शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर रात्रभर राजकीय घडामोडींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 09:24 IST

नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये बुधवारी संध्याकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं आहे.

ठळक मुद्दे नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये बुधवारी संध्याकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं आहे.. नितीश कुमार यांचा राजीनामा, लालूप्रसाद यादव यांनी त्यानंतर नितीश कुमार यांच्यावर केलेले आरोप, विशेष म्हणजे नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच ट्विटरवरून त्यांचं कौतुक केलंभ्रष्टाचाराचे आरोप असलेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी नितीश कुमार यांची इच्छा होती. पण दबावापुढे झुकायला ते तयार नव्हते

पाटणा, दि. 27- नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये बुधवारी संध्याकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं आहे. नितीश कुमार यांचा राजीनामा, लालूप्रसाद यादव यांनी त्यानंतर नितीश कुमार यांच्यावर केलेले आरोप, विशेष म्हणजे नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच ट्विटरवरून त्यांचं केलेलं कौतुक, भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदासाठी दिलेला पाठिंबा तसंच सत्तास्थापनेची संधी मिळावी यासाठी आक्रमक झालेलं राष्ट्रीय जनता दल आणि त्यानंतर राज्यपालांकडून करण्यात आलेली नितीश कुमारांच्या शपथविधीची घोषणा, या सर्व घटना बिहारमध्ये रंगत असलेलं राजकीय नाट्य दाखविणाऱ्या आहेत. 

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी नितीश कुमार यांची इच्छा होती. पण दबावापुढे झुकायला ते तयार नव्हते. दोन दिवसांपूर्वी नितीश यांनी तेजस्वी यांची भेट घेऊन त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवर भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह धरला होता. पण बुधवारी तेजस्वी यादव मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत, असं लालू प्रसाद यादव यांनी जाहीर केलं.  नितीश कुमार यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला.

बुधवारी संध्याकाळपासून नेमकं काय घडलं ?- बुधवारी संध्याकाळी नितीश कुमार यांची संयुक्त जनता दलाच्या आमदारांसोबत बैठक झाली.- आमदारांसोबतच्या बैठकीनंतर नितीश कुमार राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्या भेटीसाठी राजभवानाकडे गेले होते.- राज्यपालांच्या भेटीमध्ये नितीश कुमारांनी राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.-राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं.- नितीश कुमारांनी राजीनाम दिल्यानंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून नितीश कुमार यांचं अभिनंदन केलं.- नितीश कुमार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर काहीवेळातच लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन नितीश यांच्यावर गंभीर आरोप केले.- दिल्लीत तेव्हा भाजपाच्या संसदीय मंडळाची सुरू होती.- भाजपाच्या केंद्रीय समितीची बैठक झाली व यामध्ये बिहारमध्ये पुन्हा निवडणुका घेण्याबाबत होकारार्थी मतं मांडण्यात आली- या बैठकीनंतर तासाभरात नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देण्याचा भाजपाने निर्णय घेतला.- बिहार भाजपाकडून दिल्लीला राज्यातील राजकीय परिस्थितीचा अहवाल पाठवण्यात आला.- जदयू आणि भाजपचे राज्यभरातील आमदार पाटण्यात दाखल व्हायला सुरूवात झाली.- नितीश कुमार यांच्या निवासस्थानी जदयू आणि भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली.-  बैठकीनंतर जदयू आणि भाजपच्या आमदारांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा असल्याच्या पत्रावर सह्या केल्या.- त्यानंतर नितीश कुमार, सुशील मोदी राजभवनात दाखल झाले.- राजभवनातून बाहेर पडल्यानंतर गुरूवारी सकाळी १० वाजता नितीश कुमारांचा शपथविधी होइल, अशी घोषणा सुशील कुमार मोदींनी केली. - या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव राजभवनाकडे गेले होते.- राज्यपालांना भेटून तेजस्वी यादव यांच्याकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला- गुरूवारी सकाळी 10 वाजता नितीश कुमार आणि सुशील मोदी शपथ घेणार. - नितीश कुमार शुक्रवारी बहुमत सिद्ध करणार असल्याची सूत्रांची माहिती. - भाजप-जदयूचे 13-13 मंत्री शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती.- बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.