शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

आव्हानांना आव्हान देण्यासाठी निघालो आहे! CAA, अयोध्या, 370 यावरून मोदींचे सूचक विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 18:18 IST

सीएए (CAA) कायद्याविरोधात आंदोलन करताना हिंसाचार आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला

लखनऊ - केेंद्र सरकारने नुकत्याच मंजूर करून घेतलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (CAA) सध्या देशात मोठा वाद निर्माण झालेला आहे. मात्र असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेतृत्वाखालील सरकार यापुढेही असेच मोठे आणि कठोर निर्णय घेईल, असे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यापीठाच्या भूमीपूजनासाठी लखनऊ येथे आले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएए, राम मंदिर आणि कलम 370 यांचा उल्लेख करत काही समस्या आम्हाला वारशामध्ये मिळाल्याचे सांगितले. मात्र आम्ही आव्हानांना आव्हान देण्याच्या इराद्याने निघालो आहोत, असे सूचक विधान मोदींनी केले. राम मंदिराचा प्रश्न शांततापूर्ण मार्गाने निकाली निघाला आहे. फाळणी झाल्यापासून आतापर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील लाखो गरीब ज्यांच्यामध्ये दलित, वंचित शोषितांची संख्या अधिक आहे असे लोक आपल्या मुलीची अब्रू वाचवण्यासाठी भारतात आश्रयाला आले आहेत. अशा आश्रितांना नागरिकत्व देण्याचा तोडगा 130 कोली भारतीयांना काढला आहे. 

यावेळी सीएए कायद्याविरोधात आंदोलन करताना हिंसाचार आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला आणि त्यांच्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही आठवण करून दिली. ''उत्तर प्रदेशमध्ये काही लोकांना सीएएला विरोध म्हणून आंदोलन करताना हिंसाचार केला. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. असे नुकसान करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या घरात बसून आपण निवडलेला मार्ग योग्य होता का? आपली कृती योग्य होती का हे स्वत:लाच विचारून पाहावे. जी जाळपोळ करण्यात आली, ज्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. ते त्यांच्या मुलांच्या उपयोगी आले नसते का?''असा सवाल मोदींनी केला.

अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीदिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'अटल भूजल' योजनेचं उद्घाटनदरम्यान, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने अटल भूजल योजना सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल या नवीन योजनेचं उद्घाटन केलं आहे. अटल भूजल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यात येईल. तसेच ज्या भागांतील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे किंवा वेगाने घट होत आहे, अशा भागांत विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशमधील रोहतांग पास येथे तयार करण्यात आलेल्या बोगदा 'अटल टनल' नावाने ओळखले जाणार असल्याचे देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. अटल भूजल योजनेवर पाच वर्षामध्ये (2020-21 ते 2024-25) सहा हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा महाराष्ट्रासह हरयाणा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना होईल. ही सात राज्ये वाटत असली तरी या देशाचा ५० टक्के भाग आहेत. तसेच या सात राज्यांतील ७८ जिल्ह्यांमधील ८३०० गावांमधील पाणीपातळीची स्थिती खूपच गंभीर असल्याचे देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकUttar Pradeshउत्तर प्रदेश