शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

नाणार प्रकल्पासाठी निम्मा पैसा सौदीचा, सौदी आरामको कच्चे तेलही पुरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 06:28 IST

भारत सरकारच्या तीन तेल कंपन्या मिळून कोकणात उभारणार असलेल्या नाणार येथील तेल शुद्धीकरण व पेट्रो प्रकल्पासाठी जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे उत्पादन करणारी सौदी अरबस्तानची सोदी आरामको ही कंपनी ५० टक्के भांडवली गुंतवणूक करणार आहे

नवी दिल्ली : भारत सरकारच्या तीन तेल कंपन्या मिळून कोकणात उभारणार असलेल्या नाणार येथील तेल शुद्धीकरण व पेट्रो प्रकल्पासाठी जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे उत्पादन करणारी सौदी अरबस्तानची सोदी आरामको ही कंपनी ५० टक्के भांडवली गुंतवणूक करणार आहे, तसेच या कारखान्यासाठी लागणाऱ्या ५० टक्के कच्च्या तेलाचा पुरवठाही ही सौदी कंपनी करणार आहे.‘रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स’ नावाचा हा तीन अब्ज रुपये खर्चाचा प्रकल्प इंडियन आॅइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या मिळून उभारत आहेत. सौदी अरबस्तानचे ऊर्जा व नैसर्गिक संसाधनमंत्री खलिद अल फलिह यांनी सौदी आरामकोच्या वतीने या प्रकल्पातील सहभागासंबंधीचा सामंजस्य करार केला.अल फलिह म्हणाले की, या प्रकल्पासाठी प्रत्येकी ५० टक्के भागीदारीचे भारतीय आणि विदेशी गुंतवणूकदारांचे दोन गट असतील. सुरुवातीस सौदी आरामको ५० टक्के विदेशी गुंतवणूकदाराचा वाटा उचलेल व कालांतराने त्यात इतरही इच्छुक गुंतवणूकदारांना सहभागी करून घेऊ शकेल. या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक नागरिकांचे आंदोलन सुरू आहे व त्यांचा जमीन संपादनास विरोध आहे, असे लक्षात आणून दिल्यावर आरामको कंपनीचे अध्यक्ष अमिन एस. नासेर म्हणाले की, आमचे भारतीय भागीदार हा विषय यशस्वीपणे हाताळतील, याची आम्हाला खात्री आहे. या प्रकल्पाची दररोज १.२ दशलक्ष बॅरेल (वर्षाला ६० दशलक्ष टन) तेल शुद्धिकरणाची व वर्षाला १८ दशलक्ष टन अन्य पेट्रो उत्पादनांचे उत्पादन करण्याची क्षमता असेल. यापैकी ५० टक्के कच्च्या तेलाचा खात्रीशीर पुरवठा करण्याकेरीज सौदी आरामको अत्याधुनिक तंत्रज्ञानही उपलब्ध करून देईल, असेही अल फलिह यांनी सांगितले. सौदी आरामकोचे पत मानांकन उच्च श्रेणीतील असल्याने भांडवल उभारणी तुलनेने कमी खर्चात होऊ शकेल, असेही ते म्हणाले. भारतात पेट्रोलियम आणि पेट्रो उत्पादनांच्या किरकोळ विक्रीच्या बाजारपेठेतही उतरण्याचा विचार असल्याचे अल फलिह म्हणाले. मात्र यासंदर्भात नियामक व्यवस्थेचे नियम तपासून पाहावे लागतील, असे भारताचे ऊर्जामंत्री धर्मेद्र प्रधान यांनी स्पष्ट केले.>रिफाईनरीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्यास प्रकल्प जबरदस्तीने लादणार नाही. केंद्र सरकारला तसे कळवून प्रकल्प रद्द करण्यास सांगितले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिले होते. मात्र, आज दिल्लीत अरामको कंपनीशी करार झाल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांचा विश्वासघात केला आहे.- अशोक वालम, अध्यक्ष, रिफाईनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटना>असा असेल हा प्रकल्पमुख्य तेल शुद्धिकरण कारखाना बाभुळवाडीत १४ हजार एकरावर.तेथून १५ किमी अंतरावरएक हजार एकर जागेवर तेलाच्या टाक्या व बंदर सुविधा.एकूण अपेक्षितखर्च तीन अब्ज रुपये.वाषिक क्षमता- ६० दशलक्ष टन तेल शुद्धिकरण व १८ दशलक्ष टन पेट्रो उत्पादने.अपेक्षित उभारणी सन२०२५ पर्यंत.