शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

नितीश कुमारांवरही हत्येचा आरोप आहे - लालूप्रसाद यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 20:59 IST

नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावर घणाघाती आरोप केले आहे.

पाटणा, दि. 26 - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप आला असून सत्ताधारी जनता दल(यू) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यातील महायुती अखेर 20 महिन्यानंतर तुटली आहे.  नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. ते म्हणाले की, नितीश कुमार यांच्यावर भ्रष्टाचारापेक्षा अत्याचाराचा गंभीर आरोप आहे. ते भारतीय दंड विधान 302 चे आरोपी आहेत. त्यांनी तेजस्वी यादव यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले. त्यामुळे जनता दल (यू) काही पोलीस स्टेशन नाही, स्पष्टीकरण द्यायला, असे लालूप्रसाद म्हणाले. याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नितीश कुमार यांना भारतीय जनता पार्टीसोबत येण्याची ऑफर आली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे आधीच ठरविले होते, असाही आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. दरम्यान, काँग्रेस, आरजेडी आणि जेडीयूच्या आमदारांनी एकत्र येऊन नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करावी असेही यावेळी लालूप्रसाद यादव म्हणाले. 

गेल्या काही दिवसांमध्ये लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पूत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा यासाठी नितीश कुमार यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता.  मात्र, तेजस्वी यादव यांचा राजीनामा देणार नसल्याचे लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी पाटणामध्ये नितीश कुमारांनी जदयूच्या आमदारांची, खासदारांची आणि इतर नेत्यांची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर नितीश कुमार राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला