शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

नरेंद्र मोदींनी स्वत:ला अजिंक्य समजू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 04:58 IST

सोनिया गांधी; रायबरेली मतदारसंघातून भरला अर्ज

रायबरेली : आपण अजिंक्य आहोत, असा गैरसमज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून घेऊ नये, असा सल्ला देत पाच वर्षांत त्यांनी एकही आश्वासन पाळले नसल्याची टीका संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली.

सोनिया गांधी यांनी गुरुवारी येथे रोड शोद्वारे शक्तिप्रदर्शन करून रायबरेली लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी येथील काँग्रेस कार्यालयात हवनही केले. त्या वेळी त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधीही होत्या.अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य रॅलीमध्ये सोनिया यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, नरेंद्र मोदी आपण स्वत: अजिंक्य आहोत, असे समजतात. देशापेक्षाही आपण मोठे आहोत, असे त्यांना वाटते, त्यांच्यासारखेच अनेक जणांनाही तसेच वाटते. परंतु २00४चा इतिहास त्यांनी विसरू नये. अटल बिहारी वाजपेयी यांनाही असेच वाटत होते, परंतु जनतेने पुन्हा काँग्रेसला निवडून दिले होते, याची आठवण ठेवावी.

या वेळी राहुल गांधी यांनीही मोदी यांच्यावर टीका करून खुली चर्चा करण्यासाठी सामोरे यावे, असे आव्हान दिले. निकालाच्या दिवशी देशातले चित्र बदललेले असेल, असाही विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सोनिया गांधी व राहुल यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.

रायबरेली मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून सोनिया गांधी पाचव्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. (वृत्तसंस्था)९ मे रोजी मतदानया मतदारसंघात ९ मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. सोनिया यांची लढत काँग्रेस सोडून अलीकडेच भाजपमध्ये दाखल झालेल्या दिनेश प्रताप सिंग यांच्याशी होत आहे. मतदारसंघात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष आघाडीने उमेदवार दिलेला नाही.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी