शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
3
धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
4
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
5
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
6
Eknath Shinde: ‘बाळासाहेब हे एकच ब्रँड; स्वतःला ब्रँड म्हणवणाऱ्यांचा बँड वाजवणार' एकनाथ शिंदेंचा टोला
7
रणवीर सिंहचा 'धुरंधर' सिनेमा दोन भागात येणार? तगड्या क्लायमॅक्ससह मेकर्सचा नवीन प्लॅन
8
आंध्र प्रदेशातील आमदाराला केलं ३ दिवस 'डिजिटल अरेस्ट', १.०७ कोटींचा गंडा, ८ जणांना अटक
9
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
10
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
11
CNG Crisis: ‘सीएनजी’ची बोंब, हजारो वाहने रस्त्यावरून गायब, प्रवाशांचे प्रचंड हाल!
12
मदीना बस अपघातात एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू; नातेवाईक म्हणाले- अल्लाहने त्यांच्या नशिबात...
13
सौदीचे प्रिन्स दौऱ्यावर येण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; दिलं मोठं 'गिफ्ट'
14
Navi Mumbai: महाराजांचा अपमान सहन करणार नाही, दडपशाही जुमानणार नाही; अमित, आदित्य यांचा सरकारला इशारा
15
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
16
IND vs SA : ...तर करुण नायरसह तिघांपैकी एकाला मिळू शकते टीम इंडियात ‘वाइल्ड कार्ड एन्ट्री’
17
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
18
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
20
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
Daily Top 2Weekly Top 5

नाणार प्रकल्पासाठी निम्मा पैसा सौदीचा, सौदी आरामको कच्चे तेलही पुरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 06:28 IST

भारत सरकारच्या तीन तेल कंपन्या मिळून कोकणात उभारणार असलेल्या नाणार येथील तेल शुद्धीकरण व पेट्रो प्रकल्पासाठी जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे उत्पादन करणारी सौदी अरबस्तानची सोदी आरामको ही कंपनी ५० टक्के भांडवली गुंतवणूक करणार आहे

नवी दिल्ली : भारत सरकारच्या तीन तेल कंपन्या मिळून कोकणात उभारणार असलेल्या नाणार येथील तेल शुद्धीकरण व पेट्रो प्रकल्पासाठी जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे उत्पादन करणारी सौदी अरबस्तानची सोदी आरामको ही कंपनी ५० टक्के भांडवली गुंतवणूक करणार आहे, तसेच या कारखान्यासाठी लागणाऱ्या ५० टक्के कच्च्या तेलाचा पुरवठाही ही सौदी कंपनी करणार आहे.‘रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स’ नावाचा हा तीन अब्ज रुपये खर्चाचा प्रकल्प इंडियन आॅइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या मिळून उभारत आहेत. सौदी अरबस्तानचे ऊर्जा व नैसर्गिक संसाधनमंत्री खलिद अल फलिह यांनी सौदी आरामकोच्या वतीने या प्रकल्पातील सहभागासंबंधीचा सामंजस्य करार केला.अल फलिह म्हणाले की, या प्रकल्पासाठी प्रत्येकी ५० टक्के भागीदारीचे भारतीय आणि विदेशी गुंतवणूकदारांचे दोन गट असतील. सुरुवातीस सौदी आरामको ५० टक्के विदेशी गुंतवणूकदाराचा वाटा उचलेल व कालांतराने त्यात इतरही इच्छुक गुंतवणूकदारांना सहभागी करून घेऊ शकेल. या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक नागरिकांचे आंदोलन सुरू आहे व त्यांचा जमीन संपादनास विरोध आहे, असे लक्षात आणून दिल्यावर आरामको कंपनीचे अध्यक्ष अमिन एस. नासेर म्हणाले की, आमचे भारतीय भागीदार हा विषय यशस्वीपणे हाताळतील, याची आम्हाला खात्री आहे. या प्रकल्पाची दररोज १.२ दशलक्ष बॅरेल (वर्षाला ६० दशलक्ष टन) तेल शुद्धिकरणाची व वर्षाला १८ दशलक्ष टन अन्य पेट्रो उत्पादनांचे उत्पादन करण्याची क्षमता असेल. यापैकी ५० टक्के कच्च्या तेलाचा खात्रीशीर पुरवठा करण्याकेरीज सौदी आरामको अत्याधुनिक तंत्रज्ञानही उपलब्ध करून देईल, असेही अल फलिह यांनी सांगितले. सौदी आरामकोचे पत मानांकन उच्च श्रेणीतील असल्याने भांडवल उभारणी तुलनेने कमी खर्चात होऊ शकेल, असेही ते म्हणाले. भारतात पेट्रोलियम आणि पेट्रो उत्पादनांच्या किरकोळ विक्रीच्या बाजारपेठेतही उतरण्याचा विचार असल्याचे अल फलिह म्हणाले. मात्र यासंदर्भात नियामक व्यवस्थेचे नियम तपासून पाहावे लागतील, असे भारताचे ऊर्जामंत्री धर्मेद्र प्रधान यांनी स्पष्ट केले.>रिफाईनरीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्यास प्रकल्प जबरदस्तीने लादणार नाही. केंद्र सरकारला तसे कळवून प्रकल्प रद्द करण्यास सांगितले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिले होते. मात्र, आज दिल्लीत अरामको कंपनीशी करार झाल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांचा विश्वासघात केला आहे.- अशोक वालम, अध्यक्ष, रिफाईनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटना>असा असेल हा प्रकल्पमुख्य तेल शुद्धिकरण कारखाना बाभुळवाडीत १४ हजार एकरावर.तेथून १५ किमी अंतरावरएक हजार एकर जागेवर तेलाच्या टाक्या व बंदर सुविधा.एकूण अपेक्षितखर्च तीन अब्ज रुपये.वाषिक क्षमता- ६० दशलक्ष टन तेल शुद्धिकरण व १८ दशलक्ष टन पेट्रो उत्पादने.अपेक्षित उभारणी सन२०२५ पर्यंत.