शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली; शेतकरी संपन्न झाला, तर भारत आत्मनिर्भर होईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 11:38 IST

हा  रेडिओ कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅप्पवर ऐकता येऊ शकते. 

नवी दिल्ली -पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आपला मासिक कार्यक्रम मनकी बातच्या माध्यमातून आज (रविवारी) जनतेशी संवाद साधतला. या कार्यक्रमात मोदी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत असतात. हा  रेडिओ कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅपवर ऐकता येऊ शकतो. हिंदी प्रसारणानंतर हा कार्यक्रम आकाशवाणीवर वेगवेगळ्या भाषांमध्येदेखील प्रसारित होतो. आजच्या कार्यक्रमात मोदींनी काही प्रसंग सांगितले, तसेच  महात्मा गांधी, भगत सिंग, जयप्रकाश नारायन आणि नानाजी देशमुख यांच्यासह शेती आणि शेतकरी या मुद्द्यांवरही भाष्य केले.

मनकी बात आपडेट्स - 

- कोरोना काळात अधिक काळजी बाळगा, जोवर यावर औषध उपलब्ध होत नाही, तोवर कसल्याही प्रकारचा निष्काळजी करू नका

- यावेळी मोदींनी जय प्रकाश नारायन आणि नानाजी देशमूख यांच्यावरही भाष्य केले. 

- गांधीजींच्या आर्थिक विचारावर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसती. महात्मा गांधींच्या आर्थिक चिंतनात भारताच्या नसा-नसाचा विचार होता - मोदी

- मोदी म्हणाले, २ ऑक्टोबर आपल्या सर्वांसाठी प्रेरणादाई दिवस आहे. हा दिवस महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. गांधीजींचे विचार आणि आदर्श आज पूर्वीपेक्षाही अधिक प्रासंगिक आहेत.

- भगत सिंग अखेरपर्यंत एका मिशन साठी जगले. ते मिशन भारताना अन्याय आणि इंग्रजी शासनापासून मुक्ती देणे.

- भगत सिंग क्रांतिकारकाबरोबरच चिंतकही होते. लाला लाजपत राय यांच्या प्रती त्यांचे समर्पण होते.

- शहीद वीर भगत सिंगांना मी नमन करतो.

- शेतीला जेवढे आधुनिक करू ती तेवढी फुलेल.

- आज शेतकऱ्याला आपल्या इच्छेप्रमाणे उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे - मोदी

- मोदी म्हणाले, शेतकरी शक्तीशाली होणे आवश्यक, तो संपन्न झाला तरच आत्मनिर्भर भारताचा पाया तयार होईल. शेतकरी संपन्न झाला, तर भारत आत्मनिर्भर होईल. 

-पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली आहे. देशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल. 

- पंतप्रधान मोदी म्हणाले, मी अपल्या जीनात प्रचंड फिरलो आहे. रोज नवे गाव, नवे लोक, नवे कुटुंब. भारतात गोष्टी अथवा किस्से सांगण्याची एक जुणी आणि संमृद्ध परंपरा आहे.

- मोदी म्हणाले, प्रत्येक कुटुंबात वृद्ध व्यक्ती, गोष्टी सांगायचे आणि यामुळे घरात नवी उर्जा निर्माण व्हायची.

जेव्हा एखादी आई आपल्या छोट्या मुलाला झोपवण्यासाठी अथवा जेवन देताना गोष्ट सांगते तेव्हा, गोष्टींमध्ये किती सामर्थ आहे, हे कळते.

- आपल्या संबोधनात मोदींनी जनतेला कोरोना काळात सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. मोदी म्हणाले कोरोना काळात दोन मिटरचे अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे. 

- दोन मिटरचे अंतर कोरोना काळात एक आवश्यकता बनली आहे. मात्र, या संकटाच्या काळानेच कुटुंबातील सदस्यांना जोडण्याचे आणि जवळ आणण्याचेही काम केले आहे. आपल्याला नक्कीच जाणीव झाली असेल, की आपल्या पूर्वजांनी जे नियम तयार केले होते, ते आजही किती महत्वाचे आहेत आणि जेव्हा त्यांचे पालन होत नाही, तेव्हा काय होते.

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndiaभारत