शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

दुस-या देशाच्या साधनसंपत्तीवर आमचा डोळा नाही : नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 03:45 IST

कोणत्याही देशाच्या साधनसंपत्तीचे शोषण करण्याचा भारताचा हेतू नाही आणि कोणाच्याही भूभागावरही आमचे लक्ष नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले. भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या संसदीय संमेलनात ते येथे बोलत होते. जागतिक स्तरावर भारताने विधायक भूमिका बजावलेली आहे, असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली : कोणत्याही देशाच्या साधनसंपत्तीचे शोषण करण्याचा भारताचा हेतू नाही आणि कोणाच्याही भूभागावरही आमचे लक्ष नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले. भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या संसदीय संमेलनात ते येथे बोलत होते. जागतिक स्तरावर भारताने विधायक भूमिका बजावलेली आहे, असेही ते म्हणाले.मोदी म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने कट्टरवादाचा मुकाबला केला जाऊ शकतो. जागतिक स्तरावर भारताने नेहमीच सकारात्मक भूमिका बजावलेली आहे. कोणत्याही देशासोबत आम्ही आमच्या धोरणाचे मूल्यांकन फायदा व तोटा या दृष्टीने करीत नाही. आम्ही त्याकडे मानवीय मूल्यांच्या दृष्टिकोनातून पाहतो. भारताचे विकासाचे मॉडल हे एका हाताने घ्या, दुसºया हाताने द्या अशा विचारांवर आधारित नाही. तर, संबंधितदेशाची गरज आणि प्राधान्य यांवर अवलंबून आहे.भारतीय वंशाच्या संसद सदस्यांचे हे पहिलेच संमेलन आहे. भारतीय वंशाच्या लोकांचा दिवस साजरा करणे २००३ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. महात्मा गांधी हे ९ जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. त्यामुळे हा दिवस भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी साजरा केला जातो.या संमेलनाला २२ देशांतील१२४ लोकप्रतिनिधी तसेच १५महापौर आाले होते. त्यात अमेरिकेतील दोन महापौरही होते. इंग्लंडमधून १५, न्यूझीलंडमधून ३, कॅनडातून ५ लोकप्रतिनिधी उपस्थित होते. गियानातूने भारतीय वंशाचे २० लोकप्रतिनिधी आले होते, तर स्वित्झर्लंडमधून १, मॉरिशसमधून११, सूरिनाममधून ९ लोकप्रतिनिधी हजर होते.केनिया, फिलापाइन्स, पोर्तुगाल, टांझानिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांतूनही भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधीही आले होते. सार्कपैकी केवळ श्रीलंकेतून भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी आले होते. पाकिस्तान व बांगलादेशातून कोणीही उपस्थित नव्हते.तीन वर्षांत सर्वाधिक गुंतवणूकमोदी म्हणाले की,देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीतील अर्धीगुंतवणूक गेल्या तीन वर्षात झाली आहे. मागील वर्षी देशात रेकॉर्ड १६ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे.या तीन - चार वर्षात भारतात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. आमच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. भारतीय लोकांच्या आशा अपेक्षाही वाढल्या आहेत. देशातील हे परिवर्तन अनेक क्षेत्रात दिसून येत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी