शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Enemy Property : तुमच्याकडेही आहे अशा प्रकारची Property? मोदी सरकार घेणार स्ट्रिक्ट अ‍ॅक्शन, अत्ताच व्हा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 17:01 IST

शत्रू संपत्तीची ओळख पटल्यानंतर, आता ती कब्जा मुक्त करण्यासाठी सरकारकडून मोहीम राबविली जाणार आहे. याच बरोबर जर एखाद्या जमिनीवर बांधकाम सुरू असेल, तर ही  जमीनही सरकारकडून कब्जामुक्त करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून मालमत्तेत करण्यात येणारी गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. यामुळेच मालमत्तेच्या किमती झपाट्याने वाढताना दिसत आहेत. परिणामी गुंतवणूकही वाढली आहे. पण जर तुम्ही चुकून शत्रूची मालमत्ता खरेदी केली असेल आणि तुम्ही त्याचे मालक असाल, तर तुम्ही सावध होणे आवश्यक आहे. एवढेच नाही, तर तुम्ही शत्रूच्या एखाद्या संपत्तीवर कब्जा केला असेल तरीही, तुम्हाला सतर्क राहणे आवश्यक आहे. कारण, मोदी सरकार देशातील शत्रू संपत्तीसंदर्भात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

कब्‍जा मुक्‍त करून करण्यात येणार लिलाव - शत्रू संपत्तीची ओळख पटल्यानंतर, आता ती कब्जा मुक्त करण्यासाठी सरकारकडून मोहीम राबविली जाणार आहे. याच बरोबर जर एखाद्या जमिनीवर बांधकाम सुरू असेल, तर ही  जमीनही सरकारकडून कब्जामुक्त करण्यात येणार आहे. यासाठी सरकार घरे, दुकाने अथवा प्‍लॉटचाही लिलाव करेल. महत्वाचे म्हणजे, जर एखादी व्यक्ती अथवा तिच्या कुटूंबाचा शत्रू संपत्‍त‍ीवर कब्जा असेल, तर लिलावात संबंधित सपत्ती खरेदी करण्याचा पहिला अधिकार त्या व्‍यक्‍त‍ीलाच दिला जाईल, अशा पर्यायावरही सरकार विचार करत आहे.

देशात शत्रू संपत्तीची एकूण संख्या 12 हजार 615 -लिलावादरम्यान शत्रू संपत्‍त‍ीची खरेदी करून ती वैधरित्या आपल्याकडे ठेऊ शकता. शत्रू संपत्ती अतिक्रमण मुक्त करण्याची प्रक्रिया प्रथम उत्तर प्रदेशातील नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथून सुरू होईल. देशातील सर्वाधिक शत्रू संपत्‍त‍ी उत्तर प्रदेशात आहे. देशभरात एकूण 12 हजार 615 शत्रू संपत्तीची ओळख पटली आहे. मात्र, यातील सर्वाधिक 6255 शत्रू संपत्ती यूपीमध्ये आहे. यांपैकी 3797 शत्रू संपत्तीची ओळख पटली आहे. यूनंतर सर्वाधिक शत्रू संपत्ती पश्चिम बंगालमध्ये आहे.

शत्रू संपत्ती म्हणजे काय? -देशाची फाळणी झाली त्यानंतर, 1962, 65 आणि 1971 च्या युद्धाच्या युद्धात असे लोक जे देश सोडून पाकिस्तानात गेले. ते दुसऱ्या देशात गेल्याने त्यांची संपत्ती जसे घर, दुकान अथवा जमीन भारतातच राहिली आहे. त्याला शत्रू संपत्ती म्हटले जाते. प्रत्येक राज्यात सरकारकडून हजारो शत्रू संपत्तींची ओळख पटवण्यात आली आहे. 1962 च्या संरक्षण कायद्यानुसार सरकारला शत्रूची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInvestmentगुंतवणूकBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार