शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:52 IST

Murshidabad Violence News:

नव्या वक्फ कायद्याविरोधातील आंदोलनातून हिंसाचार उफाळलेल्या पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील दैनंदिन जीवन आता पूर्वपदावर येत आहे. तसेच येथील रहिवासीही शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, या हिंसाचाराप्रकरणी झालेल्या सुनावणी वेळी कोलकाता हायकोर्टासमोर धक्कादायक माहिती आली आहे. मुर्शिदाबातमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर तेथील अनेक हिंदू रहिवाशांना लक्ष्य करण्यात आल्याचे दावे केले जात आहेत. त्यातच आता आमच्यावर बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा, अशी विनवणी येथील महिला दंगेखोरांना करत होत्या, असे हायकोर्टातील सुनावणीदरम्यान सांगण्यात आले.

भाजपा नेत्या आणि वकील प्रियंका टिबरेवाल यांनी मुर्शिदाबादमधील हिंसाचारात होरपळलेल्या अनेक पीडितांची हृदयद्रावक कहाणी कोर्टासमोर मांडली. त्या म्हणाल्या की, ‘’दंगेखोरांनी आमच्या तुळशीच्या माळा तोडल्या, असे फोनवर संवाद साधताना मुर्शिदाबादमधील महिलांनी मला सांगितले. दंगेखोरांच्या दहशतीमुळे या महिला भयग्रस्त झाल्या होत्या. हवंतर आमच्यावर बलात्कार करायचा असेल तर करा, पण आमच्या पती मुलांना सोडा, अशी विनवणी या महिलांनीं दंगेखोरांना केली होती. जेव्हा बांगलादेश मुक्त झाला तेव्हा माझा जन्म झाला नव्हता. मात्र भारतामध्ये असं काही पाहावं लागेल, असं वाटलं नव्हतं. आग भडकवण्याऐवजी ती शांत केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, या हिंसाचाराने पीडित व्यक्ती आता मुर्शिदाबाद येथे राहत नाहीत का? असे न्यायमूर्ती सौमेन सेन यांनी विचारले असता प्रियंका टिबरेवाल यांनी सांगितले की, हे पीडित आता मुर्शिदाबादमध्ये राहत नाहीत. त्यांना मालदा येथे आश्रय घेतला आहे. जोपर्यंत पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत ते परत जाऊ शकत नाही. त्यांच्याकडील सारंकाही जळून खाक झालं आहे. एनएचआरसीच्या पथकाला तिथे जायचं आहे. मात्र त्यांना तिथे का जायचं आहे, ते  आम्हाला माहिती आहे, असेही त्या म्हणाल्या.

प्रियंका टिबरेवाल यांनी सुनावणीदरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, हा हिंसाचार बाहेरून आलेल्या लोकांनी घडवला असा दावा ममता बॅनर्जी करत आहेत. मात्र सीमेवर कुंपण घालण्यासाठी त्या जमीन देऊ शकत नाही आहेत. सीमारेषेवर अशा प्रकारचं कुंपण घातलं जात नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहतील. सीमारेषेवरील भागात अशा घटनांना रोखण्यासाठी कुंपण घालण्याची आवश्यकता आहे.

तर राज्य सरकारचे वकील कल्याण बंडोपाध्याय यांनी कोर्टात सांगितले की, मुर्शिदाबादच्या काही भागांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. काही सोशल मीडिया पोस्ट ब्लॉक करण्यात आल्या आहेत. हिंदू राष्ट्र आणि हिंदुत्वाचा प्रचार केला जात आहे. खोट्या अफवा पसरण्यापासून रोखण्यासाठी अनेक सोशल मीडिया पोस्ट बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.   

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालHigh Courtउच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारी