शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुर्दैव! शत्रूंशी मुकाबला करणाऱ्या भारतीय जवानांचेही एनआरसी यादीत नाव नाही; सैनिक झाले हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 13:07 IST

सीमेवर आम्ही भारतीय जवान आहोत अन् आपल्याच घरामध्ये आम्हाला भारतीय नागरिकत्वासाठी लढावं लागत आहे

आसाम - बारापेटा जिल्ह्यातील एक गाव जे सैनिकांचे गाव म्हणून ओळखलं जातं. या गावात जवळपास 200 कुटुंब राहते. या गावातून 20 पेक्षा अधिक तरुण भारतीय लष्कर आणि अन्य सुरक्षा यंत्रणेत कामाला आहेत. मात्र गावातील अनेक जवानांची नावे एनआरसी यादीत समाविष्ट न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एनआरसी यादी 31 ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आली. 

दिलबर हुसैन यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावे एनआरसी यादीत मिळाली नाहीत. दिलबर हुसैन हे भारतीय लष्करात आहेत. हुसैन यांचे छोटे भाऊ मिजनूर अली सीआयएसएफमध्ये कार्यरत आहेत. एनआरसी यादीत या दोघांचीही नावे नाहीत. तर त्यांचे मोठे भाऊ सईदुल इस्लाम यांचे नाव एनआरसी यादीत आहेत. ते लष्करात सुबेदाराचं काम करत होते. कारगिल लढाईतही त्यांनी सहभाग घेतला होता. 

दिलबर हुसैन यांनी सांगितले की, आम्ही शत्रूंशी लढाई लढतो. आम्ही जवानांच्या कुटुंबाला प्राधान्य देतो मात्र एनआरसी यादीत आमचं नाव नसल्याने दुख: झालं. सीमेवर आम्ही भारतीय जवान आहोत अन् आपल्याच घरामध्ये आम्हाला भारतीय नागरिकत्वासाठी लढावं लागत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

सीआयएसएफ जवान मिजनूर अली यांनी एनआरसी यादीवर नाराजी व्यक्त करत सांगितले की, सीआयएसएफच्या भरतीवेळी मी व्हेरिफिकेशन करताना सांगितलं होतं की, मी बाहेरून आलो आहे, 2003 मध्ये बांग्लादेशातून भारतात आलो. मग त्यावेळी मला डीएसपी यांनी व्हेरिफिकेशन झाल्यावर सीआयएसएफमध्ये जवान म्हणून कार्यरत कसं केलं? असा सवाल उपस्थित केला आहे. 

असाच प्रकार भारतीय जवान अजित अली यांच्यासोबत घडला आहे. अजित अली यांचे नाव पहिल्या आणि दुसऱ्या यादीतही आलं नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंब चिंतेत होतं. ज्यावेळी अंतिम यादी प्रसिद्ध झाली त्यानंतर माझे वडिलांना रडू आलं. माझं कुटुंब काही बोलत नसलं तरी त्यांना हा विचार सतावत आहे की, त्यांनी आम्हाला परदेशी कसं घोषित केलं? आता आम्ही काय करू? शत्रूंशी मुकाबला करू की भारतीय नागरिकत्वासाठी झगडत राहू हा प्रश्न पडला आहे असं त्यांनी सांगितले.