शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

तिहेरी तलाकवर अध्यादेश काढता, मग राम मंदिरासाठी का नाही?; शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 18:18 IST

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारला सवाल

लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात व्हायला हवी, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार एससी-एसटी कायदा आणि तिहेरी तलाकबद्दल अध्यादेश काढतं. मग त्यांनी राम मंदिराबद्दलही अध्यादेश काढावा, असं राऊत म्हणाले. खासदार संजय राऊत सध्या अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत मोदी सरकारवर निशाणा साधला. अयोध्या दौऱ्यादरम्यान अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी बांधण्यात आलेल्या अतिथीगृहात थांबलेल्या संजय राऊत यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरुन मोदी सरकाराला लक्ष्य केलं. 'केंद्र आणि राज्यात भाजपाचं सरकार आहे. इतकंच काय, राष्ट्रपती भवनातही भाजपाची सत्ता आहे. अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आता मंदिर उभारलं नाही, तर मग कधी उभारणार?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तिहेरी तलाकविरोधात अध्यादेश आणणाऱ्या मोदी सरकारवर संजय राऊत यांनी सडकून टीका केली. 'एससी-एसटी कायदा, तिहेरी तलाकबद्दल अध्यादेश आणता. मग राम मंदिरासाठी अध्यादेश का काढला जात नाही?,' असा प्रश्न त्यांनी विचारला. अयोध्येत आजही राम तुरुंगात आहेत. त्यांना जास्त काळ या स्थितीत ठेवता येणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं. लवकरच सर्वोच्च न्यायालयात अयोध्येतील राम जन्मभूमी प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे. या न्यायालयीन प्रक्रियेवरदेखील त्यांनी भाष्य केलं. आस्थेचा निर्णय न्यायालयात होऊ शकत नाही. या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय कोणी मान्यदेखील करणार नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी या प्रकरणात अध्यादेश काढावा, असं ते म्हणाले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा