शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमार बॉर्डर सील; आता घुसखोरी थांबणार, गृहमंत्रालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 09:57 IST

लोकांचा मुक्त वावर रोखण्यासाठी गृहमंत्रालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत व म्यानमार या उभय देशांदरम्यान मुक्त वावरासाठी घेतलेला फ्री मूव्हमेंट रेजिमचा (एफएमआर) निर्णय रद्द करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केली. यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवरील लोकांचा मुक्त वावर बंद झाला आहे. भारताची अंतर्गत सुरक्षा व म्यानमारला लागून असलेल्या ईशान्येच्या राज्यांची लोकसंख्याविषयक संरचना कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले.

गृहमंत्री म्हणाले की, एफएमआर तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाने केली होती. त्यानुसार परराष्ट्र खात्याने पुढील प्रक्रिया सुरू केली. भारत-म्यानमार सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय एकमेकांच्या प्रदेशात १६ किमी अंतरापर्यंत जाण्याची परवानगी एफएमआरमुळे देण्यात आली होती. देशाच्या सीमा सुरक्षित असाव्यात, यासाठी पंतप्रधान दक्ष आहेत. त्याच भूमिकेतून एफएमआरबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

सीमेवर संपूर्ण भागात कुंपण भारत व म्यानमार या दोन देशांमधील सीमेवर संपूर्ण भागात कुंपण उभारण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जाहीर केला होता.तसेच या सीमेवर गस्त घालण्याकरिता व टेहळणीसाठी कुंपणालगत एक रस्ताही बांधण्याचा विचार आहे. दोन देशांच्या सीमेलगत अरुणाचल प्रदेश, मणिपूरमधील एक किमी परिसरात कुंपण घालण्याचे काम सुरू झाले आहे.

बॉर्डर सीलचा निर्णय का? म्यानमारमध्ये बंडखोर गट व लष्कर यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे.  नोव्हेंबरपासून आतापर्यंत ६०० सैनिक भारतात घुसले होते. मिझोराम सरकारने यासंदर्भात केंद्राकडे मदत मागितली होती. जानेवारीमध्ये म्यानमारमधून पळून आलेल्या सैनिकांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला होता.

काय आहे एफएमआर? nभारत आणि म्यानमारमध्ये १६०० किमी लांबीची सीमा आहे. १९७० मध्ये दोन्ही देशांमध्ये मुक्त हालचालीबाबत करार झाला होता.nयाला फ्री मूव्हमेंट रेजिम म्हणजेच ‘एफएमआर’ असे म्हणतात. त्याचे शेवटचे २०१६ मध्ये नूतनीकरण करण्यात आले.nयामुळे दोन्ही देशांतील लोकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय एकमेकांच्या प्रदेशाला भेट देता येत होती.

तक्रार काय? nम्यानमारमधील दहशतवादी सीमा ओलांडून भारताच्या हद्दीत येतात, अशी तक्रार मणिपूरमधील मैतेई जमातीने केली होती.nदेशांच्या सीमेवर कुंपण नसल्याचा फायदा घेऊन हे दहशतवादी भारतात अमली पदार्थांची तस्करी करतात, असाही दावा करण्यात आला होता.

टॅग्स :Amit Shahअमित शाहMyanmarम्यानमारHome Ministryगृह मंत्रालय