शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कुणालाही होऊ शकते अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 04:36 IST

पुढील चार महिने दिल्ली एनसीआरमधील कुणालाही स्थानबद्ध करण्याचे अधिकार नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये दिल्ली पोलिसांना दिले आहेत.

नवी दिल्ली : पुढील चार महिने दिल्ली एनसीआरमधील कुणालाही स्थानबद्ध करण्याचे अधिकार नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये दिल्ली पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना जेरबंद केले जाण्याची शक्यता आहे.नायब राज्यपालांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये हा आदेश काढला. राष्ट्रीय सुरक्षेस धोका आहे, असे वाटताच पूर्वसूचना न देता पोलीस कोणालाही अटक करू शकतील अटकेतील व्यक्तीस उच्च न्यायालयात त्याविरोधात दाद मागता येईल. मात्र वर्षभरासाठी वकील नेमता येणार नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे अटक झालेल्या व्यक्तीस दहा दिवस अटकेचे कारण न सांगण्याचा अधिकार पोलिसांना आहे. पोलीस प्रवक्ते मनदीप सिंह रंधवा यांनी मात्र ही नियमित प्रक्रिया असून त्याचा विधानसभा निवडणूक, सीएएविरुद्ध आंदोलन यांच्याशी संबंध नसल्याचे सांगितले. दिल्ली पोलीस आयुक्तांना १९ जानेवारी ते १८ एप्रिल २०२० दरम्यान हा विशेषाधिकार असेल.अधिवेशनावर आंदोलनाचे सावटकाश्मीरमध्ये ३७० रद्द केल्यापासून हा कायदा लागू आहे. येत्या ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. त्यावरही सीएएविरोधी आंदोलनाचे सावट असेल. ते लोण अधिवेशन काळात वाढण्याच्या भीतीमुळे नायब राज्यपालांनी हे अधिकार पोलिसांना दिल्याचे बोलले जाते. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीGovernmentसरकारPoliceपोलिस