शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 19:31 IST

Narendra Modi 11 Years as PM: गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती यश आले, किती अपयश आले, त्यांच्यासमोर कोणती संकटे आली याबाबत निवडणुकीचे एक्झिट पोल घेणाऱ्या सी व्होटरचा सर्व्हे आला आहे.

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले त्याला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात मोदींना किती यश आले, किती अपयश आले, त्यांच्यासमोर कोणती संकटे आली याबाबत निवडणुकीचे एक्झिट पोल घेणाऱ्या सी व्होटरचा सर्व्हे आला आहे. यामध्ये देशाची सुरक्षा ते दहशतवादाविरोधातील कारवाई यासह महागाई, रोजगारासह अनेक विषयांवर लोकांना प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये देशाच्या सुरक्षेसाठी मोदींनी लोकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. 

राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मोदी सरकारची कामगिरी उत्कृष्ट असल्याचे ५३.९%, चांगली १३.४%, सरासरी १२.०% आणि वाईट असल्याचे १६.५% लोकांनी म्हटले आहे. तसेच महागाईवर नियंत्रण मिळविण्यात मोदी सरकार यशस्वी ठरल्याचे २६% लोकांनी म्हटले आहे. तर काही प्रमाणात यशस्वी असल्याचे २३.९%, कोणताही बदल नाही असे १७.६% आणि काही प्रमाणात अयशस्वी असे ५.२% तर पूर्णपणे अप्रभावी ठरल्याचे २४.८% लोकांनी म्हटले आहे. 

एवढेच नाही तर बेरोजगारीच्या प्रश्नावरही लोकांनी मोदी कितपत यशस्वी आणि अपयशी ठरलेत ते देखील सांगितले आहे. बेरोजगारी संपविण्यात मोदी सरकार प्रभावी ठरल्याचे २६.३%, काही प्रमाणात प्रभावी ठरल्याचे २७.९%, कोणताही बदल नाही असे १९.९%, काही प्रमाणात अप्रभावी असे ७% तसेच पूर्णपणे अप्रभावी ठरल्याचे १५% लोकांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदी ज्या मुद्द्यावर निवडून आले तो म्हणजे भ्रष्टाचाराचा मुद्दा, यात ते कितपत यशस्वी झालेत हे देखील लोकांनी या सर्व्हेत सांगितले आहे. मोदी भ्रष्टाचार कमी करण्यात यशस्वी झाल्याचे ३०.८% लोकांना वाटत आहे. काही प्रमाणात तो कमी झाला आहे असे १८.३%, काही प्रमाणात भ्रष्टाचार आहे असे २६.२%, भ्रष्टाचार फारसा कमी झालेला नाही असे १०.१%, अजिबात कमी झालेला नाही असे १३.३% लोकांना वाटत आहे. 

तसेच मोदी सरकारमध्ये सर्वात प्रभावी सुधारणा म्हणजे डिजिटल इंडिया ही आहे. १९.९% लोकांनी याला मत दिले आहे. यानंतर जीएसटी ११.५%, मेक इन इंडिया १०%, सीएए ९.१%, कलम ३७० १८.१%, जन धन-आधार-मोबाइल-९.१% व इतरला १६.६ लोकांनी मत दिले आहे. मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रकारे हाताळले असे ४२.७% लोकांनी म्हटले आहे. अंशतः प्रभावीपणे हाताळल्याचे २२.६% लोकांना वाटत आहे तर कोणताही बदल नाही असे १३.७% लोकांना वाटत आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाprime ministerपंतप्रधानInflationमहागाईjobनोकरी