शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

PM Security: पंतप्रधानांची सुरक्षा राष्ट्रपतींच्या दरबारात; केंद्राकडून कठोर निर्णयाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 07:14 IST

पंजाब येथे हुसैनीवाला भागात शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी एका फ्लायओव्हरवर रोखला. तिथे मोदी यांना १५ ते २० मिनिटे अडकून पडावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंजाबमधील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या राज्याचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले होते. त्याची सविस्तर माहिती नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गुरुवारी भेट घेऊन दिली. सुरक्षेतील हलगर्जीपणाबद्दल राष्ट्रपतींनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पंजाबमधील घटनेची केंद्रीय गृहखाते माहिती गोळा करीत आहे. या राज्यात घडलेल्या प्रकारानंतर केंद्र सरकार अतिशय मोठे व कठोर निर्णय घेणार असल्याचे संकेत केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले.

पंजाब येथे हुसैनीवाला भागात शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी एका फ्लायओव्हरवर रोखला. तिथे मोदी यांना १५ ते २० मिनिटे अडकून पडावे लागले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा होणे, हा अतिशय गंभीर प्रकार आहे. 

राष्ट्रपती सचिवालयाने म्हटले आहे की, पंजाबमध्ये सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींची माहिती मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिली. मोदींच्या दौऱ्यात सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नाबद्दल कोविंद यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की, पंजाबमध्ये सुरक्षाविषयक जो प्रश्न निर्माण झाला, त्याची भविष्यात पुनरावृत्ती होऊ न देण्याची दक्षता घेतली यावी.पंजाबमधील घटनेबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत संताप व्यक्तपंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी तीव्र चिंता व संताप व्यक्त केला. या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही केंद्रीय मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. सुरक्षा त्रुटीला पंजाब सरकारच जबाबदार : राजनाथसिंह

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात असलेल्या सुरक्षा त्रुटींना तेथील राज्य सरकारच जबाबदार आहे. या चुकीबद्दल काँग्रेसला कधीही माफ करता येणार नाही, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेवरून सुरू असलेला वाद दुर्दैवी आहे. त्या पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेबाबत सर्वांनी नेहमीच दक्ष राहिले पाहिजे, असे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी म्हटले आहे.शेतकऱ्यांनी वर्षभर त्रास सहन केला : सिद्धू

रस्ता रोखला गेल्यामुळे मोदी यांना १५ मिनिटे त्रास सहन करावा लागला, पण अन्यायकारक नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षभर यातना भोगाव्या लागल्या आहेत अशी टीका पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर आज सुनावणीn पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामध्ये सुरक्षाविषयक त्रुटी आढळून आल्या, तसा प्रकार भविष्यात पुन्हा घडता कामा नये याकरिता सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. n ही याचिका आज, शुक्रवारी सुनावणीस घेण्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मान्य केले आहे. सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा ज्येष्ठ विधिज्ञ मणिंदरसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला होता.

सरकार पाडण्याचा डावपंजाबमध्ये पंतप्रधानांच्या जीवाला धोका होता असा खोटा प्रचार सुरू आहे. या राज्यात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथविण्याचा हा डाव आहे. पंतप्रधान हे देशाचे आदरणीय नेते असतात. पण ती आब न राखता मोदी सवंग पद्धतीने पंजाबमधील घटनेचा अर्थ लावत आहेत.    - चरणजितसिंग चन्नी, मुख्यमंत्री, पंजाब 

केंद्राची चौकशी समिती  पंतप्रधानांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटींची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह खात्याने एक समिती स्थापन केली आहे. सुरक्षा विभागाचे सचिव सुधीर सक्सेना, आयबीचे संचालक बलबीरसिंह, एसपीजीचे आयजी एस. सुरेश यांचा समावेश आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी