शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मुंबई-गोवा महामार्ग जूनपूर्वी पूर्ण करणार; केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:22 IST

दिल्ली- मुंबई या महत्त्वाकांक्षी महामार्गचे काम या वर्षात पूर्ण होईल, असेही गडकरी यांनी सांगितले

चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मुंबई-गोवा महामार्गवरील परिस्थितीमुळे मला रोज प्रवाशांची नाराजी सहन करावी लागते. ही नाराजी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समजते. यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या महामार्गचे काम पूर्ण करू, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. याशिवाय दिल्ली- मुंबई या महत्त्वाकांक्षी महामार्गचे काम या वर्षात पूर्ण होईल, असेही गडकरी यांनी सांगितले. 

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या वाहतूक मंत्र्याची ४२ वी बैठक भारत मंडपम येथे पार पडली. यावेळी पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या वाढत्या संख्येवर खंत व्यक्त केली. सरकारने कॅशलेस उपचारांची व्यवस्था केली गेली आहे. अपघातात जखमी व्यक्तीचा ७ दिवस उपचार किंवा १.५ लाखांचा खर्च मंत्रालय करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

१२५० नवीन प्रशिक्षण केंद्रे

मंत्रालयाने जाहीर केलेल्या ड्रायव्हिंग प्रशिक्षण धोरणांतर्गत देशात १२५० नवीन प्रशिक्षण आणि फिटनेस केंद्र उघडले जाणार आहेत. त्यासाठी  साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.  सुमारे २५ लाख नवीन चालक तयार होतील. या केंद्रांमधून सुमारे १५ लाख लोकांना रोजगार मिळेल. या सर्व केंद्रावर सौर यंत्रणा बसविली जाणार आहे. 

चालकांसाठीही आठ तासच ड्युटी

  • जयपूरमध्ये झालेल्या अपघाताचा उल्लेख करीत गडकरी म्हणाले की, या अपघातातील चालक सकाळी साडेचार वाजल्यापासून संध्याकाळी ९.३० पर्यंत गाडी चालवित होता. 
  • आता चालक आठ तासापेक्षा जास्त काळ गाडी चालविणार नाही असा नियम बनविला जात आहे. त्यासाठी चालक गाडी चालवण्यासाठी बसेल तेव्हा कार्ड स्वॅपिंग होईल आणि इंजिन ८ तासांनंतर थांबेल.

हेल्मेट अनिवार्य

  • सरकारने बेशिस्त कमी करण्यासाठी  दंड वाढविला. मात्र दंडामुळे न्यायालयात जावे लागते. यामुळे पॅनल्टी लावावी अशी सूचना केली आहे. 
  • चारचाकी वाहनांमध्ये मागील बेल्ट आणि दुचाकीसाठी सहप्रवाशाला हेल्मेटला अनिवार्य केले चंद्रशेखर बर्वे  आहे, असेही गडकरी म्हणाले.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी