शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

तिहेरी तलाकवर अध्यादेश काढता, मग राम मंदिरासाठी का नाही?; शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 18:18 IST

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारला सवाल

लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात व्हायला हवी, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार एससी-एसटी कायदा आणि तिहेरी तलाकबद्दल अध्यादेश काढतं. मग त्यांनी राम मंदिराबद्दलही अध्यादेश काढावा, असं राऊत म्हणाले. खासदार संजय राऊत सध्या अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत मोदी सरकारवर निशाणा साधला. अयोध्या दौऱ्यादरम्यान अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी बांधण्यात आलेल्या अतिथीगृहात थांबलेल्या संजय राऊत यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरुन मोदी सरकाराला लक्ष्य केलं. 'केंद्र आणि राज्यात भाजपाचं सरकार आहे. इतकंच काय, राष्ट्रपती भवनातही भाजपाची सत्ता आहे. अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आता मंदिर उभारलं नाही, तर मग कधी उभारणार?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तिहेरी तलाकविरोधात अध्यादेश आणणाऱ्या मोदी सरकारवर संजय राऊत यांनी सडकून टीका केली. 'एससी-एसटी कायदा, तिहेरी तलाकबद्दल अध्यादेश आणता. मग राम मंदिरासाठी अध्यादेश का काढला जात नाही?,' असा प्रश्न त्यांनी विचारला. अयोध्येत आजही राम तुरुंगात आहेत. त्यांना जास्त काळ या स्थितीत ठेवता येणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं. लवकरच सर्वोच्च न्यायालयात अयोध्येतील राम जन्मभूमी प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे. या न्यायालयीन प्रक्रियेवरदेखील त्यांनी भाष्य केलं. आस्थेचा निर्णय न्यायालयात होऊ शकत नाही. या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय कोणी मान्यदेखील करणार नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी या प्रकरणात अध्यादेश काढावा, असं ते म्हणाले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा