शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

मोदीजी 'मन की बात' मध्ये नीरव मोदी आणि राफेल डीलविषयी बोला- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 15:55 IST

नीरव मोदीने २२ हजार कोटी रुपये कसे लुटले व त्याने पलायन कसे केले?

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या आगामी भागात नीरव मोदी आणि राफेल व्यवहाराविषयी बोलावे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटले की,  मोदीजी गेल्या महिन्यात 'मन की बात'साठी मी सुचविलेल्या विषयाकडे तुम्ही दुर्लक्ष केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांतील घडामोडींनंतर देशातील प्रत्येक नागरिकाला तुमच्याकडून काय ऐकायचे आहे, हे तुम्हाला उमगलेच असेल. तेव्हा 'मन की बात'साठी इतरांकडून सूचना मागवण्याची गरजच काय, असा सवाल राहुल यांनी विचारला. नीरव मोदीने २२ हजार कोटी रुपये कसे लुटले व त्याने पलायन कसे केले? ५८ हजार कोटी रुपयांचा राफेल विमान खरेदी व्यवहार या दोन मुद्द्यांवर तुम्ही बोललेच पाहिजे. मी तुमचे प्रवचन ऐकण्यासाठी उत्सुक आहे, असे राहुल यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यावरून पंतप्रधान मोदींना सातत्याने लक्ष्य करत आहेत. यापूर्वी राहुल यांनी जानेवारीमध्ये मोदी यांना ‘मन की बात’साठी राहुल यांनी बेरोजगारी, चीनची घुसखोरी व हरियाणातील बलात्कार हे विषय सुचवले होते. तसेच मोदींकडे विद्यार्थ्यांसाठी दोन तास आहेत, परंतु बँक घोटाळ्यावर बोलण्यासाठी दोन मिनिटेही नाहीत. असे वागणे बंद करा, अशी सूचना राहुल यांनी केली होती.

राहुल गांधी २४ फेब्रुवारी कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने त्यांनी तीनदिवसीय दौरा आखला आहे. बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाडमध्ये जाणार आहेत. त्यासाठी जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राहुल बसने प्रवास करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राहुल गांधी मंदिर, दर्ग्यावरही जातील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीMan ki Baatमन की बात