शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी तलाकवर अध्यादेश काढता, मग राम मंदिरासाठी का नाही?; शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 18:18 IST

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारला सवाल

लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात व्हायला हवी, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार एससी-एसटी कायदा आणि तिहेरी तलाकबद्दल अध्यादेश काढतं. मग त्यांनी राम मंदिराबद्दलही अध्यादेश काढावा, असं राऊत म्हणाले. खासदार संजय राऊत सध्या अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत मोदी सरकारवर निशाणा साधला. अयोध्या दौऱ्यादरम्यान अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी बांधण्यात आलेल्या अतिथीगृहात थांबलेल्या संजय राऊत यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरुन मोदी सरकाराला लक्ष्य केलं. 'केंद्र आणि राज्यात भाजपाचं सरकार आहे. इतकंच काय, राष्ट्रपती भवनातही भाजपाची सत्ता आहे. अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आता मंदिर उभारलं नाही, तर मग कधी उभारणार?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तिहेरी तलाकविरोधात अध्यादेश आणणाऱ्या मोदी सरकारवर संजय राऊत यांनी सडकून टीका केली. 'एससी-एसटी कायदा, तिहेरी तलाकबद्दल अध्यादेश आणता. मग राम मंदिरासाठी अध्यादेश का काढला जात नाही?,' असा प्रश्न त्यांनी विचारला. अयोध्येत आजही राम तुरुंगात आहेत. त्यांना जास्त काळ या स्थितीत ठेवता येणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं. लवकरच सर्वोच्च न्यायालयात अयोध्येतील राम जन्मभूमी प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे. या न्यायालयीन प्रक्रियेवरदेखील त्यांनी भाष्य केलं. आस्थेचा निर्णय न्यायालयात होऊ शकत नाही. या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय कोणी मान्यदेखील करणार नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी या प्रकरणात अध्यादेश काढावा, असं ते म्हणाले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा