शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'पंतप्रधानांना धोका असेल तर पहिली गोळी मी खाईन, केंद्राला पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावायची आहे' : CM चन्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 17:29 IST

' आमच्याकडून सुरक्षेत कुठलीही चूक झाली नाही, तरीदेखील आमच्या अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या जात आहेत.'

फिरोजपूर:पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींबाबत राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसेच, पंतप्रधानांवर संकट ओढावले, तर पहिली गोळी खानारा मी असेन, असेही ते म्हणाले. याशिवाय, केंद्र सरकार पंजाबची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप चरणजीत चन्नींनी केला.

केंद्राला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची आहेएका हिंदी वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी म्हणाले की, पंतप्रधानांना हेलिकॉप्टरने यायचे होते, पण अचानक त्यांनी रस्ते मार्गाने येण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडून कुठलीही चूक झाली नाही, तरीदेखील आमच्या अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या जात आहेत. आमच्याकडून पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी नसताना त्यांना नोटीस का दिली जात आहे? केंद्र सरकारने मुख्य सचिव आणि डीजीपी यांना नोटीस पाठवली आहे. निवडणुकीपूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्राचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

आमच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेतपंजाबचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पंजाबी आणि पंजाबला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकमेकांवर प्रश्न उपस्थित केले तर अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. सुरक्षेतील त्रुटींबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर बोलताना ते म्हणाले की, त्या दिवशी जे घडले, त्यात चूक कोणाची होती आणि सुरक्षेची जबाबदारी कोणाला उचलावी लागेल, यावर चौकशी होईलच. पण, आम्ही स्थापन केलेल्या चौकशी समितीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. केंद्रातील सुरक्षा प्रभारीकडे तपास सोपवण्यात आला होता. पण, सर्वोच्च न्यायालयाने तपास थांबवून योग्य केले, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाबcongressकाँग्रेस