शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

नानाजी देशमुख, प्रणव मुखर्जी आणि भूपेन हजारिका यांना देशातील सर्वोच्च ‘भारतरत्न’ सन्मान जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 06:33 IST

प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नामवंत संगीतकार भूपेन हजारिका यांची या वर्षीच्या देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न सन्मानासाठी निवड झाली आहे.

नवी दिल्ली : प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नामवंत संगीतकार भूपेन हजारिका यांची या वर्षीच्या देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न सन्मानासाठी निवड झाली आहे. यापैकी नानाजी देशमुख व भूपेन हजारिका यांना हा सर्वोच्च सन्मान मरणोत्तर जाहीर झाला आहे. यंदा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याला ‘भारतरत्न’ दिले जाईल, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती, पण तीन वेगवेगळ््या क्षेत्रांतील नामवंतांचा सन्मान करण्याचे केंद्र सरकारने ठरविले.नानाजी देशमुख यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील कडोली गावी झाला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात गेले आणि तिथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिट्स पिलानीमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. महाविद्यालयात असताना राष्ट्रीयस्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. नंतर त्यांनी राजस्थान, उत्तर प्रदेशात कामाला सुरुवात केली. पुढे जनसंघ व जनता पार्टी यांमध्येही ते सक्रिय होते. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत ते अग्रस्थानी होते. काही काळ ते खासदारही होते. वयाच्या ६0 व्या वर्षी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या नानाजी देशमुख यांनी मध्य प्रदेशातील चित्रकुटमध्ये जाऊ न आदिवासी व मागास समाजात काम सुरू केले. त्यांचे निधन ९३ व्या वर्षी २0१0 मध्ये झाले.तर आसाममध्ये १९२६ साली जन्मलेल्या भूपेन हजारिका यांनी आसामीच नव्हे, तर अनेक बंगाली व हिंदी चित्रपटांना व हजारो गीतांना संगीत दिले. त्यांच्या सर्व गीतांवर लोकसंगीताचा मोठा प्रभाव होता. ते स्वत: गीतकार, गायक, दिग्दर्शकही होते. त्यांना संगीतासाठीचे अनेक पुरस्कार मिळाले असून, ‘पद्मभूषण’ व ‘पद्मविभूषण’ या पुरस्कारानेही यापूर्वी सन्मानित करण्यात आले होते. भूपेन हजारिका यांची ‘दिल हूं हूं करे’ ‘गंगा बहती है क्यूं’ आदी गाणी आजही रसिकांच्या तोंडी आहेत. त्यांचे २0११ साली मुंबईत निधन झाले.प्रणव मुखर्जी यांची माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे नेते म्हणून ओळख सर्वांना आहे. केंद्र सरकारमध्ये त्यांनी इंदिरा गांधी यांच्या काळापासून अनेक वर्षे मंत्री म्हणून काम केले आहे. ते २0१२ ते २0१७ या काळात भारताचे राष्ट्रपती होते. राष्ट्रपतीपद सोडल्यानंतर ते रा. स्व. संघाच्या कार्यक्रमासाठी नागपूरला गेले होते. तिथेही मुखर्जी यांनी आपले म्हणणे संघ कार्यकर्त्यांसमोर ठामपणे मांडले होते. भारतरत्न पुरस्कार हा फारच मोठा सन्मान असून, अतिशय विनम्रपणे मी तो स्वीकारत आहे, असे प्रणवदा आज म्हणाले.पंतप्रधानांनी केले अभिनंदनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत म्हणाले की, हा एका काँग्रेसजनाचाही सन्मान आहे.>या नामवंतांचाही ‘भारतरत्न’ने झाला सन्मानमहर्षी धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काणे, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,जे. आर.डी. टाटा, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर, नानाजी देशमुख