शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

यंदा बहुरंगी लढत : पंजाबमध्ये सरकार कोणाचे येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 06:03 IST

बहुमतासाठी ५९ जागा आवश्यक; मागील पाच निवडणुकांत मतदारांचा स्पष्ट कौल

- बलवंत तक्षकलाेकमत न्यूज नेटवर्कचंडीगढ : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी २० फेब्रुवारी रोजी  मतदान पार पडल्या पासूनच यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज लावला जात अहे.  राज्यात संमिश्र सरकार येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी १० मार्च रोजी निकाल जाहीर झाल्यानंतरच स्थिती स्पष्ट होईल. बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला  ५९ जागा मिळणे आवश्यक आहेत.

काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल का?, आम आदमी पार्टीला बहुमत मिळेल का?,  किंवा अकाली दल- बसपा आघाडी काही चमत्कार करील का?, अशीही चर्चा आहे. भाजपसाठी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव ढिंढसा यांच्यासोबतची युती किती फायदेशीर ठरते? या सर्व प्रश्नांची उत्तरे १० मार्च रोजीच मिळतील. चर्चा काहीही होत असली तरी पंजाबच्या मतदारांनी गेल्या पाच निवडणुकीत स्पष्ट कौल दिला आहे. त्रिशंकू विधानसभा दिली नाही. तथापि, मतदानानंतर केंद्रीय  गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले होते की,  सरकार कोणाचे येईल, हे ज्योतिषीच सांगू शकतील. अकाली दलाचे वरिष्ठ नेते बिक्रम सिंग माजीठिया यांनीही असे संकेत दिले होते की,  सरकार स्थापन करण्यासाठी  भाजप आणि त्याच्या मित्र पक्षाची मदत घेतली जाऊ शकते.

काँग्रेसच विजयी होईल, असा विश्वास काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी व्यक्त करीत आहे; परंतु, माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल यांचे म्हणणे आहे की,  आघाडी सरकारसाठी काँग्रेस आणि आपचा समझोता होऊ शकतो. 

ज्या पक्षाचे जास्त आमदार,  त्या पक्षाचा मुख्यमंत्री आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला उपमुख्यमंत्री केले जाऊ शकते. वास्तविक पाहता पंजाबमध्ये यावेळी एक विशिष्ट लाट नव्हती.  मालवामध्ये सत्ता परिवर्तनासाठी मतदानाचा जोर दिसला आणि  दोआबामध्ये मतदान साधारण झाले. मतदानाच्या टक्केवारीत जेव्हाही बदल झाला, तेव्हा पंजाबमध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे, हे विशेष. त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यास नाईलाजाने आघाडी स्थापन करावी लागेल, एवढे मात्र खरे आहे

कोण आहेत मैदानात?पंजाबमध्ये अगोदर काँग्रेस आणि अकाली-भाजप आघाडीत थेट लढत होत असे; यावेळी बहुरंगी लढत होती. यावेळी अकाली दल आणि भाजपने पहिल्यांदाच स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. अकाली दलाने बसपासोबत, तर भाजपाचे अमरिंदर सिंग यांचा पंजाब लोक काँग्रेस आणि ढिंढसा यांच्या संयुक्त अकाली दलासोबत आघाडी केली आहे.  दुसरीकडे शेतकऱ्यांच्या २२ संघटनांचा संयुक्त समाज मोर्चाही यावेळी निवडणुकीत मैदानात उतरला आहे.

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२