शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

नरेंद्र मोदी सरकार आता घालवायलाच हवे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 05:46 IST

सोनिया गांधी । देशातील घटनात्मक संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरूंसह अनेक नेत्यांनी स्थापन केलेल्या घटनात्मक संस्था नेस्तनाबूत करण्याचे कारस्थान गेल्या ५ वर्षांपासून सुरू असून लोकशाहीच्या आधारस्तंभ असलेल्या या संस्थांचे अस्तित्व टिकविण्यासाठी मोदी सरकारची गच्छंती आवश्यक असल्याचे मत यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी दिल्लीत व्यक्त केले.

सिव्हिल सोसायटीने आयोजिलेल्या ‘जनसरोकार’ संमेलनात सोनिया गांधी यांनीमोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. मोदी सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, मोदी सरकारच्या या देशाच्या आत्म्यावरच आघात केले आहेत. गेल्या ७० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या साऱ्या घटनात्मक संस्थांचे अस्तित्व संपवून टाकले आहे. देशाच्या विविधतेला विरोध करणारे स्वत:ला देशभक्त व इतरांना देशद्रोही म्हणत आहेत. लोकांच्या वेशभूषा व खानपानावर आक्षेप घेतले जात आहे.

यूपीएच्या काळात सिव्हिल सोसायटीच्या सहकार्याने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. सोसायटीच्या सदस्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेमध्ये स्थान दिले होते. परंतु सध्या काही उद्योजकांचे हित जोपासले जात आहे. सर्वसामान्य लोकांचे जीवनाची या सरकारचा काहीही संबंध राहिलेला नाही. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणण्यासाठी पुन्हा पुरोगामी विचाराचे सरकार सत्तेवर येण्याची गरज असल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले.

संमेलनाला सोनिया गांधी यांनी हजेरी लावली. यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, डी. राजा, कविता कृष्णन, खासदार मनोज झा आदी उपस्थित होते. संचालन सुनीलम यांनी केले.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधी