शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

म्यानमार बॉर्डर सील; आता घुसखोरी थांबणार, गृहमंत्रालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 09:57 IST

लोकांचा मुक्त वावर रोखण्यासाठी गृहमंत्रालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत व म्यानमार या उभय देशांदरम्यान मुक्त वावरासाठी घेतलेला फ्री मूव्हमेंट रेजिमचा (एफएमआर) निर्णय रद्द करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केली. यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवरील लोकांचा मुक्त वावर बंद झाला आहे. भारताची अंतर्गत सुरक्षा व म्यानमारला लागून असलेल्या ईशान्येच्या राज्यांची लोकसंख्याविषयक संरचना कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले.

गृहमंत्री म्हणाले की, एफएमआर तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाने केली होती. त्यानुसार परराष्ट्र खात्याने पुढील प्रक्रिया सुरू केली. भारत-म्यानमार सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय एकमेकांच्या प्रदेशात १६ किमी अंतरापर्यंत जाण्याची परवानगी एफएमआरमुळे देण्यात आली होती. देशाच्या सीमा सुरक्षित असाव्यात, यासाठी पंतप्रधान दक्ष आहेत. त्याच भूमिकेतून एफएमआरबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

सीमेवर संपूर्ण भागात कुंपण भारत व म्यानमार या दोन देशांमधील सीमेवर संपूर्ण भागात कुंपण उभारण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जाहीर केला होता.तसेच या सीमेवर गस्त घालण्याकरिता व टेहळणीसाठी कुंपणालगत एक रस्ताही बांधण्याचा विचार आहे. दोन देशांच्या सीमेलगत अरुणाचल प्रदेश, मणिपूरमधील एक किमी परिसरात कुंपण घालण्याचे काम सुरू झाले आहे.

बॉर्डर सीलचा निर्णय का? म्यानमारमध्ये बंडखोर गट व लष्कर यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे.  नोव्हेंबरपासून आतापर्यंत ६०० सैनिक भारतात घुसले होते. मिझोराम सरकारने यासंदर्भात केंद्राकडे मदत मागितली होती. जानेवारीमध्ये म्यानमारमधून पळून आलेल्या सैनिकांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला होता.

काय आहे एफएमआर? nभारत आणि म्यानमारमध्ये १६०० किमी लांबीची सीमा आहे. १९७० मध्ये दोन्ही देशांमध्ये मुक्त हालचालीबाबत करार झाला होता.nयाला फ्री मूव्हमेंट रेजिम म्हणजेच ‘एफएमआर’ असे म्हणतात. त्याचे शेवटचे २०१६ मध्ये नूतनीकरण करण्यात आले.nयामुळे दोन्ही देशांतील लोकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय एकमेकांच्या प्रदेशाला भेट देता येत होती.

तक्रार काय? nम्यानमारमधील दहशतवादी सीमा ओलांडून भारताच्या हद्दीत येतात, अशी तक्रार मणिपूरमधील मैतेई जमातीने केली होती.nदेशांच्या सीमेवर कुंपण नसल्याचा फायदा घेऊन हे दहशतवादी भारतात अमली पदार्थांची तस्करी करतात, असाही दावा करण्यात आला होता.

टॅग्स :Amit Shahअमित शाहMyanmarम्यानमारHome Ministryगृह मंत्रालय