शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

नरेंद्र मोदी बिनकामाचे, कुणाचेही ऐकत नाहीत, राहुल गांधीची घणाघाती टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 08:33 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला केला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाभारताच्या विकासाची गाथा काँग्रेसने लिहिली. मात्र मोदींनी नोटाबंदी आणि गब्बर सिंह टॅक्सचा वापर करून त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केलेपंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिनकामाचे व्यक्ती असून, कुणाचेही ऐकत नाहीत

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला केला आहे.  भारताच्या विकासाची गाथा काँग्रेसने लिहिली. मात्र मोदींनी नोटाबंदी आणि गब्बर सिंह टॅक्सचा वापर करून त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिनकामाचे व्यक्ती असून, कुणाचेही ऐकत नाहीत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.  आगामी लोकसभा निवडणुकीत नोटाबंदी आणि जीएसटी मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश म्हणून समोर येईल, अशा आशयाची बातमी आपल्या  ट्विटर अकाऊंटवरून शेअर करताना राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली. काँग्रेसने देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मात्र मोदींनी नोटाबंदी आणि जीएसटी लावून देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, अशा आशयाचे ट्विट  मोदींनी केले आहे. राहुल गांधी नोटाबंदी आणि जीएसटीवरून मोदी सरकारवर सातत्याने जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, गेल्या वर्षभरात देशात एक कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अनिल अंबानींकडून चोऱ्या करवत राहिलेत. मोदींनी जर अनिल अंबानींना चोऱ्या करू देण्याऐवजी देशासाठी काम केले असते तर देशातील तरुणांचे भविष्य एवढे असुरक्षित झाले नसते, असा टोला लगावला होता. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा काँग्रेसवर जोरदार टीका करत आहेत.  काँग्रेसनं देशवासीयांच्या डोळ्यात धूळफेक केली, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीराफेल डीलवरून पलटवार केला आहे. काँग्रेसकडून संसदेसारख्या पवित्र वास्तूचा वापर स्वत:च्या मनोरंजनासाठी केला जात आहे. त्यांचा हा प्रयत्न संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी हाणून पाडला, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. 'देशवासीयांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्यांना, देशाच्या सुरक्षेबद्दल हलगर्जीपणा करणाऱ्यांना, आपल्या मनोरंजनासाठी पवित्र संसदेचा वापर करणाऱ्यांना संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी उघडं पाडलं आहे. 2004 ते 2014 या कालावधीत केंद्र सरकारनं देशाच्या सैन्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कट रचला. आता आमचं सरकार या कट कारस्थानातून देशाला बाहेर काढू पाहतं आहे. मात्र हे त्यांच्या डोळ्यात खुपतं आहे,' अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं.

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी