शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

नरेंद्र मोदी बिनकामाचे, कुणाचेही ऐकत नाहीत, राहुल गांधीची घणाघाती टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 08:33 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला केला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाभारताच्या विकासाची गाथा काँग्रेसने लिहिली. मात्र मोदींनी नोटाबंदी आणि गब्बर सिंह टॅक्सचा वापर करून त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केलेपंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिनकामाचे व्यक्ती असून, कुणाचेही ऐकत नाहीत

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला केला आहे.  भारताच्या विकासाची गाथा काँग्रेसने लिहिली. मात्र मोदींनी नोटाबंदी आणि गब्बर सिंह टॅक्सचा वापर करून त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिनकामाचे व्यक्ती असून, कुणाचेही ऐकत नाहीत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.  आगामी लोकसभा निवडणुकीत नोटाबंदी आणि जीएसटी मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश म्हणून समोर येईल, अशा आशयाची बातमी आपल्या  ट्विटर अकाऊंटवरून शेअर करताना राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली. काँग्रेसने देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मात्र मोदींनी नोटाबंदी आणि जीएसटी लावून देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, अशा आशयाचे ट्विट  मोदींनी केले आहे. राहुल गांधी नोटाबंदी आणि जीएसटीवरून मोदी सरकारवर सातत्याने जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, गेल्या वर्षभरात देशात एक कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अनिल अंबानींकडून चोऱ्या करवत राहिलेत. मोदींनी जर अनिल अंबानींना चोऱ्या करू देण्याऐवजी देशासाठी काम केले असते तर देशातील तरुणांचे भविष्य एवढे असुरक्षित झाले नसते, असा टोला लगावला होता. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा काँग्रेसवर जोरदार टीका करत आहेत.  काँग्रेसनं देशवासीयांच्या डोळ्यात धूळफेक केली, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीराफेल डीलवरून पलटवार केला आहे. काँग्रेसकडून संसदेसारख्या पवित्र वास्तूचा वापर स्वत:च्या मनोरंजनासाठी केला जात आहे. त्यांचा हा प्रयत्न संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी हाणून पाडला, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. 'देशवासीयांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्यांना, देशाच्या सुरक्षेबद्दल हलगर्जीपणा करणाऱ्यांना, आपल्या मनोरंजनासाठी पवित्र संसदेचा वापर करणाऱ्यांना संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी उघडं पाडलं आहे. 2004 ते 2014 या कालावधीत केंद्र सरकारनं देशाच्या सैन्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कट रचला. आता आमचं सरकार या कट कारस्थानातून देशाला बाहेर काढू पाहतं आहे. मात्र हे त्यांच्या डोळ्यात खुपतं आहे,' अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं.

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी