शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

नरेंद्र मोदी, नवीन पटनायक यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, राहुल गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 05:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या आहेत असा आरोप काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.

भवानीपटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या आहेत असा आरोप काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला. काँग्रेसच आदिवासींच्या हक्काचे रक्षण करील असेही त्यांनी सांगितले.जाहीर सभेत ते म्हणाले की, दलित, आदिवासी, शेतकरी, गरीब यांचे भले करण्यात केंद्रातील भाजपा व ओडिशातील नवीन पटनायक सरकार अपयशी ठरले आहे. राहुल गांधी यांचा दहा दिवसांतील ओडिशाचा दुसरा दौरा आहे. या राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार आहेत.ते म्हणाले की, भाजपा व बिजू जनता दल फक्त आपल्या उद्योगपती मित्रांच्या कल्याणासाठी झटत असून गरीब व शेतकऱ्यांकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. मोदी सरकारने १५ उद्योगपतींचे ३.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. पण शेतकºयांना कर्जमाफी देण्यास नकार दिला. काँग्रेसने छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये सत्तेवर आल्यानंतर दोनच दिवसांत शेतकºयांना कर्जमाफी दिली. उद्योगांसाठी संपादित केलेल्या जमिनींवर पाच वर्षांच्या विहित मुदतीत उद्योग उभे न राहिल्यास त्या जमिनी मूळ मालकांना परत करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. (वृत्तसंस्था)मोदी ‘जुमला राजा' तर त्यांची राजवट ‘चौपट राज'पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जुमला राजा' तर त्यांची राजवट ‘चौपट राज' असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. दु:स्थितीत असलेले शेतकरी व बेरोजगारी या प्रश्नांवरून त्यांनी मोदींवर शरसंधान केले आहे. यासंदर्भातील टष्ट्वीटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, मोदींच्या राज्यात शेतकºयांच्या पिकाला योग्य भाव, युवकांच्या हाताला काम मिळत नाही. मोदी दिलेली आश्वासनेपूर्ण करू शकलेले नाहीत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण