शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

दुस-या देशाच्या साधनसंपत्तीवर आमचा डोळा नाही : नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 03:45 IST

कोणत्याही देशाच्या साधनसंपत्तीचे शोषण करण्याचा भारताचा हेतू नाही आणि कोणाच्याही भूभागावरही आमचे लक्ष नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले. भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या संसदीय संमेलनात ते येथे बोलत होते. जागतिक स्तरावर भारताने विधायक भूमिका बजावलेली आहे, असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली : कोणत्याही देशाच्या साधनसंपत्तीचे शोषण करण्याचा भारताचा हेतू नाही आणि कोणाच्याही भूभागावरही आमचे लक्ष नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले. भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या संसदीय संमेलनात ते येथे बोलत होते. जागतिक स्तरावर भारताने विधायक भूमिका बजावलेली आहे, असेही ते म्हणाले.मोदी म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने कट्टरवादाचा मुकाबला केला जाऊ शकतो. जागतिक स्तरावर भारताने नेहमीच सकारात्मक भूमिका बजावलेली आहे. कोणत्याही देशासोबत आम्ही आमच्या धोरणाचे मूल्यांकन फायदा व तोटा या दृष्टीने करीत नाही. आम्ही त्याकडे मानवीय मूल्यांच्या दृष्टिकोनातून पाहतो. भारताचे विकासाचे मॉडल हे एका हाताने घ्या, दुसºया हाताने द्या अशा विचारांवर आधारित नाही. तर, संबंधितदेशाची गरज आणि प्राधान्य यांवर अवलंबून आहे.भारतीय वंशाच्या संसद सदस्यांचे हे पहिलेच संमेलन आहे. भारतीय वंशाच्या लोकांचा दिवस साजरा करणे २००३ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. महात्मा गांधी हे ९ जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. त्यामुळे हा दिवस भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी साजरा केला जातो.या संमेलनाला २२ देशांतील१२४ लोकप्रतिनिधी तसेच १५महापौर आाले होते. त्यात अमेरिकेतील दोन महापौरही होते. इंग्लंडमधून १५, न्यूझीलंडमधून ३, कॅनडातून ५ लोकप्रतिनिधी उपस्थित होते. गियानातूने भारतीय वंशाचे २० लोकप्रतिनिधी आले होते, तर स्वित्झर्लंडमधून १, मॉरिशसमधून११, सूरिनाममधून ९ लोकप्रतिनिधी हजर होते.केनिया, फिलापाइन्स, पोर्तुगाल, टांझानिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांतूनही भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधीही आले होते. सार्कपैकी केवळ श्रीलंकेतून भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी आले होते. पाकिस्तान व बांगलादेशातून कोणीही उपस्थित नव्हते.तीन वर्षांत सर्वाधिक गुंतवणूकमोदी म्हणाले की,देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीतील अर्धीगुंतवणूक गेल्या तीन वर्षात झाली आहे. मागील वर्षी देशात रेकॉर्ड १६ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे.या तीन - चार वर्षात भारतात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. आमच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. भारतीय लोकांच्या आशा अपेक्षाही वाढल्या आहेत. देशातील हे परिवर्तन अनेक क्षेत्रात दिसून येत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी