शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या प्रकाश सिंग बादलांना पंतप्रधान मोदींचा फोन, असं आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 17:04 IST

बादल यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहून संबंधित तीनही कृषी कायदे रद्द करण्याचे आवाहन केले आहे. एढेच नाही, तर या कायद्याने देशाला मोठ्या संकटात आणले आहे, असा दावाही त्यांनी केला होता.

नवी दिल्ली - केंद्राने तयार केलेल्या कृषी कायद्याला सुरुवातीपासूनच उघडपणे विरोध करणाऱ्या शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) नेते, तथा पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्याशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून चर्चा केली. यावेळी मोदींनी बादल यांना त्यांच्या 93व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. तत्पूर्वी, बादल यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहून संबंधित तीनही कृषी कायदे रद्द करण्याचे आवाहन केले आहे. एढेच नाही, तर या कायद्याने देशाला मोठ्या संकटात आणले आहे, असा दावाही त्यांनी केला होता. एवढेच नाही, तर बादल यांनी या कायद्याविरोधात पद्म विभूषण पुरस्कारही परत करण्याची घोषणा केली होती. 

दीर्घकाळ भाजपचा सहकारी राहिलेल्या अकाली दलाने कृषी कायद्याच्या मुद्द्यावरूनच राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबतचे (एनडीए) आपले नाते तोडले होते. त्यांची सून हरसिमरत कौर बादल यांनीही केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. कारण पंजाबमध्ये कृषी विधेयकांविरोधात आंदोलन सुरू होते.

आता अमित शाहंसोबत शेतकऱ्यांची चर्चा -'भारत बंद' आणि शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सायंकाळी सात वाजता शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली. ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, कारण अमित शहा यांनी ही बैठक अचानक बोलावली आहे. विशेष म्हणजे, याआधी सरकारने येत्या ९ डिसेंबरला शेतकऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेण्याचे ठरविले नवी दिल्ली: 'भारत बंद' आणि शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सायंकाळी सात वाजता शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली. ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, कारण अमित शहा यांनी ही बैठक अचानक बोलावली आहे. विशेष म्हणजे, याआधी सरकारने येत्या ९ डिसेंबरला शेतकऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेण्याचे ठरविले असताना ही बैठक बोलाविली आहे.

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शेतकऱ्यांकडून वाहतूक, दुकाने आणि इतर सेवा ठप्प करण्यात आली. यातच सकाळी अमित शहा यांच्याकडून बैठकीसंदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी नेते आज संध्याकाळी सात वाजता अमित शहा यांची भेट घेतील. ही बैठक अनौपचारिक असेल, असे म्हटले जात आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी मंगळवारी 'भारत बंद'ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध राज्यात अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीला जाणारे सर्व रस्ते शेतकऱ्यांनी बंद केले आहेत.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाबFarmer strikeशेतकरी संप