शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

बिहारमध्ये भाजपाचा पराभव ही माझ्या वडिलांना श्रद्धांजली - सरताज

By admin | Updated: November 9, 2015 12:05 IST

बिहार निवडणुकी भारतीय जनता पक्षाचा झालेला दारूण पराभव म्हणजे माझ्या वडिलांना वाहण्यात आलेली श्रद्धांजली असल्याचे दादरी हत्याकांडात बळी पडलेल्या मोहम्मद अखलाखच्या मुलाने व्यक्त केली.

ऑनलाइन लोकमत
दादरी ( उत्तरप्रदेश), दि. ९ - बिहार निवडणुकी भारतीय जनता पक्षाचा झालेला दारूण पराभव म्हणजे माझ्या वडिलांना वाहण्यात आलेली श्रद्धांजली आहे, अशी प्रतिक्रिया दादरी हत्याकांडात बळी पडलेल्या मोहम्मद अखलाखचा मुलगा, सरताजने व्यक्त केली आहे. 'आपल्या देशात द्वेषाच्या राजकारणाला जागा नाही, हे बिहारच्या जनतेने दाखवून दिलं. बिहारहमध्ये लागलेला निकाल हा सांप्रदायिक राजकारणाच्या विरोधात लागलेला असून तीच माझ्या वडिलांना वाहण्यात आलेल श्रद्धांजली आहे,' असे सरताजने म्हटले आहे. 
बीफ साठवून ठेवल्याच्या व ते खाल्ल्याच्या अफवेवरून दोन महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधील दादरी येथे जमावाने मोहम्मह अखलाख यांना मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचा धाकटा मुलगा गंभीर जखमी झाला होता.  या घटनेनंतर देशभरात तणावाचे वातावरण पसरले. या हत्येसाठी केंद्र सरकार कारणीभूत असल्याचा तसेच देशातील असहिष्णू वातावरण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. अनेक नामंवत लेखक, विचारवंत, दिग्दर्शक, निर्माते तसेच वैज्ञानिकांनी या निषेधार्थ त्यांचे पुरस्कारही परत केले. या घटनेचा सामान्य जनतेवरही खोल परिणाम झाल्याचे बिहार निवडणुकीच्या निकालातून दिसून आले. भाजपासाठी अिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लढण्यात आलेल्या या निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला.
निकाल जाहीर झाल्यानंतर अखलाखचा मोठा मुलगा सरताज याने ही प्रतिक्रिया दिली. हा निकाल सांप्रदायिक राजकारणाच्या विरोधात आहे. धर्माच्या नावावर लढून काहीही फायदा होत नाही, याची लोकांना जाणीव झाली पाहिजे. फक्त सत्तेच्या लोभाने देशाचे विभाजन करू नका, असे आवाहन मी देशातील सर्व राजकारण्यांना करतो, असेही सरताज म्हणाला.