शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
4
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
5
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
6
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
7
टेबल फॅन खूपच खराब झालाय... स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' सोपी पद्धत, चमकेल नव्यासारखा
8
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
9
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
10
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
11
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
12
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
13
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
14
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
15
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
16
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
17
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
18
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
19
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
20
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी

"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:52 IST

Murshidabad Violence News:

नव्या वक्फ कायद्याविरोधातील आंदोलनातून हिंसाचार उफाळलेल्या पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील दैनंदिन जीवन आता पूर्वपदावर येत आहे. तसेच येथील रहिवासीही शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, या हिंसाचाराप्रकरणी झालेल्या सुनावणी वेळी कोलकाता हायकोर्टासमोर धक्कादायक माहिती आली आहे. मुर्शिदाबातमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर तेथील अनेक हिंदू रहिवाशांना लक्ष्य करण्यात आल्याचे दावे केले जात आहेत. त्यातच आता आमच्यावर बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा, अशी विनवणी येथील महिला दंगेखोरांना करत होत्या, असे हायकोर्टातील सुनावणीदरम्यान सांगण्यात आले.

भाजपा नेत्या आणि वकील प्रियंका टिबरेवाल यांनी मुर्शिदाबादमधील हिंसाचारात होरपळलेल्या अनेक पीडितांची हृदयद्रावक कहाणी कोर्टासमोर मांडली. त्या म्हणाल्या की, ‘’दंगेखोरांनी आमच्या तुळशीच्या माळा तोडल्या, असे फोनवर संवाद साधताना मुर्शिदाबादमधील महिलांनी मला सांगितले. दंगेखोरांच्या दहशतीमुळे या महिला भयग्रस्त झाल्या होत्या. हवंतर आमच्यावर बलात्कार करायचा असेल तर करा, पण आमच्या पती मुलांना सोडा, अशी विनवणी या महिलांनीं दंगेखोरांना केली होती. जेव्हा बांगलादेश मुक्त झाला तेव्हा माझा जन्म झाला नव्हता. मात्र भारतामध्ये असं काही पाहावं लागेल, असं वाटलं नव्हतं. आग भडकवण्याऐवजी ती शांत केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, या हिंसाचाराने पीडित व्यक्ती आता मुर्शिदाबाद येथे राहत नाहीत का? असे न्यायमूर्ती सौमेन सेन यांनी विचारले असता प्रियंका टिबरेवाल यांनी सांगितले की, हे पीडित आता मुर्शिदाबादमध्ये राहत नाहीत. त्यांना मालदा येथे आश्रय घेतला आहे. जोपर्यंत पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत ते परत जाऊ शकत नाही. त्यांच्याकडील सारंकाही जळून खाक झालं आहे. एनएचआरसीच्या पथकाला तिथे जायचं आहे. मात्र त्यांना तिथे का जायचं आहे, ते  आम्हाला माहिती आहे, असेही त्या म्हणाल्या.

प्रियंका टिबरेवाल यांनी सुनावणीदरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, हा हिंसाचार बाहेरून आलेल्या लोकांनी घडवला असा दावा ममता बॅनर्जी करत आहेत. मात्र सीमेवर कुंपण घालण्यासाठी त्या जमीन देऊ शकत नाही आहेत. सीमारेषेवर अशा प्रकारचं कुंपण घातलं जात नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहतील. सीमारेषेवरील भागात अशा घटनांना रोखण्यासाठी कुंपण घालण्याची आवश्यकता आहे.

तर राज्य सरकारचे वकील कल्याण बंडोपाध्याय यांनी कोर्टात सांगितले की, मुर्शिदाबादच्या काही भागांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. काही सोशल मीडिया पोस्ट ब्लॉक करण्यात आल्या आहेत. हिंदू राष्ट्र आणि हिंदुत्वाचा प्रचार केला जात आहे. खोट्या अफवा पसरण्यापासून रोखण्यासाठी अनेक सोशल मीडिया पोस्ट बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.   

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालHigh Courtउच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारी