शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

India China FaceOff: चीनविरोधातील संघर्षात शहीद झालेल्या २० जवानांची नावं जाहीर; वाचा यादी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 15:22 IST

सोमवारी सकाळी ब्रिगेड कमांडरसोबत स्थानिक कमांडर स्तरीय बैठक झाली. संध्याकाळी भारतीय लष्कारी अधिकाऱ्यांची टीम गलवान खोऱ्यात पीपी १४ याठिकाणी पोहचले ज्याठिकाणाहून चीनच्या सैनिकांना मागे जायचं होतं

नवी दिल्ली - गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात झालेल्या झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले. या घटनेनंतर चीनविरोधातभारतात संतापाची लाट आहे. अनेक ठिकाणी चीनच्या सामानांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी नि:शस्त्र भारतीय जवानांवर लोखंडाच्या सळ्या, दांडके, दगडं अशा हत्यारांनी हल्ला केला. 

या हल्ल्यात झालेल्या २० शहीद जवानांची नावं जाहीर करण्यात आली आहे. ही नावं पुढील प्रमाणे आहेत. 

  1. कर्नल संतोष बाबू (हैदराबाद)
  2. नंदुराम सोरेन (मयुरभंज)
  3. मनदीप सिंग (पटियाला) 
  4. सतनाम सिंग (गुरुदासपूर)
  5. हवालदार के पालानी (मदुराई)
  6. हवालदार सुनील कुमार (पटना)
  7. हवालदार बिपुल रॉय(मेरठ शहर)
  8. दिपक कुमार (रेवा)
  9. राजेश ओरंग (बिरघम)
  10. कुंदनकुमार ओझा (साहीबगंज)
  11. गणेश राम (कांकेर)
  12. चंद्रकांता प्रधान (कंधलमाल)
  13. अंकुश (हमीरपूर)
  14. गुरुबिंदर (संगरुर)
  15. गुरुतेज सिंग (मानसा)
  16. चंदन कुमार (भोजपूर)
  17. कुंदन कुमार (साहरसा)
  18. अमन कुमार (समस्तीपूर)
  19. जय किशोर सिंग(वैशाली)
  20. गणेश हंसदा (पूर्व सिंगभूम)

 

सध्या देशात काय सुरु आहे?सोमवारी सकाळी ब्रिगेड कमांडरसोबत स्थानिक कमांडर स्तरीय बैठक झाली. संध्याकाळी भारतीय लष्कारी अधिकाऱ्यांची टीम गलवान खोऱ्यात पीपी १४ याठिकाणी पोहचले ज्याठिकाणाहून चीनच्या सैनिकांना मागे जायचं होतं, भारतीय अधिकारी आणि त्यांच्या जवानांवर दगड आणि लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. त्यामुळे भारतीय सैनिकांनीही सतर्कता बाळगत त्याला उत्तर दिलं. मोठ्या संख्येने भारताचे सैनिक त्याठिकाणी पोहचले, रात्री उशिरापर्यंत दोन्ही सैनिकात संघर्ष सुरु होता. यात घटनेत २० जवान शहीद झाले तर चीनच्या गंभीर जखमी पकडून साधारण ४३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. या संघर्षामुळे चीनविरोधात भारतात संतप्त भावना आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पॉईंट १४ च्या डोंगराळ भागात चीनचे सैन्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी मोठमोठे दगड भारतीय सैनिकांच्या दिशेने फेकण्यास सुरुवात केली. भारतीय सैनिकांनी या हल्ल्याचा सामना केला. आजूबाजूला संरक्षण करण्याची संधीही मिळाली नाही. सोमवारी सकाळी चीनी सैनिकांनी भारतीय जवानांचे मृतदेह सोपवले. या संघर्षात चीनचे सैनिकही मारले गेले, भारतीय लष्कराच्या माहितीनुसार चीनचे ४० सैनिक मारल्याची चर्चा त्यांच्या सैनिकांमध्ये सुरु आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

देशाचे आणखी २४ जवान देतायेत मृत्यूशी झुंज; ११० सैनिकांना उपचाराची गरज; सूत्रांची माहिती

...अन् त्याचदिवशी चीनच्या कंपनीसोबत महाराष्ट्र सरकारचा ७,६०० कोटींचा करार

शहीद सैनिकांच्या बलिदानाचा 'असा' बदला घेणार; चीनविरोधात भारताची तयारी

खोदकामात २ युवकांना सापडला ८०० वर्ष जुना खजिना; बाजारात विकायला गेले अन्....

टॅग्स :Indiaभारतchinaचीन