शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण", पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'इस्रो'चे कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 18:54 IST

चंद्रयान-३ च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोचे कौतुक केले असून भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. नव्या भारताचा जयघोषणा करण्याचा हा क्षण आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चंद्रयान-३ ने बुधवारी मोठे यश मिळवले. चंद्रयान-३ मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला. भारताच्या 'चंद्रयान-३ या मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले होते. दरम्यान, चंद्रयान-३ च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीइस्रोचे कौतुक केले असून भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. नव्या भारताचा जयघोषणा करण्याचा हा क्षण आहे, असे ते म्हणाले.

दक्षिण अफ्रिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदीनी इस्रोच्या मोहिमेत व्हर्चुअली उपस्थिती दर्शविली. यावेळी ते म्हणाले, "भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. नव्या भारताचा जयघोषणा करण्याचा हा क्षण आहे, अडचणींचा महासागर पार करण्याचा हा क्षण आहे. १४० कोटी लोकांचं स्वप्न आज पूर्ण झाले आहे. हा भारताचा शंखनाद आहे. आज प्रत्येक देशवासीयाप्रमाणेच माझेही मन या चंद्रयान ३ च्या मोहिमेकडेच जोडले गेले होते. "याचबरोबर, आपण सगळे चंद्राला मामा म्हणतो. चंद्र खूप लांब आहे, असं म्हणायचो. पण आता देशातील मुलं म्हणतील चंद्र मामा एक टूर के हैं,  असे नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, १४ जुलै २०२३ रोजी चंद्रयान-३ हे यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले होते. त्यानंतर एक-एक टप्पा पार करत चंद्रयान-३ हे चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते. अखेर आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्टभागाच्या दिशेने झेप घेत चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरला. त्यामुळे एक नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.  तर चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळवणारा रशिया, अमेरिका, चीन या देशांनंतरचा चौथा देश ठरला आहे.

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3Narendra Modiनरेंद्र मोदीisroइस्रो