शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

Badruddin Ajmal Controversy, Hindu-Muslim: "मला लाज वाटते..."; हिंदुंबद्दलच्या वादग्रस्त विधानावर मुस्लीम खासदाराने मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 14:12 IST

काय म्हणाले होते बदरुद्दीन अजमल... वाचा सविस्तर

Badruddin Ajmal Controversy, Hindu-Muslim: AIUDF सुप्रीमो आणि आसाममधील लोकसभा खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी हिंदू समुदायावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. मी केलेल्या विधानावरून जो वाद झाला त्याची मला लाज वाटते आणि मी त्यासाठी दिलगीर असल्याचे त्यांनी सांगितले. अजमल यांच्या वक्तव्यावरून राज्याच्या अनेक भागांत त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या आहेत. तथापि, त्यांनी सांगितले की त्यांनी केलेले विधान हे चुकीच्या पद्धतीने घेतले गेले असून त्यांनी कोणत्याही एका समुदायाला लक्ष्य केलेले नव्हते.

AIUDF प्रमुख म्हणाले, “मी कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य केले नाही किंवा हिंदू शब्द वापरला नाही. कोणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, पण तो एक मुद्दा बनला आणि त्याबद्दल मी दिलगीर आहे. मला लाज वाटते की माझ्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीच्या बाबतीत असे घडले." अजमल यांनी शनिवारी दावा केला होता की, आपल्या विधानांचा व वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला आहे.

त्याचवेळी या मुद्द्यावरून त्यांच्यावरील पोलीस केसेसवर ते म्हणाले, "पोलीस केसेस राजकारण्यांचा आलेख वरच्या दिशेने जात असल्याचे दाखवतात. अनेक हिंदू नेते मुस्लिमांविरोधात रोज बोलतात, पण आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. सर्वांसाठी समान विकास आणि अधिकार हा माझ्या विधानाचा हेतु आणि अर्थ होता. पण माझ्या विझानाचा चुकीचा अर्थ घेतला गेला आणि त्याला वेगळं वळण देण्यात आले," असे ते म्हणाले.

बदरुद्दीन अजमल यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्या वक्तव्याचा गुजरात विधानसभा निवडणुकीशी संबंध जोडला. गुजरातमध्ये सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला वाचवण्यासाठी अजमल असे वागले असा आरोप त्यांनी केला. तृणमूल काँग्रेस (TMC) ने गुवाहाटी येथे AIUDF प्रमुखांच्या पुतळ्याचे दहन केले आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजपशी संगनमत केल्याचा आरोप केला. मात्र, भाजपने बदरुद्दीन अजमल यांच्या वक्तव्यापासून दूर राहिल्याचे दिसून आले.

अजमल नक्की काय म्हणाले होते?

बद्रुद्दीन अजमल यांनी शुक्रवारी एका मुलाखतीत महिला, हिंदू पुरुष आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्यावर भाष्य केले होते. एक वादग्रस्त विधान देताना अजमल म्हणाले होते, “हिंदूंनी मुलांच्या बाबतीत मुस्लीम सूत्र स्वीकारले पाहिजे आणि मुलांची लहान वयातच लग्ने करून दिली पाहिजेत. मुस्लिम तरुण वयाच्या २०-२२व्या वर्षी विवाह करतात आणि मुस्लिम महिला वयाच्या १८व्या वर्षी विवाह करतात, जे घटनात्मक आहे. हिंदू लग्नापूर्वी एक, दोन किंवा तीन अवैध बायका करतात आणि मुलांना जन्म देत नाहीत, स्वतःचा आनंद उपभोगतात आणि पैसे वाचवतात." यावरून त्यांच्यावर टीका झाली होती.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Muslimमुस्लीमHinduहिंदूMember of parliamentखासदार