शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैव! शत्रूंशी मुकाबला करणाऱ्या भारतीय जवानांचेही एनआरसी यादीत नाव नाही; सैनिक झाले हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 13:07 IST

सीमेवर आम्ही भारतीय जवान आहोत अन् आपल्याच घरामध्ये आम्हाला भारतीय नागरिकत्वासाठी लढावं लागत आहे

आसाम - बारापेटा जिल्ह्यातील एक गाव जे सैनिकांचे गाव म्हणून ओळखलं जातं. या गावात जवळपास 200 कुटुंब राहते. या गावातून 20 पेक्षा अधिक तरुण भारतीय लष्कर आणि अन्य सुरक्षा यंत्रणेत कामाला आहेत. मात्र गावातील अनेक जवानांची नावे एनआरसी यादीत समाविष्ट न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एनआरसी यादी 31 ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आली. 

दिलबर हुसैन यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावे एनआरसी यादीत मिळाली नाहीत. दिलबर हुसैन हे भारतीय लष्करात आहेत. हुसैन यांचे छोटे भाऊ मिजनूर अली सीआयएसएफमध्ये कार्यरत आहेत. एनआरसी यादीत या दोघांचीही नावे नाहीत. तर त्यांचे मोठे भाऊ सईदुल इस्लाम यांचे नाव एनआरसी यादीत आहेत. ते लष्करात सुबेदाराचं काम करत होते. कारगिल लढाईतही त्यांनी सहभाग घेतला होता. 

दिलबर हुसैन यांनी सांगितले की, आम्ही शत्रूंशी लढाई लढतो. आम्ही जवानांच्या कुटुंबाला प्राधान्य देतो मात्र एनआरसी यादीत आमचं नाव नसल्याने दुख: झालं. सीमेवर आम्ही भारतीय जवान आहोत अन् आपल्याच घरामध्ये आम्हाला भारतीय नागरिकत्वासाठी लढावं लागत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

सीआयएसएफ जवान मिजनूर अली यांनी एनआरसी यादीवर नाराजी व्यक्त करत सांगितले की, सीआयएसएफच्या भरतीवेळी मी व्हेरिफिकेशन करताना सांगितलं होतं की, मी बाहेरून आलो आहे, 2003 मध्ये बांग्लादेशातून भारतात आलो. मग त्यावेळी मला डीएसपी यांनी व्हेरिफिकेशन झाल्यावर सीआयएसएफमध्ये जवान म्हणून कार्यरत कसं केलं? असा सवाल उपस्थित केला आहे. 

असाच प्रकार भारतीय जवान अजित अली यांच्यासोबत घडला आहे. अजित अली यांचे नाव पहिल्या आणि दुसऱ्या यादीतही आलं नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंब चिंतेत होतं. ज्यावेळी अंतिम यादी प्रसिद्ध झाली त्यानंतर माझे वडिलांना रडू आलं. माझं कुटुंब काही बोलत नसलं तरी त्यांना हा विचार सतावत आहे की, त्यांनी आम्हाला परदेशी कसं घोषित केलं? आता आम्ही काय करू? शत्रूंशी मुकाबला करू की भारतीय नागरिकत्वासाठी झगडत राहू हा प्रश्न पडला आहे असं त्यांनी सांगितले.