शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काकाच्या प्रेमात वेडी झाली पुतणी; लग्न केलं पण सात जन्माचं नातं 3 महिन्यात संपलं, काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 13:31 IST

लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यानंतर मुलीचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तरुणीने एक व्हिडीओ शूट केला होता, तो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रेमाचे अनेक किस्से हे सातत्याने समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. काका-पुतणी एकमेकांच्या प्रेमात पडले. तीन महिन्यांपूर्वी दोघांनी घऱातून पळून जात लग्न केलं. मात्र यानंतर आता भयंकर प्रकार घडला आहे. लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यानंतर मुलीचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तरुणीने एक व्हिडीओ शूट केला होता, तो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात तिने माहेरच्यांवर गंभीर आरोप लावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील कोकिलवारा गावात ही घटना घडली आहे. येथे 22 वर्षीय पूजा कुमारी आणि दीपक दास यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. या दोघांनी घरात कोणालाही न सांगता पळून जात लग्न केलं. लग्नाच्या तीन महिन्यांनतर पूजा कुमारीची तब्येत अचानक बिघडली आणि उपचारादरम्यान शुक्रवारी तिचा मृत्यू झाला.

मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच वडील तातडीने लेकीच्या घरी पोहोचले. तेथे पोहोचल्यावर पाहिलं तर सासरची मंडळी मुलीवर अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीत होते. मात्र पूजाच्या वडिलांनी तब्बल 3 तासांपर्यंत मृतदेह थांबवून ठेवला. सोबतच पोलिसांनाही बोलावलं. यानंतर मुलीच्या वडिलांनी आरोप केला आहे की, मुलीला जबरदस्ती पळवून नेण्यात आलं आणि नंतर तिची हत्या केली.

पूजाने केलेला व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 3 महिन्यांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यात ती म्हणते की, मी माझ्या मर्जीने लग्न केलं आहे. माझ्यावर कोणीही जबरदस्ती केली नाही. मी दीपकवर 8 वर्षांपासून प्रेम करते. मात्र माझे आई-वडील आणि भाऊ याच्या विरोधात आहेत. या घटनेने परिसराक एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.