शहरं
Join us  
Trending Stories
1
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
2
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
3
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
4
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
5
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
6
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी
7
स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
8
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
9
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
10
स्वतः जेवण बनवले, मुक्कामी राहिले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी
11
लय भारी! घरात तुळस लावल्याने काय होतं? आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितले जबरदस्त फायदे
12
सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख
13
Chhath Puja 2025: छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढांसह भाजपा नेते घेणार तयारीचा आढावा
14
दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील विजयाने भारताला फायदा, WTCच्या गुणतक्त्यात मोठी उलथापालथ
15
VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा
16
पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
17
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
18
डोळे हे जुलमी गडे! सुंदर दिसण्याची हौस महागात, रोज लायनर, काजळ लावल्यास मोठं नुकसान
19
जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
20
Viral Video: गळ्यात गमछा, कमरेला लुंगी! भोजपुरी गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स, नेटकरी झाले फिदा

Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 10:22 IST

Punjab Flood And Narendra Modi : १.७५ लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली. २३ जिल्ह्यांमधील १,९९६ गावे पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत.

पंजाबमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. या नैसर्गिक आपत्तीतील मृतांचा आकडा ४६ वर पोहोचला आहे, तर १.७५ लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली. २३ जिल्ह्यांमधील १,९९६ गावे पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीपंजाबमधील पुराचा फटका बसलेल्या भागांना भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ सप्टेंबर रोजी पंजाबचा पूरग्रस्त जिल्हा गुरुदासपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच पूरग्रस्त लोक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतील. पूर परिस्थितीची माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितलं की, पुरामुळे मृतांचा आकडा ४६ वर पोहोचला आहे, तर १.७५ लाख हेक्टर शेती जमिनीवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पंजाबमध्ये वाहणाऱ्या रावी, सतलज, व्यास नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 

युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू

गेल्या काही दिवसांत पंजाबमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिक आव्हानात्मक बनली आहे. एनडीआरएफ, लष्कर, सीमा सुरक्षा दल, पंजाब पोलीस आणि जिल्हा अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. शनिवारी पोंग धरणाची पाण्याची पातळी किंचित कमी होऊन १,३९४.१९ फूट झाली, मात्र ती चार फूट जास्त असल्याचं सांगितलं जात आहे.

२००० गावं पाण्याखाली

राज्याचे अर्थमंत्री हरप्रीत सिंग चीमा यांनी या पुराला पाच दशकांतील सर्वात वाईट पूर म्हटलं आणि सांगितलं की, पंजाब आणि शेजारच्या डोंगराळ राज्यांमध्ये सततच्या पावसामुळे सर्व जिल्ह्यांतील सुमारे २००० गावांना मोठा फटका बसला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, ३.८७ लाखांहून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत, ज्यामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला आहे.

जोरदार प्रवाहात एक व्यक्ती गेली वाहून

फिरोजपूर जिल्ह्यातील तली गुलाम गावात एका ५० वर्षीय व्यक्तीचा जोरदार प्रवाहात वाहून मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील पाण्याची पातळी धोकादायक पातळीवर वाढली आहे, ज्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हे आकडे १ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीतील आहेत. आतापर्यंत २२,८५४ लोकांना बाधित भागातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

टॅग्स :PunjabपंजाबfloodपूरRainपाऊसNarendra Modiनरेंद्र मोदी