शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

आव्हानांना आव्हान देण्यासाठी निघालो आहे! CAA, अयोध्या, 370 यावरून मोदींचे सूचक विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 18:18 IST

सीएए (CAA) कायद्याविरोधात आंदोलन करताना हिंसाचार आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला

लखनऊ - केेंद्र सरकारने नुकत्याच मंजूर करून घेतलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (CAA) सध्या देशात मोठा वाद निर्माण झालेला आहे. मात्र असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेतृत्वाखालील सरकार यापुढेही असेच मोठे आणि कठोर निर्णय घेईल, असे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यापीठाच्या भूमीपूजनासाठी लखनऊ येथे आले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएए, राम मंदिर आणि कलम 370 यांचा उल्लेख करत काही समस्या आम्हाला वारशामध्ये मिळाल्याचे सांगितले. मात्र आम्ही आव्हानांना आव्हान देण्याच्या इराद्याने निघालो आहोत, असे सूचक विधान मोदींनी केले. राम मंदिराचा प्रश्न शांततापूर्ण मार्गाने निकाली निघाला आहे. फाळणी झाल्यापासून आतापर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील लाखो गरीब ज्यांच्यामध्ये दलित, वंचित शोषितांची संख्या अधिक आहे असे लोक आपल्या मुलीची अब्रू वाचवण्यासाठी भारतात आश्रयाला आले आहेत. अशा आश्रितांना नागरिकत्व देण्याचा तोडगा 130 कोली भारतीयांना काढला आहे. 

यावेळी सीएए कायद्याविरोधात आंदोलन करताना हिंसाचार आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला आणि त्यांच्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही आठवण करून दिली. ''उत्तर प्रदेशमध्ये काही लोकांना सीएएला विरोध म्हणून आंदोलन करताना हिंसाचार केला. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. असे नुकसान करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या घरात बसून आपण निवडलेला मार्ग योग्य होता का? आपली कृती योग्य होती का हे स्वत:लाच विचारून पाहावे. जी जाळपोळ करण्यात आली, ज्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. ते त्यांच्या मुलांच्या उपयोगी आले नसते का?''असा सवाल मोदींनी केला.

अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीदिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'अटल भूजल' योजनेचं उद्घाटनदरम्यान, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने अटल भूजल योजना सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल या नवीन योजनेचं उद्घाटन केलं आहे. अटल भूजल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यात येईल. तसेच ज्या भागांतील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे किंवा वेगाने घट होत आहे, अशा भागांत विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशमधील रोहतांग पास येथे तयार करण्यात आलेल्या बोगदा 'अटल टनल' नावाने ओळखले जाणार असल्याचे देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. अटल भूजल योजनेवर पाच वर्षामध्ये (2020-21 ते 2024-25) सहा हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा महाराष्ट्रासह हरयाणा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना होईल. ही सात राज्ये वाटत असली तरी या देशाचा ५० टक्के भाग आहेत. तसेच या सात राज्यांतील ७८ जिल्ह्यांमधील ८३०० गावांमधील पाणीपातळीची स्थिती खूपच गंभीर असल्याचे देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकUttar Pradeshउत्तर प्रदेश