शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मोदी केअरचा मोदींनी घेतला व्यापक बैठकीत आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 04:29 IST

जगातील सगळ्यात मोठी आरोग्य योजना नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीन (एनएचपीएस) राबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यापक आढावा बैठक घेतली. या योजनेद्वारे दहा कोटी कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रूपयांचे आरोग्य कवच दिले जाणार आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : जगातील सगळ््यात मोठी आरोग्य योजना नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीन (एनएचपीएस) राबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यापक आढावा बैठक घेतली. या योजनेद्वारे दहा कोटी कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रूपयांचे आरोग्य कवच दिले जाणार आहे.सरकार राबवत असलेल्या या योजनेला गेल्या मार्च महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तिचा ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ या नावाचा पायलट प्रोजेक्ट आयुष्यमान भारत अंतर्गत पहिल्यांदा छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात १४ एप्रिल रोजी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी सुरू करण्यात आला. बिजापूर या आदिवासी जिल्ह्याला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले. अत्यंत मागास ठिकाणी ही योजना कशी काम करील हे पाहण्यासाठी त्यांनी बिजापूरची निवड केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी या योजनेचा तपशील, योजनेचे लाभार्थी ठरवणे व दहा कोटी कुटुंबांना रुग्णालयाचा हक्क देण्यासाठीचे निकष अजून अंतिम केले जात असल्याबद्दल असमाधानी आहेत. चार महिन्यांपूर्वी मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. येत्या दोन महिन्यांत (विशेषत: आॅगस्टमध्ये लाल किल्ल्यावरून) मोदी यांना ही योजना देशभर लागू करायची इच्छा आहे. परंतु, ती प्रत्यक्ष राबवायच्या आधी ती नेमकी कशी काम करील हे त्यांना समजून घ्यायचे आहे. देशभरातील १.५० लाख वेलनेस केंद्रांचा योजनेशी संबंध आहे. विमा कंपन्या, खासगी व सरकारी रुग्णालये, तपासणी प्रयोगशाळा, डॉक्टर्स आणि औषधांची उपलब्धता आदी घटकांचे या योजनेत एकत्रीकरण साधायचे आहे. या योजनेच्या यशस्वी अमलबजावणीस आयटी नेटवर्कचीही मदत घेतली जाणार आहे.क्यूआर कोडसह हेल्थ कार्ड देण्याचा हेतूया योजनेत राज्यांच्या मदतीने युद्धपातळीवर शोधून काढलेल्या लाभार्थींना फॅमिली हेल्थ कार्ड क्यूआर कोडसह देण्याचा सरकारचा हेतू आहे. योजनेबाबत राज्यांशी केल्या गेलेल्या विचारविनिमयासह आतापर्यंत केल्या गेलेल्या तयारीची माहिती मोदी यांनी बैठकीत घेतली. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नीती आयोग व पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा आणि नीती आयोगातील या योजनेचे प्रभारी डॉ. व्ही. के. पॉल व इतरांनी ही माहिती सादर केली. ही योजना नॅशनल हेल्थ मिशनच्या सहकार्याने राबवली जाणार आहे. योजनेसाठी ८५ हजार कोटी रूपये केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले आहेत. विमा आधारीत या योजनेतून प्रत्येक कुटुंबाला केंद्र सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रूपयांचे आरोग्य सुरक्षा कवच विनामूल्य दिले जाणार आहे. विमा कवचाचा निधी केंद्र सरकारकडून स्वतंत्रपणे दिला जाईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीayushman bharatआयुष्मान भारत