापि दडपू देणार नाही, असेही राहुल म्हणाले. (वृत्तसंस्था)गतवर्षी लोकसभा निवडणुकीदरम्यान अमेठीतून राहुल यांच्याविरोधात निवडणूक लढणाऱ्या विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी गत आठवड्यात अमेठीचा दौरा केला होता. फूड पार्कच्या मुद्यावर राहुल गांधी अमेठीवासीयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपाला राहुल यांनी या दौऱ्यात सणसणीत उत्तर दिले.वर्षभरातील कामगिरीला १० पैकी शून्य गुण४मोदी सरकारच्या गत वर्षभरातील कामगिरीला किती गुण द्याल, असा प्रश्न काही पत्रकारांनी राहुल यांना केला. यावर मी १० पैकी शून्य गुण देईल. मोदी सरकार केवळ उद्योगपतींचे सरकार आहे. त्यामुळे मोदींचे उद्योगपती मित्र मात्र त्यांना नक्कीच १० पैकी १० गुण देतील, असे उत्तर राहुल यांनी दिले. शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न हाताळण्यात हे सरकार पूर्णत: अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.टीका बालिशपणाची- जितेंद्र सिंह४राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यावर केलेली टीका म्हणजे निव्वळ बालिशपणा आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली. राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून विदेश दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांचे होत असलेले अभूतपूर्व स्वागत आपल्यापैकी सर्वांची छाती अभिमानाने फुलून यावी असे आहे.अशी पुस्तीही त्यांनी जोडली.कोटपाच वर्षे कुंभकर्णासारख्या घोर निद्रेत राहिल्याने राहुल यांची होमवर्क करण्याची सवय सुटली आहे. फूड पार्कच्या मुद्यावर ते जनतेची दिशाभूल करीत आहेत.-अनुराग ठाकूर, भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष