शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प विलंबाने होणार; जपानी कंपन्यांचा कमी सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 00:38 IST

अडथळ्यांची मालिका

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला मुंबई- अहमदाबाददरम्यानचा बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होण्यास विविध कारणांमुळे आणखी पाच वर्षांचा उशीर लागणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. आता तो ऑक्टोबर २०२८ मध्ये पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.

या प्रकल्पाच्या कामासाठी निविदा प्रक्रियेत जपानमधील खूपच कमी कंपन्या सहभागी झाल्या, तसेच या कंपन्यांनी प्रकल्प खर्चाचे आकडे इतके मोठे दाखविले की, अखेर ही निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आली. त्यामुळे भारतातील पहिल्यावहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प आता २०२३ ऐवजी २०२८ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. या विलंबामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाचा खर्चही वाढणार आहे. बुलेट ट्रेनचा समुद्राखालून जाणारा २१ कि.मी.चा मार्ग बांधण्यासाठी जारी केलेल्या निविदा प्रक्रियेत जपानी कंपन्यांनी भागच घेतला नाही. त्यातील ७ कि.मी.चा मार्ग मुंबईच्या समुद्राखालून जातो.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची आखणी करणाऱ्या जपानी तज्ज्ञांशी रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच चर्चा केली. त्यावेळी हा प्रकल्प आणखी पाच वर्षे रेंगाळणार हे स्पष्ट झाले. या प्रकल्पाच्या मार्गात निर्माण झालेले अडथळे जर दूर झाले, तर विलंबाचा कालावधी कमी करण्यात यश येईल, असेही रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

५०८ कि.मी.चा रेल्वेमार्ग

508 कि.मी.चा मुंबई ते अहमदाबाददरम्यान हा बुलेट ट्रेन प्रकल्प असून, त्यासाठी जलदगती रेल्वेमार्ग बांधण्यासाठी येणाºया खर्चापैकी ८० टक्के रक्कम भारताने जपानकडून ०.१ टक्का व्याजावर कर्जाऊ घेतली आहे. ही रक्कम १५ वर्षांत फेडावयाची आहे. 2022 साली ७५ व्या स्वातंत्र्यदिनी या बुलेट ट्रेनच्या मार्गावरील एका भागाचे तरी उद््घाटन करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठरविले होते; पण आता ते साध्य होणार नाही.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनNarendra Modiनरेंद्र मोदीJapanजपान