शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

PM Security: पंतप्रधानांची सुरक्षा राष्ट्रपतींच्या दरबारात; केंद्राकडून कठोर निर्णयाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 07:14 IST

पंजाब येथे हुसैनीवाला भागात शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी एका फ्लायओव्हरवर रोखला. तिथे मोदी यांना १५ ते २० मिनिटे अडकून पडावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंजाबमधील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या राज्याचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले होते. त्याची सविस्तर माहिती नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गुरुवारी भेट घेऊन दिली. सुरक्षेतील हलगर्जीपणाबद्दल राष्ट्रपतींनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पंजाबमधील घटनेची केंद्रीय गृहखाते माहिती गोळा करीत आहे. या राज्यात घडलेल्या प्रकारानंतर केंद्र सरकार अतिशय मोठे व कठोर निर्णय घेणार असल्याचे संकेत केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले.

पंजाब येथे हुसैनीवाला भागात शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी एका फ्लायओव्हरवर रोखला. तिथे मोदी यांना १५ ते २० मिनिटे अडकून पडावे लागले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा होणे, हा अतिशय गंभीर प्रकार आहे. 

राष्ट्रपती सचिवालयाने म्हटले आहे की, पंजाबमध्ये सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींची माहिती मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिली. मोदींच्या दौऱ्यात सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नाबद्दल कोविंद यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की, पंजाबमध्ये सुरक्षाविषयक जो प्रश्न निर्माण झाला, त्याची भविष्यात पुनरावृत्ती होऊ न देण्याची दक्षता घेतली यावी.पंजाबमधील घटनेबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत संताप व्यक्तपंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी तीव्र चिंता व संताप व्यक्त केला. या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही केंद्रीय मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. सुरक्षा त्रुटीला पंजाब सरकारच जबाबदार : राजनाथसिंह

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात असलेल्या सुरक्षा त्रुटींना तेथील राज्य सरकारच जबाबदार आहे. या चुकीबद्दल काँग्रेसला कधीही माफ करता येणार नाही, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेवरून सुरू असलेला वाद दुर्दैवी आहे. त्या पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेबाबत सर्वांनी नेहमीच दक्ष राहिले पाहिजे, असे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी म्हटले आहे.शेतकऱ्यांनी वर्षभर त्रास सहन केला : सिद्धू

रस्ता रोखला गेल्यामुळे मोदी यांना १५ मिनिटे त्रास सहन करावा लागला, पण अन्यायकारक नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षभर यातना भोगाव्या लागल्या आहेत अशी टीका पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर आज सुनावणीn पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामध्ये सुरक्षाविषयक त्रुटी आढळून आल्या, तसा प्रकार भविष्यात पुन्हा घडता कामा नये याकरिता सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. n ही याचिका आज, शुक्रवारी सुनावणीस घेण्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मान्य केले आहे. सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा ज्येष्ठ विधिज्ञ मणिंदरसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला होता.

सरकार पाडण्याचा डावपंजाबमध्ये पंतप्रधानांच्या जीवाला धोका होता असा खोटा प्रचार सुरू आहे. या राज्यात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथविण्याचा हा डाव आहे. पंतप्रधान हे देशाचे आदरणीय नेते असतात. पण ती आब न राखता मोदी सवंग पद्धतीने पंजाबमधील घटनेचा अर्थ लावत आहेत.    - चरणजितसिंग चन्नी, मुख्यमंत्री, पंजाब 

केंद्राची चौकशी समिती  पंतप्रधानांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटींची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह खात्याने एक समिती स्थापन केली आहे. सुरक्षा विभागाचे सचिव सुधीर सक्सेना, आयबीचे संचालक बलबीरसिंह, एसपीजीचे आयजी एस. सुरेश यांचा समावेश आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी