शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

‘माझं बंड अंतिम टप्प्यात…’ काँग्रेसच्या बंडखोर आमदारानं वाढवलं पक्षाचं टेन्शन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 18:29 IST

Himachal Congress Politics: नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग करत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचा पराभव घडवून आणला होता. तेव्हापासून राज्यात राजकीय अस्थितरेचे वारे वाहू लागले आहेत.

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये हिमाचल प्रदेशमध्येकाँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग करत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचा पराभव घडवून आणला होता. तेव्हापासून राज्यात राजकीय अस्थितरेचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांपैकी एक असलेल्या राजिंदर राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू आणि पक्ष नेतृत्वाला लक्ष्य केलं आहे.  

राजिंदर राणा यांनी फेसबूकवर लिहिलं की, हिमाचलच्या माझ्या प्रिय सहकाऱ्यांनो, मागच्या काही दिवसांपासून आपल्या देवभूमीमध्ये ज्या काही राजकीय हालचाली सुरू आहेत, त्याची तुम्हाला बऱ्यापैकी जाणीव आहे. मला त्याबाबत वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. सगळी हकीकत तुमच्या समोर आहे. जे तुमच्यासमोर आलेलं नाही आणि ज्या बाबी षडयंत्रानुसार पडद्यामागे लपवण्यात आले, ते तुमच्यासमोर आणण्यासाठी मी ही पोस्ट लिहीत आहे. कारण माझी कटिबद्धता, माझी निष्ठा, माझं समर्पण, माझा विश्वास आणि माझी जबाबदारी तुमच्याशी आहे. सत्तेच्या शिखरावर बसलेल्या कुठल्याही खुज्या शहेंशाहसोबत नाही आहे.

राणा यांनी सांगितले की, हिमाचलमधील निवडणुकीदरम्यान आम्ही एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून तुम्हाला जे वचन दिले होते. ते तुम्हाला माहिती असेलच. तुम्ही आमच्या आश्वासनांवर विश्वास ठेवला. आम्हाला तुमचं बहुमूल्य मत देऊन आश्वासनं प्रत्यक्षात उतरवण्याची संधी दिली. देवभूमीची सेवी करण्याची संधी दिली. मात्र त्या आश्वासनांची सद्यस्थिती काय आहे, याबाबच मी आता लिहायला बसलो तर एक पुस्तक लिहून तयार होईल. ज्यांच्या हातात मी आनंदाने फुलांचा गुच्छ देऊन आलो होते. त्यांच्याच हातातील खंजीर माझी वाट पाहत आहे. 

तुम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मी सुजानपूर येथून शिमला आणि शिमला येथून दिल्लीपर्यंत धावपळ केली. हात जोडून विनंती करत राहिलो. जी आश्वासनं दिली ती पूर्ण करा असं सांगत राहिलो. मात्र त्यावर ना शिमला येथील शहेनशाहच्या दरबाराता सुनावणी झाली, ना हस्तिनापूरच्या कमकुवत होत असलेल्या सिंहासनावरील सत्ताधाऱ्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले, अशी टीका राजिंदर राणा यांनी केली.  

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेस