शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'भारतातील मुसलमानांचा मुघलांशी संबंध नाही, पण त्यांच्या बायका कोण होत्या?' ओवेसींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 09:46 IST

ओवेसी यांनी यापूर्वी, पुष्यमित्राने तोडलेल्या बौद्ध मंदिरांसंदर्भात भाजप का भाष्य करत नाही, असा सवालही उपस्थित केला होता.

सध्या वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरू आहे. यासंदर्भात, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी ज्ञानवापीचा संबंध औरंगजेबाशी जोडण्यावरून नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नाही, तर 'बात निकली है तो दूर तक जाएगी,' असे वक्तव्यही त्यांनी केले होते. आता ओवेसी यांना कोट करत AIMIM ने इतिहास आणि मुघल काळासंदर्भात ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये ओवेसी म्हणाले, भारतातील मुसलमानांचा मुघलांशी कसलाही संबंध नाही. पण हे सांगा, की मुघल बादशहांच्या बायका कोण होत्या? ओवेसी यांनी यापूर्वी, पुष्यमित्राने तोडलेल्या बौद्ध मंदिरांसंदर्भात भाजप का भाष्य करत नाही, असा सवालही उपस्थित केला होता.

'दुसरी मशीद कदापी गमावणार नाही' -तत्पूर्वी, ज्ञानवापी वादावर बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले होते, की मी सरकारला सांगू इच्छितो, की आम्ही एक बाबरी मशीद गमावली आहे. आता दुसरी मशीद कदापी गमावणार नाही. तुम्ही न्यायाची हत्या करून आमची मशीद हिसकावली आहे. दुसरी मशीद हिसकावू शकणार नाही, हे लक्षात ठेवा.

"असदुद्दीन ओवेसी जनतेची दिशाभूल करतायत" -ओवेसी यांनी कायद्याची पदवी घेतली असून, त्याचे ज्ञानही त्यांना आहे. ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करणे हे प्रार्थनास्थळ कायद्याचे उल्लंघन आहे, असे सांगून ते लोकांची दिशाभूल करत आहेत. कायद्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मशीद किंवा मंदिर पाडायचे असेल तेव्हाच या कायद्याचा उल्लेख करता येईल. ते बेकायदेशीर नाही. याप्रकरणी न्यायालयाने निर्देश दिले आहेत, असे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनGyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदhistoryइतिहास