शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
3
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
4
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
5
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
6
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
7
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
8
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
9
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
10
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
11
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
12
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
13
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
14
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
15
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
16
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
17
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
18
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
20
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

नरेंद्र मोदी बिनकामाचे, कुणाचेही ऐकत नाहीत, राहुल गांधीची घणाघाती टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 08:33 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला केला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाभारताच्या विकासाची गाथा काँग्रेसने लिहिली. मात्र मोदींनी नोटाबंदी आणि गब्बर सिंह टॅक्सचा वापर करून त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केलेपंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिनकामाचे व्यक्ती असून, कुणाचेही ऐकत नाहीत

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला केला आहे.  भारताच्या विकासाची गाथा काँग्रेसने लिहिली. मात्र मोदींनी नोटाबंदी आणि गब्बर सिंह टॅक्सचा वापर करून त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिनकामाचे व्यक्ती असून, कुणाचेही ऐकत नाहीत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.  आगामी लोकसभा निवडणुकीत नोटाबंदी आणि जीएसटी मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश म्हणून समोर येईल, अशा आशयाची बातमी आपल्या  ट्विटर अकाऊंटवरून शेअर करताना राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली. काँग्रेसने देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मात्र मोदींनी नोटाबंदी आणि जीएसटी लावून देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, अशा आशयाचे ट्विट  मोदींनी केले आहे. राहुल गांधी नोटाबंदी आणि जीएसटीवरून मोदी सरकारवर सातत्याने जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, गेल्या वर्षभरात देशात एक कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अनिल अंबानींकडून चोऱ्या करवत राहिलेत. मोदींनी जर अनिल अंबानींना चोऱ्या करू देण्याऐवजी देशासाठी काम केले असते तर देशातील तरुणांचे भविष्य एवढे असुरक्षित झाले नसते, असा टोला लगावला होता. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा काँग्रेसवर जोरदार टीका करत आहेत.  काँग्रेसनं देशवासीयांच्या डोळ्यात धूळफेक केली, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीराफेल डीलवरून पलटवार केला आहे. काँग्रेसकडून संसदेसारख्या पवित्र वास्तूचा वापर स्वत:च्या मनोरंजनासाठी केला जात आहे. त्यांचा हा प्रयत्न संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी हाणून पाडला, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. 'देशवासीयांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्यांना, देशाच्या सुरक्षेबद्दल हलगर्जीपणा करणाऱ्यांना, आपल्या मनोरंजनासाठी पवित्र संसदेचा वापर करणाऱ्यांना संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी उघडं पाडलं आहे. 2004 ते 2014 या कालावधीत केंद्र सरकारनं देशाच्या सैन्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कट रचला. आता आमचं सरकार या कट कारस्थानातून देशाला बाहेर काढू पाहतं आहे. मात्र हे त्यांच्या डोळ्यात खुपतं आहे,' अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं.

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी