शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

Enemy Property : तुमच्याकडेही आहे अशा प्रकारची Property? मोदी सरकार घेणार स्ट्रिक्ट अ‍ॅक्शन, अत्ताच व्हा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 17:01 IST

शत्रू संपत्तीची ओळख पटल्यानंतर, आता ती कब्जा मुक्त करण्यासाठी सरकारकडून मोहीम राबविली जाणार आहे. याच बरोबर जर एखाद्या जमिनीवर बांधकाम सुरू असेल, तर ही  जमीनही सरकारकडून कब्जामुक्त करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून मालमत्तेत करण्यात येणारी गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. यामुळेच मालमत्तेच्या किमती झपाट्याने वाढताना दिसत आहेत. परिणामी गुंतवणूकही वाढली आहे. पण जर तुम्ही चुकून शत्रूची मालमत्ता खरेदी केली असेल आणि तुम्ही त्याचे मालक असाल, तर तुम्ही सावध होणे आवश्यक आहे. एवढेच नाही, तर तुम्ही शत्रूच्या एखाद्या संपत्तीवर कब्जा केला असेल तरीही, तुम्हाला सतर्क राहणे आवश्यक आहे. कारण, मोदी सरकार देशातील शत्रू संपत्तीसंदर्भात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

कब्‍जा मुक्‍त करून करण्यात येणार लिलाव - शत्रू संपत्तीची ओळख पटल्यानंतर, आता ती कब्जा मुक्त करण्यासाठी सरकारकडून मोहीम राबविली जाणार आहे. याच बरोबर जर एखाद्या जमिनीवर बांधकाम सुरू असेल, तर ही  जमीनही सरकारकडून कब्जामुक्त करण्यात येणार आहे. यासाठी सरकार घरे, दुकाने अथवा प्‍लॉटचाही लिलाव करेल. महत्वाचे म्हणजे, जर एखादी व्यक्ती अथवा तिच्या कुटूंबाचा शत्रू संपत्‍त‍ीवर कब्जा असेल, तर लिलावात संबंधित सपत्ती खरेदी करण्याचा पहिला अधिकार त्या व्‍यक्‍त‍ीलाच दिला जाईल, अशा पर्यायावरही सरकार विचार करत आहे.

देशात शत्रू संपत्तीची एकूण संख्या 12 हजार 615 -लिलावादरम्यान शत्रू संपत्‍त‍ीची खरेदी करून ती वैधरित्या आपल्याकडे ठेऊ शकता. शत्रू संपत्ती अतिक्रमण मुक्त करण्याची प्रक्रिया प्रथम उत्तर प्रदेशातील नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथून सुरू होईल. देशातील सर्वाधिक शत्रू संपत्‍त‍ी उत्तर प्रदेशात आहे. देशभरात एकूण 12 हजार 615 शत्रू संपत्तीची ओळख पटली आहे. मात्र, यातील सर्वाधिक 6255 शत्रू संपत्ती यूपीमध्ये आहे. यांपैकी 3797 शत्रू संपत्तीची ओळख पटली आहे. यूनंतर सर्वाधिक शत्रू संपत्ती पश्चिम बंगालमध्ये आहे.

शत्रू संपत्ती म्हणजे काय? -देशाची फाळणी झाली त्यानंतर, 1962, 65 आणि 1971 च्या युद्धाच्या युद्धात असे लोक जे देश सोडून पाकिस्तानात गेले. ते दुसऱ्या देशात गेल्याने त्यांची संपत्ती जसे घर, दुकान अथवा जमीन भारतातच राहिली आहे. त्याला शत्रू संपत्ती म्हटले जाते. प्रत्येक राज्यात सरकारकडून हजारो शत्रू संपत्तींची ओळख पटवण्यात आली आहे. 1962 च्या संरक्षण कायद्यानुसार सरकारला शत्रूची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInvestmentगुंतवणूकBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार