शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोदी केअरचा मोदींनी घेतला व्यापक बैठकीत आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 04:29 IST

जगातील सगळ्यात मोठी आरोग्य योजना नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीन (एनएचपीएस) राबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यापक आढावा बैठक घेतली. या योजनेद्वारे दहा कोटी कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रूपयांचे आरोग्य कवच दिले जाणार आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : जगातील सगळ््यात मोठी आरोग्य योजना नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीन (एनएचपीएस) राबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यापक आढावा बैठक घेतली. या योजनेद्वारे दहा कोटी कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रूपयांचे आरोग्य कवच दिले जाणार आहे.सरकार राबवत असलेल्या या योजनेला गेल्या मार्च महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तिचा ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ या नावाचा पायलट प्रोजेक्ट आयुष्यमान भारत अंतर्गत पहिल्यांदा छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात १४ एप्रिल रोजी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी सुरू करण्यात आला. बिजापूर या आदिवासी जिल्ह्याला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले. अत्यंत मागास ठिकाणी ही योजना कशी काम करील हे पाहण्यासाठी त्यांनी बिजापूरची निवड केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी या योजनेचा तपशील, योजनेचे लाभार्थी ठरवणे व दहा कोटी कुटुंबांना रुग्णालयाचा हक्क देण्यासाठीचे निकष अजून अंतिम केले जात असल्याबद्दल असमाधानी आहेत. चार महिन्यांपूर्वी मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. येत्या दोन महिन्यांत (विशेषत: आॅगस्टमध्ये लाल किल्ल्यावरून) मोदी यांना ही योजना देशभर लागू करायची इच्छा आहे. परंतु, ती प्रत्यक्ष राबवायच्या आधी ती नेमकी कशी काम करील हे त्यांना समजून घ्यायचे आहे. देशभरातील १.५० लाख वेलनेस केंद्रांचा योजनेशी संबंध आहे. विमा कंपन्या, खासगी व सरकारी रुग्णालये, तपासणी प्रयोगशाळा, डॉक्टर्स आणि औषधांची उपलब्धता आदी घटकांचे या योजनेत एकत्रीकरण साधायचे आहे. या योजनेच्या यशस्वी अमलबजावणीस आयटी नेटवर्कचीही मदत घेतली जाणार आहे.क्यूआर कोडसह हेल्थ कार्ड देण्याचा हेतूया योजनेत राज्यांच्या मदतीने युद्धपातळीवर शोधून काढलेल्या लाभार्थींना फॅमिली हेल्थ कार्ड क्यूआर कोडसह देण्याचा सरकारचा हेतू आहे. योजनेबाबत राज्यांशी केल्या गेलेल्या विचारविनिमयासह आतापर्यंत केल्या गेलेल्या तयारीची माहिती मोदी यांनी बैठकीत घेतली. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नीती आयोग व पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा आणि नीती आयोगातील या योजनेचे प्रभारी डॉ. व्ही. के. पॉल व इतरांनी ही माहिती सादर केली. ही योजना नॅशनल हेल्थ मिशनच्या सहकार्याने राबवली जाणार आहे. योजनेसाठी ८५ हजार कोटी रूपये केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले आहेत. विमा आधारीत या योजनेतून प्रत्येक कुटुंबाला केंद्र सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रूपयांचे आरोग्य सुरक्षा कवच विनामूल्य दिले जाणार आहे. विमा कवचाचा निधी केंद्र सरकारकडून स्वतंत्रपणे दिला जाईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीayushman bharatआयुष्मान भारत