शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मोदींची तुलना पटेल, आंबेडकरांशी, काँग्रेसची शहांवर टीका; गुंतवणूक, निर्यात घसरली, तरीही प्रगती कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 04:25 IST

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केल्यानंतर, त्याचे तीव्र प्रतिसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसने अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केल्यानंतर, त्याचे तीव्र प्रतिसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसने अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सरकारने आर्थिक मुद्द्यावर तत्काळ सर्वपक्षीय विश्वास संपादन करावा. परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी या पक्षांशी चर्चा करावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.सरदार पटेल हे भौगोलिक परिवर्तनाचे जनक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तनाचे, तर मोदी आर्थिक परिवर्तनाचे जनक आहेत, असे शहा यांनी रविवारी म्हटले होते. काँग्रेसचे प्रवक्ते खा. अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिघडली आहे. विकास दर ५.७ टक्क्यांवर गेला आहे. मोदी सरकारने या गणनेची पद्धत बदलल्याने ही आकडेवारी दिसत आहे. जुन्या पद्धतीने आकडेवारी तपासली असती, तर विकास दर ३ ते ४ टक्क्यांच्या आसपास असता.शहा यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, खोटे बोलून व्यवस्था चालू शकत नाही. इतिहास साक्षीदार आहे की, ७० वर्षांत देशाची आर्थिक परिस्थिती एवढी वाईट कधी नव्हती आणि शहा खोटी स्तुती करून मोदींना आर्थिक परिवर्तनाचे जनक म्हणत आहेत. देशात रोजगाराचा यक्ष प्रश्न आहे. सरकारी आकडे सांगतात की, रोजगाराची परिस्थिती गत ८ वर्षांतील सर्वात किमान स्तरावर आहे.सीएमआयचा डेटा सांगतो की, १५ लाख लोकांच्या नोकºया गेल्या. निवडणुकीत काय शब्द दिला होता व प्रत्यक्षात काय होत आहे? शेतकºयांना किमान आधारभूत किमतीसोबत ५० टक्के बोनसचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असे सवाल करून अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, सरकारने आता ते देणे शक्य नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्राद्वारे सांगितले आहे.>स्वत:ची पाठ थोपटण्याचा प्रकारगुंतवणूक २७ टक्क्यांपर्यंत घसरली आहे, निर्यात घसरली आहे. छोट्या उद्योगातील विकासात १६ टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीही अमित शहा यांना वाटते की, देशाची प्रगती होत आहे. एनपीएत १४ टक्क्यांची वाढ झाली आहे, पण सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाह