शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम महिला वैयक्तिक कायदा मंडळाकडून स्वागत, शिया व सुन्नी मुस्लिमांची मात्र निर्णयाबद्दल वेगवेगळी मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 10:01 IST

तीन वेळा तलाकच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेला निर्णय इस्लामचा आणि देशातील मुस्लीम महिलांचा विजय आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय मुस्लीम महिला वैयक्तिक कायदा मंडळ आणि अखिल भारतीय शिया वैयक्तिक कायदा मंडळाने स्वागत केले आहे.

लखनौ : तीन वेळा तलाकच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेला निर्णय इस्लामचा आणि देशातील मुस्लीम महिलांचा विजय आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय मुस्लीम महिला वैयक्तिक कायदा मंडळ आणि अखिल भारतीय शिया वैयक्तिक कायदा मंडळाने स्वागत केले आहे. आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य जाफरयाब जिलानी यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.मात्र, या निर्णयामुळे मुस्लीम महिलांना नवी आशा दिली गेली असल्याचे, अखिल भारतीय मुस्लीम महिला वैयक्तिक कायदा मंडळांचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा ऐतिहासिक व देशातील महिलांचा विजय आहे, परंतु त्यापेक्षाही हा इस्लामचा विजय आहे, असे अखिल भारतीय मुस्लीम महिला वैयक्तिक कायदामंडळाच्या अध्यक्षा शायेस्ता अम्बर म्हणाल्या. मुस्लीम महिलांच्या हक्कांसाठी अम्बर लढत आल्या आहेत.तीन वेळा तलाकवर येत्या काळात कायमची बंदी घातली जाईल, अशी आम्हाला आशा आहे. इस्लाममध्ये तीन वेळा तलाकची कोणतीही तरतूद नसतानाही मुस्लीम महिलांना प्रचंड हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. ही भेदभावाची व्यवस्था स्वयंघोषित धार्मिक पुढाºयांनी निर्माण केली असून, त्यामुळे लक्षावधी महिलांचे जगणे त्रासदायक बनले आहे. या निर्णयामुळे मुस्लीम महिलांना नवी आशा दिली गेली आहे, असे शायेस्ता अम्बर म्हणाल्या. शरियाला धक्का न लावता, सरकारने नवा कायदा करावा, असे आवाहन करून त्या म्हणाल्या की, मुस्लीम महिलांचे कल्याण आणि समृद्धीला बाधा न आणता, नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी आशा आहे.अखिल भारतीय शिया वैयक्तिक कायदा मंडळाचे प्रवक्ते मौलाना यासूब अब्बास यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, यामुळे तीन वेळा तलाक म्हणून मुस्लीम महिलांचा होणारा छळ थांबायला मदत होईल. प्रेषितांच्या काळात तिहेरी तलाकची कोणतीही व्यवस्था नव्हती. सती प्रथेविरोधात जसा कठोर कायदा केला गेला, तसा कायदा आम्हाला तिहेरी तलाकच्या विरोधात हवा आहे, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)प्रश्न शरियाचा : जिलानीजाफरयाब जिलानी म्हणाले की, तिहेरी तलाकची पद्धत रद्द करण्याबाबत आमचे काहीच म्हणणे नाही. किंबहुना, आम्हीही तिहेरी तलाक बंद व्हावा, यासाठी प्रयत्नशील होतो, पण प्रश्न शरियाचा आहे. शरियाने तिहेरी तलाक वैध ठरतो, तर न्यायालयाच्या म्हणण्याप्रमाणे तो अवैध ठरतो. त्यामुळे ज्या महिला शरियाने बांधल्या गेल्या आहेत, त्यांच्याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने काहीच मार्गदर्शन सूचना दिलेल्या नाहीत.मात्र, आपण पूर्ण निकालपत्र वाचून, त्यावर सविस्तर बोलू. लॉ बोर्डाची बैठक १0 सप्टेंबर रोजी भोपाळमध्ये होणार असून, त्यात आम्ही या निर्णयाचा विचार करणार आहोत. अखिल भारतीय मुस्लीम वैयक्तिक कायदा मंडळाचे सरचिटणीस मौलाना वली रेहमानी यांनी मंडळाची बैठक घेऊन, या विषयावर पुढे काय करायचे याचा निर्णय घेऊ, असे म्हणून निर्णयावर भाष्य करायला नकार दिला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय