शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Narendra Modi: कोविडकाळात मोदींनी जमिनीवरचं काम केलंय, खा. राणांकडून पंतप्रधानांचं कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 16:43 IST

खासदार राणा यांनी मोदींवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिलंय. मोदींनी पालखी मार्ग महराष्ट्रात दिला.

नवी दिल्ली - लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या पराभवांचे वाभाडे काढले आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत होते. तेव्हा त्यांनी काँग्रेसने कोरोना काळात हद्द पार केल्याचा आरोप केला. कोरोना देशभरात काँग्रेसने पसरविल्याचा गंभीर आरोप केला आहे. मोदींच्या या आरोपामुळे काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला. तसेच, राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही मोदींवर टीका केली. मात्र, आता खासदार नवनीत राणा यांनी मोदींची पाठराखण केल्याचं दिसून येत आहे. 

खासदार राणा यांनी मोदींवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिलंय. मोदींनी पालखी मार्ग महराष्ट्रात दिला. 12,294 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे, ज्या मार्गाचा वापर देशातील सर्वच भक्त आणि महाराष्ट्राची जनता भविष्यात करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या पालखीमार्गाचे भूमीपूजन झाले. समृद्धी महामार्गालाही केंद्र सरकारने पैसे दिले, नागपूर-मुंबईला जोडणार हा मार्ग आहे. 701 किमीचा हा रस्ता असून अंदाजे 55 हजार कोटी रुपये यासाठी खर्च येणार आहे. या रस्त्याचं काम केंद्र सरकारने केलं आणि नाव देण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केल्याचं राणा यांनी म्हटलं. 

महाराष्ट्रात नवीन रेल्वे लाईन, अनेक मेट्रो प्रोजेक्टही सरकारने केले. उडान योजनेंतर्गत आता नुकतेच सिंधुदुर्गात विमानतळ बनविण्यात आले आहे. नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथेही उद्घाटन झाले आहेत. पंतप्रधानांनी कोविड काळात हात वर नाहीत केले, तर जमिनीवरचं काम केलंय. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी केवळ आरोप केले, ते शेतकऱ्यांवर बोलले नाहीत, ते गरिबांबाबत बोलले नाहीत, ना घरकुलबाबत बोलले, ना इंडस्ट्रीबाबत बोलले, असे म्हणत शिवसेनेवरही हल्लाबोल केला. 

काँग्रेसचा तीव्र संताप

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी संसदेत करोना प्रसाराबाबत काँग्रेस व महाविकास आघाडी सरकारबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. नागपुरातील संविधान चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन' करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध नोंदवला. तर, अमरावतीतही काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसून आलं. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी कोविड काळातील कामाचे फोटो शेअर करत मोदींना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. 

काय म्हणाले होते मोदी

पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत होता. काँग्रेसवाले ही परिस्थिती कशी बिघडेल याची वाट पाहत होते. जेव्हा डब्ल्यूएचओ सांगत होते की लोकांनी आहे तिथेच थांबावे, जगाला हा संदेश दिला जात होता. परंतू काँग्रेसने तेव्हा हद्द पार केली, महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीतही गाड्यांवर माईक लावून लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी जाण्यासाठी सांगितले जात होते, असा आरोप मोदी यांनी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीnavneet kaur ranaनवनीत कौर राणाMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना