शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

नरेंद्र मोदी सरकार आता घालवायलाच हवे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 05:46 IST

सोनिया गांधी । देशातील घटनात्मक संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरूंसह अनेक नेत्यांनी स्थापन केलेल्या घटनात्मक संस्था नेस्तनाबूत करण्याचे कारस्थान गेल्या ५ वर्षांपासून सुरू असून लोकशाहीच्या आधारस्तंभ असलेल्या या संस्थांचे अस्तित्व टिकविण्यासाठी मोदी सरकारची गच्छंती आवश्यक असल्याचे मत यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी दिल्लीत व्यक्त केले.

सिव्हिल सोसायटीने आयोजिलेल्या ‘जनसरोकार’ संमेलनात सोनिया गांधी यांनीमोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. मोदी सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, मोदी सरकारच्या या देशाच्या आत्म्यावरच आघात केले आहेत. गेल्या ७० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या साऱ्या घटनात्मक संस्थांचे अस्तित्व संपवून टाकले आहे. देशाच्या विविधतेला विरोध करणारे स्वत:ला देशभक्त व इतरांना देशद्रोही म्हणत आहेत. लोकांच्या वेशभूषा व खानपानावर आक्षेप घेतले जात आहे.

यूपीएच्या काळात सिव्हिल सोसायटीच्या सहकार्याने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. सोसायटीच्या सदस्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेमध्ये स्थान दिले होते. परंतु सध्या काही उद्योजकांचे हित जोपासले जात आहे. सर्वसामान्य लोकांचे जीवनाची या सरकारचा काहीही संबंध राहिलेला नाही. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणण्यासाठी पुन्हा पुरोगामी विचाराचे सरकार सत्तेवर येण्याची गरज असल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले.

संमेलनाला सोनिया गांधी यांनी हजेरी लावली. यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, डी. राजा, कविता कृष्णन, खासदार मनोज झा आदी उपस्थित होते. संचालन सुनीलम यांनी केले.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधी