शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मुस्लीम महिला वैयक्तिक कायदा मंडळाकडून स्वागत, शिया व सुन्नी मुस्लिमांची मात्र निर्णयाबद्दल वेगवेगळी मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 10:01 IST

तीन वेळा तलाकच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेला निर्णय इस्लामचा आणि देशातील मुस्लीम महिलांचा विजय आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय मुस्लीम महिला वैयक्तिक कायदा मंडळ आणि अखिल भारतीय शिया वैयक्तिक कायदा मंडळाने स्वागत केले आहे.

लखनौ : तीन वेळा तलाकच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेला निर्णय इस्लामचा आणि देशातील मुस्लीम महिलांचा विजय आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय मुस्लीम महिला वैयक्तिक कायदा मंडळ आणि अखिल भारतीय शिया वैयक्तिक कायदा मंडळाने स्वागत केले आहे. आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य जाफरयाब जिलानी यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.मात्र, या निर्णयामुळे मुस्लीम महिलांना नवी आशा दिली गेली असल्याचे, अखिल भारतीय मुस्लीम महिला वैयक्तिक कायदा मंडळांचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा ऐतिहासिक व देशातील महिलांचा विजय आहे, परंतु त्यापेक्षाही हा इस्लामचा विजय आहे, असे अखिल भारतीय मुस्लीम महिला वैयक्तिक कायदामंडळाच्या अध्यक्षा शायेस्ता अम्बर म्हणाल्या. मुस्लीम महिलांच्या हक्कांसाठी अम्बर लढत आल्या आहेत.तीन वेळा तलाकवर येत्या काळात कायमची बंदी घातली जाईल, अशी आम्हाला आशा आहे. इस्लाममध्ये तीन वेळा तलाकची कोणतीही तरतूद नसतानाही मुस्लीम महिलांना प्रचंड हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. ही भेदभावाची व्यवस्था स्वयंघोषित धार्मिक पुढाºयांनी निर्माण केली असून, त्यामुळे लक्षावधी महिलांचे जगणे त्रासदायक बनले आहे. या निर्णयामुळे मुस्लीम महिलांना नवी आशा दिली गेली आहे, असे शायेस्ता अम्बर म्हणाल्या. शरियाला धक्का न लावता, सरकारने नवा कायदा करावा, असे आवाहन करून त्या म्हणाल्या की, मुस्लीम महिलांचे कल्याण आणि समृद्धीला बाधा न आणता, नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी आशा आहे.अखिल भारतीय शिया वैयक्तिक कायदा मंडळाचे प्रवक्ते मौलाना यासूब अब्बास यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, यामुळे तीन वेळा तलाक म्हणून मुस्लीम महिलांचा होणारा छळ थांबायला मदत होईल. प्रेषितांच्या काळात तिहेरी तलाकची कोणतीही व्यवस्था नव्हती. सती प्रथेविरोधात जसा कठोर कायदा केला गेला, तसा कायदा आम्हाला तिहेरी तलाकच्या विरोधात हवा आहे, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)प्रश्न शरियाचा : जिलानीजाफरयाब जिलानी म्हणाले की, तिहेरी तलाकची पद्धत रद्द करण्याबाबत आमचे काहीच म्हणणे नाही. किंबहुना, आम्हीही तिहेरी तलाक बंद व्हावा, यासाठी प्रयत्नशील होतो, पण प्रश्न शरियाचा आहे. शरियाने तिहेरी तलाक वैध ठरतो, तर न्यायालयाच्या म्हणण्याप्रमाणे तो अवैध ठरतो. त्यामुळे ज्या महिला शरियाने बांधल्या गेल्या आहेत, त्यांच्याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने काहीच मार्गदर्शन सूचना दिलेल्या नाहीत.मात्र, आपण पूर्ण निकालपत्र वाचून, त्यावर सविस्तर बोलू. लॉ बोर्डाची बैठक १0 सप्टेंबर रोजी भोपाळमध्ये होणार असून, त्यात आम्ही या निर्णयाचा विचार करणार आहोत. अखिल भारतीय मुस्लीम वैयक्तिक कायदा मंडळाचे सरचिटणीस मौलाना वली रेहमानी यांनी मंडळाची बैठक घेऊन, या विषयावर पुढे काय करायचे याचा निर्णय घेऊ, असे म्हणून निर्णयावर भाष्य करायला नकार दिला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय